शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बुलडाणा जिल्ह्यातील २0 हजार तणावग्रस्त शेतकरी वा-यावर

By admin | Updated: April 21, 2016 02:18 IST

सर्वेक्षण धूळ खात पडून; शासकीय योजनेचा लाभ शेतक-यांपर्यत पोहचलाच नाही.

राजेश शेगोकार / बुलडाणा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या पथदश्री प्रकल्पांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकर्‍यांचे सर्वेक्षण ऑक्टोबरमध्येच पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १९ हजार ८00 शेतकरी तणावग्रस्त असल्याचे वास्तव समोर आल्यावरही हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे धूळ खात आहे. दरम्यान, या वर्षातील पहिल्या चार महिन्यातच ४५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, त्यामध्ये याच तणावग्रस्त शेतकर्‍यांचाही समावेश असल्याने कागदी घोड्यांनीही शेतकर्‍यांचा बळी घेतल्याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने घोषित केलेल्या विविध उपायांमध्ये शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करून तणावग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पथदश्री प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण पूर्ण झाले. जिल्ह्यातील १ हजार ४२0 गावांपैकी १३७ उजाड गावे वगळता १ हजार २८३ गावांमध्ये महसूल विभागाने हे सर्वेक्षण केले. यामध्ये १९ हजार ८00 शेतकरी तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे. या शेतकर्‍यांसाठी विविध शासकीय योजनांमधून योजनांची निवड करून संबंधिताना योजनेचा लाभ देण्यासाठी आता महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. संबंधित विभागांना तणावग्रस्त शेतकर्‍यांची यादी पाठवून प्राधान्याने त्यांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांकडून दिले गेले होते; मात्र हे निर्देश केवळ कागदावरच राहिल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. लोणार तालुक्यातील शेषराव हरी इंगळे या शेतकर्‍याने आत्महत्या केली. दुर्दैव म्हणजे या शेतकर्‍याचेही नाव तणावग्रस्त शेतकर्‍यांच्या यादीत होते. संबंधित शेतकर्‍याला शासकीय योजनांचा लाभ मिळाला असता, तर कदाचित त्यांचाही जीव वाचला असता; मात्र प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतकर्‍यांच्या जिवावर उठला आहे.