शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी २४ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:32 IST

मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केल्या आहेत. तर प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेसाठी जवळपास २४ हजार अर्ज मेहकर पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्यामध्ये खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन ग्रामीण भागात सर्व्हे सुरु ...

ठळक मुद्दे सर्वे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन एक समिती नेमण्यात आली आहे.

मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केल्या आहेत. तर प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेसाठी जवळपास २४ हजार अर्ज मेहकर पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्यामध्ये खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन ग्रामीण भागात सर्व्हे सुरु आहे. शासनाने इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना सह इरतही योजना सुरु करुन अनेक गोरगरीबांना घरकूल दिलेले आहेत. परंतु या योजनेत ज्यांना घरकूल मिळाले नाही त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी ग्रामीण भागातून प्रत्येक खेडेगावातून जवळपास २४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण २०११ मध्ये जो सर्वे झाला होता त्यानुसार सदर अर्ज घेण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत अर्जदार हा त्याच गावचा रहिवासी असला पाहिजे, तसेच कच्चे घर असावे, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन सध्या प्रत्येक खेडेगावामध्ये सर्वे सुरु आहे. सर्वे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये गटविकास अधिकारी आर.पी.पवार, सदस्य ओमप्रकाश चिखलेकर, विस्तार अधिकारी पंडागळे व एक नायब तहसिलदार तसेच ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, पंचायत समिती कर्मचारी यानुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सध्या प्रत्येक खेडेगावात जावून आलेल्या अर्जाची छाणनी करुन घराची पाहणी करीत आहे. खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ देण्यास हा सर्वे सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)

अनेक योजनांचे घरकूल अद्याप अर्धवटच गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासन दरवर्षी घरकूलाच्या विविध योजना काढत आहेत. त्यानुसार संबंधितांचे घरकूल मंजूर करण्यास, अनुदान सुद्धा देण्यात येते. मात्र इंदिरा आवास योजना शबरी आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून घरकुले मंजूर झाली आहेत. परंतु अद्यापही अनेक गावातील घरकूल अर्धवट स्थितीत आहेत. शौचालय बांधकाम नाही. शासन या घरकूलावर कोट्यावधी रुपये खर्च करीत असताना केवळ पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक, शाखा विस्तार अधिकारी, अभियंता यांच्या निष्काळजीमुळे शासनाचा मुळ उद्देश सफल होतांना दिसत नाही. मागील विविध योजनेचे घरकुल अर्धवट असतांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले पूर्ण होतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.