शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

चांगल्या आरोग्याचा मार्ग चांगल्या आहारातून जातो - महेंद्र पालेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:01 IST

शाकाहार हाच आपला आहार आहे, असे मत 'आहार ते आरोग्य नवीन भोजन प्रणाली'चे जनक पूणे येथील महेेंद्र पालेशा यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.

- सोहम घाडगेलोकमत न्यूज नेटवर्कजगण्यासाठी आवश्यक आॅक्सिजन झाडे मोफत देतात. पाणी, जमीन, सूर्यप्रकाश निसर्गानेच मानवासाठी विनामुल्य उपलब्ध केलेला आहे. पूर्वीचे मानव कंदमुळे, फळे खाऊनच जगायचे. मांसाहार मानवी शरीरासाठी नाही. शाकाहार हाच आपला आहार आहे, असे मत 'आहार ते आरोग्य नवीन भोजन प्रणाली'चे जनक पूणे येथील महेेंद्र पालेशा यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले.

आहार ते आरोग्य नवीन भोजन प्रणाली ही काय संकल्पना आहे?आहार ते आरोग्य नवीन भोजन प्रणालीचा आधार रामचरित्र मानस आहे. राम १४ वर्षे वनवासात होते. तिथे त्यांनी फळे, कंदमुळे खाल्ली. कधी ते आजारी पडल्याचा उल्लेख कुठे आढळत नाही.  निसर्गाने आपल्यासाठी बनविलेले खाद्य खायला पाहिजे. आपण देवाला मानतो. मग देवाने बनविलेले खाद्य का खात नाही, हाच मोठा प्रश्न आहे. 

जेवणाचे आदर्श वेळापत्रक कसे असावे?पूर्वी विज नव्हती. सूर्यप्रकाश हाच सर्वात मोठा स्त्रोत होता. सूर्योदयोनंतर कामे सुरु व्हायची. साधारणपणे सकाळी १० वाजता व रात्री सहा ही जेवणाची वेळ होती. याचा अर्थ सूर्यप्रकाशानंतर व सुर्यास्ताआधी जेवण केले पाहिजे. दोन जेवणात आठ तासांचे अंतर असावे. त्यामुळे पचनसंस्थेस आपले काम करायला पुरेसा वेळ मिळतो. भूक लागली तेंव्हा जेवण करा. शंभर टक्के भूक लागली तर ९० टक्के जेवा.

आजारासाठी आपला आहार जबाबदार असतो का?हो, आजाराचा मार्ग हा आहारातून जातो. आपण काय खातो यावर आपले आरोग्य जबाबदार असते. आपण एकदा जेवलो की लगेच पून्हा जेवत नाही. मात्र कुणी म्हटलं की आयस्क्रिम, गुलाबजामून खातो. कारण त्यामध्ये साखर असते. साखर हे व्यसन आहे. ते आपणास गोड खायला परावृत्त करते. जसे आपण खाणार तसे आरोग्य आपणास लाभेल. त्यामुळे काय खावे, काय खावू नये हे ज्याचे त्याने ठरवावे. मी मार्ग दाखवू शकतो. त्या मार्गाने जायचे की नाही हे तुम्ही ठरवा. एक वेळ जेवतो तो योगी, दोन वेळ खातो तो भोगी व तीन वेळ खातो तो रोगी असे आपले शास्त्र सांगते. आता यापैकी तुम्हाला नेमके काय स्वीकारायचे ते तुम्ही ठरवा. पूर्वीही जेवण्याच्या दोनच वेळा होत्या. इंग्रज आले आणि त्यांनी ब्रेकफास्ट आणला. त्यातून आपले जीवन ब्रेक केले, असे म्हणता येईल.

जेवणाचे प्रमाण किती  असावे  ?कुणी किती खावे हे त्याच्या शरीर प्रकियेवर अवलंबून आहे. तुमच्या शरिराला जेवढे खाता येईल तेवढे खा. मात्र दोन जेवणात आठ तास अंतर असू द्या. शाकाहारी जेवण करा. मांसाहार करणे टाळा. शरीराची कार्यपद्धती वाहनासारखीच आहे. पेट्रोलचे वाहन डिझेलवर चालत नाही. आपल्या शरिराची गाडी शाकाहारी इंधनावर चालते. मग आपण का त्यामध्ये मांसाहारी इंधन भरतो. शरिराच्या गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग केली तर गॅरेजरुपी दवाखान्यात जायचे काम पडणार नाही. मेंटनन्स कमी लागेल. पर्यायाने खर्च कमी होईल. नेहमी आजारी पडाल तर नेहमी डॉक्टरकडे जावे लागेल. व्यावसायिक असल्याने तो त्याप्रमाणे बिल लावेल. त्यासाठी आजार दूर ठेवायचा प्रयत्न करा.

टॅग्स :interviewमुलाखतbuldhanaबुलडाणा