शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी २४ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:32 IST

मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केल्या आहेत. तर प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेसाठी जवळपास २४ हजार अर्ज मेहकर पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्यामध्ये खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन ग्रामीण भागात सर्व्हे सुरु ...

ठळक मुद्दे सर्वे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन एक समिती नेमण्यात आली आहे.

मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केल्या आहेत. तर प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेसाठी जवळपास २४ हजार अर्ज मेहकर पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्यामध्ये खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन ग्रामीण भागात सर्व्हे सुरु आहे. शासनाने इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना सह इरतही योजना सुरु करुन अनेक गोरगरीबांना घरकूल दिलेले आहेत. परंतु या योजनेत ज्यांना घरकूल मिळाले नाही त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी ग्रामीण भागातून प्रत्येक खेडेगावातून जवळपास २४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण २०११ मध्ये जो सर्वे झाला होता त्यानुसार सदर अर्ज घेण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत अर्जदार हा त्याच गावचा रहिवासी असला पाहिजे, तसेच कच्चे घर असावे, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन सध्या प्रत्येक खेडेगावामध्ये सर्वे सुरु आहे. सर्वे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये गटविकास अधिकारी आर.पी.पवार, सदस्य ओमप्रकाश चिखलेकर, विस्तार अधिकारी पंडागळे व एक नायब तहसिलदार तसेच ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, पंचायत समिती कर्मचारी यानुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सध्या प्रत्येक खेडेगावात जावून आलेल्या अर्जाची छाणनी करुन घराची पाहणी करीत आहे. खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ देण्यास हा सर्वे सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)

अनेक योजनांचे घरकूल अद्याप अर्धवटच गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासन दरवर्षी घरकूलाच्या विविध योजना काढत आहेत. त्यानुसार संबंधितांचे घरकूल मंजूर करण्यास, अनुदान सुद्धा देण्यात येते. मात्र इंदिरा आवास योजना शबरी आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून घरकुले मंजूर झाली आहेत. परंतु अद्यापही अनेक गावातील घरकूल अर्धवट स्थितीत आहेत. शौचालय बांधकाम नाही. शासन या घरकूलावर कोट्यावधी रुपये खर्च करीत असताना केवळ पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक, शाखा विस्तार अधिकारी, अभियंता यांच्या निष्काळजीमुळे शासनाचा मुळ उद्देश सफल होतांना दिसत नाही. मागील विविध योजनेचे घरकुल अर्धवट असतांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले पूर्ण होतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.