शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

हवामान बदलामुळे पानमळा उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST

कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण ...

कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण द्यावे, यासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पानमळे जगविण्यासाठी हे शेतकऱ्यासाठी फार जोखमीचे झालेले असतानासुद्धा काही शेतकरी परंपरागत व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मासरूळ, धामणगाव, पारद, वालसावंगी परिसरात तीनशे ते चारशे पानमळे होते. मात्र, आता फक्त ७० ते ८० पानमळे याठिकाणी जिवंत आहेत. त्यांचेसुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने पान उत्पादन करणे थांबवावे का, या विचाराने शेतकऱ्यांना पछाडले आहे.

पान उत्पादन करणे अत्यंत कठीण आहे. शेतकरी अनंत अडचणींचा सामना करून पान उत्पादन घेत आहेत. मात्र, पान उत्पादनाबाबत शासनाचे उदासीन धोरण दिसून येते. वादळ, वारा, गारपीट यापासून पानमळा संरक्षण करण्यासंदर्भात शासनाने ठोस धोरण अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पानवेलीचा फळ उत्पादनामध्ये समावेश करावा.

-दिलीप सिनकर, पंचायत समिती सदस्य, बुलडाणा

इतर पिकांना विमा कवच प्रदान केले जाते. त्याचप्रमाणे पानवेलींनासुद्धा विमा कवच द्यावे, ही रास्त मागणी या शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना तात्काळ विमा कवच व वार्षिक अनुदान देण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, नसता शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलनासाठी आम्ही सक्रिय राहू.

-शेषराव किसन सावळे, माजी सरपंच, मासरूळ

पान उत्पादन हा परंपरागत व्यवसाय असून, याला चालना देण्याच्या दृष्टीने शासनाने मदत करावी. पीक विमा कवच देण्याची गरज आहे. भविष्यात पानमळे जिवंत पाहण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-संदीप काटोले, मासरूळ