शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी २४ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:32 IST

मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केल्या आहेत. तर प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेसाठी जवळपास २४ हजार अर्ज मेहकर पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्यामध्ये खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन ग्रामीण भागात सर्व्हे सुरु ...

ठळक मुद्दे सर्वे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन एक समिती नेमण्यात आली आहे.

मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केल्या आहेत. तर प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेसाठी जवळपास २४ हजार अर्ज मेहकर पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्यामध्ये खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ मिळावा, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन ग्रामीण भागात सर्व्हे सुरु आहे. शासनाने इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना सह इरतही योजना सुरु करुन अनेक गोरगरीबांना घरकूल दिलेले आहेत. परंतु या योजनेत ज्यांना घरकूल मिळाले नाही त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी ग्रामीण भागातून प्रत्येक खेडेगावातून जवळपास २४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण २०११ मध्ये जो सर्वे झाला होता त्यानुसार सदर अर्ज घेण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत अर्जदार हा त्याच गावचा रहिवासी असला पाहिजे, तसेच कच्चे घर असावे, यासाठी पंचायत समिती स्तरावरुन सध्या प्रत्येक खेडेगावामध्ये सर्वे सुरु आहे. सर्वे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये गटविकास अधिकारी आर.पी.पवार, सदस्य ओमप्रकाश चिखलेकर, विस्तार अधिकारी पंडागळे व एक नायब तहसिलदार तसेच ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, पंचायत समिती कर्मचारी यानुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सध्या प्रत्येक खेडेगावात जावून आलेल्या अर्जाची छाणनी करुन घराची पाहणी करीत आहे. खºया लाभार्थ्यालाच घरकूलाचा लाभ देण्यास हा सर्वे सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)

अनेक योजनांचे घरकूल अद्याप अर्धवटच गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासन दरवर्षी घरकूलाच्या विविध योजना काढत आहेत. त्यानुसार संबंधितांचे घरकूल मंजूर करण्यास, अनुदान सुद्धा देण्यात येते. मात्र इंदिरा आवास योजना शबरी आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून घरकुले मंजूर झाली आहेत. परंतु अद्यापही अनेक गावातील घरकूल अर्धवट स्थितीत आहेत. शौचालय बांधकाम नाही. शासन या घरकूलावर कोट्यावधी रुपये खर्च करीत असताना केवळ पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक, शाखा विस्तार अधिकारी, अभियंता यांच्या निष्काळजीमुळे शासनाचा मुळ उद्देश सफल होतांना दिसत नाही. मागील विविध योजनेचे घरकुल अर्धवट असतांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले पूर्ण होतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.