शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निम्म्याहून अधिक शेतकरी आत्महत्या अपात्र!

By admin | Updated: May 11, 2017 07:07 IST

एकूण १२५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, यातील फक्त ५८ शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या.

नितीन निमकर्डे खामगाव : मागील तीन वर्षांत तालुक्यात एकूण १२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यातील फक्त ५८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या. तब्बल ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुुंबांना मदत नाकारण्यात आली. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळवून देण्याबाबत प्रशासकीय स्तरावर अनास्था दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटांशी झुंज देत आहेत. २०१४ व २०१५ मधील खरीप हंगामात पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती होती. शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. २०१६ मध्ये पाऊस बऱ्यापैकी होऊन उत्पादनातही मोठी वाढ झाली, पण तूर व अन्य शेतमालास भाव नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सन २०१४ मध्ये तालुक्यात एकूण ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी फक्त १८ शेतकऱ्यांची प्रकरणे शासकीय मदतीकरिता पात्र ठरविण्यात आली. सन २०१५ मध्ये ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असता त्यातील २३ प्रकरणे मदतीस पात्र ठरली. सन २०१६ मध्ये सर्वाधिक ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील केवळ १३ शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली. सन २०१७ मध्ये आतापर्यंत १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील फक्त चार मदतीस पात्र ठरल्या. अशा एकूण १२५ पैकी ५८ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे मदतीस पात्र ठरली असून, ६७ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.