शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

हवामान बदलामुळे पानमळा उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST

कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण ...

कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण द्यावे, यासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पानमळे जगविण्यासाठी हे शेतकऱ्यासाठी फार जोखमीचे झालेले असतानासुद्धा काही शेतकरी परंपरागत व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मासरूळ, धामणगाव, पारद, वालसावंगी परिसरात तीनशे ते चारशे पानमळे होते. मात्र, आता फक्त ७० ते ८० पानमळे याठिकाणी जिवंत आहेत. त्यांचेसुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने पान उत्पादन करणे थांबवावे का, या विचाराने शेतकऱ्यांना पछाडले आहे.

पान उत्पादन करणे अत्यंत कठीण आहे. शेतकरी अनंत अडचणींचा सामना करून पान उत्पादन घेत आहेत. मात्र, पान उत्पादनाबाबत शासनाचे उदासीन धोरण दिसून येते. वादळ, वारा, गारपीट यापासून पानमळा संरक्षण करण्यासंदर्भात शासनाने ठोस धोरण अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पानवेलीचा फळ उत्पादनामध्ये समावेश करावा.

-दिलीप सिनकर, पंचायत समिती सदस्य, बुलडाणा

इतर पिकांना विमा कवच प्रदान केले जाते. त्याचप्रमाणे पानवेलींनासुद्धा विमा कवच द्यावे, ही रास्त मागणी या शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना तात्काळ विमा कवच व वार्षिक अनुदान देण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, नसता शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलनासाठी आम्ही सक्रिय राहू.

-शेषराव किसन सावळे, माजी सरपंच, मासरूळ

पान उत्पादन हा परंपरागत व्यवसाय असून, याला चालना देण्याच्या दृष्टीने शासनाने मदत करावी. पीक विमा कवच देण्याची गरज आहे. भविष्यात पानमळे जिवंत पाहण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-संदीप काटोले, मासरूळ