शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत निघाला प्रवाश्यांचा घाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 18:27 IST

लोणारवरून बुलडाणा मार्गे भूसावळ व जळगाव जाणाऱ्या बसची वायरींग अचानक जळाल्याने बस बंद पडल्याचा प्रकार

ब्रम्हानंद जाधव/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 15 - लोणारवरून बुलडाणा मार्गे भूसावळ व जळगाव जाणाऱ्या बसची वायरींग अचानक जळाल्याने बस बंद पडल्याचा प्रकार मेहकर-चिखली रोडवर हिवरा आश्रमपासून २ कि़मी. अंतरावर १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडला. प्रवाशांना एसटीला धक्का द्यावा लागल्याने कुडकुडणाऱ्या थंडीत प्रवाश्यांचा घाम निघाला; मात्र एसटी चालू न झाल्याने
सर्व प्रवाशांना रस्त्यावर उतरावे लागले.
जिल्ह्यातील एसटीला ‘दे धक्का’ म्हणण्याची वेळ वाहकासह प्रवाश्यांवर वारंवार येत आहे. भंगार एसटीबसेचे प्रमाण वाढले असून त्या बसेस सर्रास रस्त्यावर धावत असल्याने प्रवाश्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ‘उशिरा जाईन पण एस.टी. नेच जाईन’ असे म्हणणाऱ्या प्रवाश्यांची संख्या आजही मोठ्या प्रमाणावर असल्याने  भंगार एसटीतूनही लांबचा प्रवास प्रवाशी करतात. निवृत्तीच्या मार्गावर आलेल्या एसटी बसेस ग्रामीण भागातच नाहीतर माहामार्गावर सुद्धा पाठवल्या जात आहेत. त्यामुळे मध्येच एसटी बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. मेहकर आगाराची एम.एच.४० एन.८७९३ क्रमांकाची एसटीबस सकाळी ९ वाजता लोणारवरून जळगावसाठी निघाली. ही बस लोणार, मेहकर, लव्हाळा, चिखली, बुलडाणा, मुक्ताईनगर, भूसावळ त्यांनतर जळगाव पोहचणार होती. लांबपल्याची एसटी बस असतांनाही त्याची वायरींग तपासण्याची तसदी घेतली जात नसल्याने लोणार -जळगाव जाणारी एसटीबसची वायरींग हिवरा आश्रमपासून दोन कि.मी. अंतरावर जळून गेली. अचानक वायरींग जळाल्याने एसटी बंद पडली. तेंव्हा चालकांनी प्रवाश्यांना एसटीला धक्का देऊन एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. एसटीला धक्का देत असतांना एसटी तर सुरू झाली नाही; मात्र कुडकुडणाºया थंडीत एसटीला धक्का देणाऱ्या प्रवाशांचा चांगलाचा घाम निघाला. तेव्हा चालक व वाहकांनी सर्व प्रकार मेहकर आगाराला कळविला. कित्येक प्रवाश्यांना महत्वाच्या कामासाठी पुढे जायचे होते, मात्र एक तास दुसरी बस आली नसल्याने २५ ते ३०  प्रवाश्यांना रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले. एक तासानंतर दुसरी बस प्रवाशांनी फुल्ल होऊन आली असता, त्या बसमध्ये  प्रवाशांना कोंबून देण्यात आले. रस्त्यावरच अशा प्रकारचे एसटी बस वारंवार बंद पडण्याचे पकार घडत असल्याने प्रवाश्यांना एसटीचा प्रवास डोकेदु:खी ठरत आहे.
भंगार बसेसचे प्रमाण वाढले
जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे भंगार एसटी बसेसचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातच नाही तर लांब पल्यावर सुद्धा भंगार एसटी बसेस सोडण्यात येत असल्याने बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. भंगार बसेसमुळे प्रवाशांसाठी बसचा प्रवास डोकेदुखी ठरत आहेत. तर काही ठिकाणी अचानक बसफेरी बंद केली जात असल्याने बस प्रवाश्यांची तारांबळ उडत आहे.  राज्य परिवहन महामंडळान्या नियोजनशुन्य कारभाराचा प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे.