शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

‘पाताळगंगे’चे पात्र झाले अरुंद!

By admin | Updated: May 30, 2017 00:14 IST

किनगाव राजा : येथील परिसरातील नदी पात्रांची जागा बेटांनी व गाळाने व्यापली असून, नदीचे पात्र अरुंद होत असल्याने नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

किनगाव राजा : येथील परिसरातील नदी पात्रांची जागा बेटांनी व गाळाने व्यापली असून, नदीचे पात्र अरुंद होत असल्याने नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.पाताळगंगा नदीचा उगम हा सिंदखेड राजा येथून झाला असून, या नदीला पांगरखेड, हनवतखेड, महारखेड, वाघोरा, खापरखुटी या गावातील छोटे-मोठे नदी-नाल्याचे पाणी येऊन हे संपूर्ण पाणी सावखेड तेजनच्या नदीपात्रात जमा होते व त्या ठिकाणाहून पाताळगंगा नदीचा प्रवास सुरू होऊन पळसखेड चक्का, किनगाव राजा, राहेरी अशा गावातून जाऊन खडकपूर्णा नदीला मिळते. पताळगंगा नदी ही अगदी किनगाव राजा गावाला लागूनच वाहते. येत्या चार ते पाच वर्षापूर्वीपासून नदीपात्राची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. इंग्रज काळापासून नदीपात्र शंभर मीटर असल्यामुळे तेवढा पुल आहे. मात्र आता वाळूउपसा व इतर कारणामुळे नदीचे पात्र फक्त वीस ते ३० फुटापर्यंत राहिले आहे. बाकी नदीपात्राची जागा ही बेटांनी व गाळाने व्यापली आहे. आठ ते दहा वर्षापूर्वी पुराचे पाणी गावात जात असल्यामुळे शासनाने १ कोटी रुपये खर्च करुन संरक्षण भिंत बांधली आहे. पाणी अडविण्यासाठी याच नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. शासनामार्फत पाणी अडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात जलस्वराज मार्फत सिमेंट बंधारे सुद्धा बांधण्यात येत आहे. आता मात्र गरज आहे ती म्हणजे आमदार निधी व कृषी विभाग यांच्या मार्फत पाताळगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची. किनगावराजा व परिसरातील गावांना नेहमीच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. म्हणून पाताळगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तात्काळ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जर असे झाले नाही तर पाताळगंगा नदी ही येत्या एक-दोन वर्षात नाहीशी होईल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.