शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

थंडीत निघाला प्रवाश्यांचा घाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 18:27 IST

लोणारवरून बुलडाणा मार्गे भूसावळ व जळगाव जाणाऱ्या बसची वायरींग अचानक जळाल्याने बस बंद पडल्याचा प्रकार

ब्रम्हानंद जाधव/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 15 - लोणारवरून बुलडाणा मार्गे भूसावळ व जळगाव जाणाऱ्या बसची वायरींग अचानक जळाल्याने बस बंद पडल्याचा प्रकार मेहकर-चिखली रोडवर हिवरा आश्रमपासून २ कि़मी. अंतरावर १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडला. प्रवाशांना एसटीला धक्का द्यावा लागल्याने कुडकुडणाऱ्या थंडीत प्रवाश्यांचा घाम निघाला; मात्र एसटी चालू न झाल्याने
सर्व प्रवाशांना रस्त्यावर उतरावे लागले.
जिल्ह्यातील एसटीला ‘दे धक्का’ म्हणण्याची वेळ वाहकासह प्रवाश्यांवर वारंवार येत आहे. भंगार एसटीबसेचे प्रमाण वाढले असून त्या बसेस सर्रास रस्त्यावर धावत असल्याने प्रवाश्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ‘उशिरा जाईन पण एस.टी. नेच जाईन’ असे म्हणणाऱ्या प्रवाश्यांची संख्या आजही मोठ्या प्रमाणावर असल्याने  भंगार एसटीतूनही लांबचा प्रवास प्रवाशी करतात. निवृत्तीच्या मार्गावर आलेल्या एसटी बसेस ग्रामीण भागातच नाहीतर माहामार्गावर सुद्धा पाठवल्या जात आहेत. त्यामुळे मध्येच एसटी बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. मेहकर आगाराची एम.एच.४० एन.८७९३ क्रमांकाची एसटीबस सकाळी ९ वाजता लोणारवरून जळगावसाठी निघाली. ही बस लोणार, मेहकर, लव्हाळा, चिखली, बुलडाणा, मुक्ताईनगर, भूसावळ त्यांनतर जळगाव पोहचणार होती. लांबपल्याची एसटी बस असतांनाही त्याची वायरींग तपासण्याची तसदी घेतली जात नसल्याने लोणार -जळगाव जाणारी एसटीबसची वायरींग हिवरा आश्रमपासून दोन कि.मी. अंतरावर जळून गेली. अचानक वायरींग जळाल्याने एसटी बंद पडली. तेंव्हा चालकांनी प्रवाश्यांना एसटीला धक्का देऊन एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. एसटीला धक्का देत असतांना एसटी तर सुरू झाली नाही; मात्र कुडकुडणाºया थंडीत एसटीला धक्का देणाऱ्या प्रवाशांचा चांगलाचा घाम निघाला. तेव्हा चालक व वाहकांनी सर्व प्रकार मेहकर आगाराला कळविला. कित्येक प्रवाश्यांना महत्वाच्या कामासाठी पुढे जायचे होते, मात्र एक तास दुसरी बस आली नसल्याने २५ ते ३०  प्रवाश्यांना रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले. एक तासानंतर दुसरी बस प्रवाशांनी फुल्ल होऊन आली असता, त्या बसमध्ये  प्रवाशांना कोंबून देण्यात आले. रस्त्यावरच अशा प्रकारचे एसटी बस वारंवार बंद पडण्याचे पकार घडत असल्याने प्रवाश्यांना एसटीचा प्रवास डोकेदु:खी ठरत आहे.
भंगार बसेसचे प्रमाण वाढले
जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे भंगार एसटी बसेसचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातच नाही तर लांब पल्यावर सुद्धा भंगार एसटी बसेस सोडण्यात येत असल्याने बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. भंगार बसेसमुळे प्रवाशांसाठी बसचा प्रवास डोकेदुखी ठरत आहेत. तर काही ठिकाणी अचानक बसफेरी बंद केली जात असल्याने बस प्रवाश्यांची तारांबळ उडत आहे.  राज्य परिवहन महामंडळान्या नियोजनशुन्य कारभाराचा प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे.