शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
4
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
5
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
6
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
7
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
8
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
9
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
10
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
12
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
13
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
14
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
15
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
16
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
17
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
18
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
19
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
20
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

बुलडाणा जिल्ह्यातील २0 हजार तणावग्रस्त शेतकरी वा-यावर

By admin | Updated: April 21, 2016 02:18 IST

सर्वेक्षण धूळ खात पडून; शासकीय योजनेचा लाभ शेतक-यांपर्यत पोहचलाच नाही.

राजेश शेगोकार / बुलडाणा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या पथदश्री प्रकल्पांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकर्‍यांचे सर्वेक्षण ऑक्टोबरमध्येच पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १९ हजार ८00 शेतकरी तणावग्रस्त असल्याचे वास्तव समोर आल्यावरही हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे धूळ खात आहे. दरम्यान, या वर्षातील पहिल्या चार महिन्यातच ४५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, त्यामध्ये याच तणावग्रस्त शेतकर्‍यांचाही समावेश असल्याने कागदी घोड्यांनीही शेतकर्‍यांचा बळी घेतल्याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने घोषित केलेल्या विविध उपायांमध्ये शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करून तणावग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पथदश्री प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण पूर्ण झाले. जिल्ह्यातील १ हजार ४२0 गावांपैकी १३७ उजाड गावे वगळता १ हजार २८३ गावांमध्ये महसूल विभागाने हे सर्वेक्षण केले. यामध्ये १९ हजार ८00 शेतकरी तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे. या शेतकर्‍यांसाठी विविध शासकीय योजनांमधून योजनांची निवड करून संबंधिताना योजनेचा लाभ देण्यासाठी आता महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. संबंधित विभागांना तणावग्रस्त शेतकर्‍यांची यादी पाठवून प्राधान्याने त्यांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांकडून दिले गेले होते; मात्र हे निर्देश केवळ कागदावरच राहिल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. लोणार तालुक्यातील शेषराव हरी इंगळे या शेतकर्‍याने आत्महत्या केली. दुर्दैव म्हणजे या शेतकर्‍याचेही नाव तणावग्रस्त शेतकर्‍यांच्या यादीत होते. संबंधित शेतकर्‍याला शासकीय योजनांचा लाभ मिळाला असता, तर कदाचित त्यांचाही जीव वाचला असता; मात्र प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतकर्‍यांच्या जिवावर उठला आहे.