शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे पानमळा उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST

कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण ...

कधीकाळी पानवेलीच्या उत्पादनात सर्वांत पुढे असलेल्या मासरूळ परिसरातील शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत. पानवेलीला शासनाने विमा संरक्षण द्यावे, यासाठी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पानमळे जगविण्यासाठी हे शेतकऱ्यासाठी फार जोखमीचे झालेले असतानासुद्धा काही शेतकरी परंपरागत व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मासरूळ, धामणगाव, पारद, वालसावंगी परिसरात तीनशे ते चारशे पानमळे होते. मात्र, आता फक्त ७० ते ८० पानमळे याठिकाणी जिवंत आहेत. त्यांचेसुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने पान उत्पादन करणे थांबवावे का, या विचाराने शेतकऱ्यांना पछाडले आहे.

पान उत्पादन करणे अत्यंत कठीण आहे. शेतकरी अनंत अडचणींचा सामना करून पान उत्पादन घेत आहेत. मात्र, पान उत्पादनाबाबत शासनाचे उदासीन धोरण दिसून येते. वादळ, वारा, गारपीट यापासून पानमळा संरक्षण करण्यासंदर्भात शासनाने ठोस धोरण अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पानवेलीचा फळ उत्पादनामध्ये समावेश करावा.

-दिलीप सिनकर, पंचायत समिती सदस्य, बुलडाणा

इतर पिकांना विमा कवच प्रदान केले जाते. त्याचप्रमाणे पानवेलींनासुद्धा विमा कवच द्यावे, ही रास्त मागणी या शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना तात्काळ विमा कवच व वार्षिक अनुदान देण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, नसता शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलनासाठी आम्ही सक्रिय राहू.

-शेषराव किसन सावळे, माजी सरपंच, मासरूळ

पान उत्पादन हा परंपरागत व्यवसाय असून, याला चालना देण्याच्या दृष्टीने शासनाने मदत करावी. पीक विमा कवच देण्याची गरज आहे. भविष्यात पानमळे जिवंत पाहण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-संदीप काटोले, मासरूळ