शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

बुलडाणा जिल्ह्यातील १७४ गावांमध्ये बाेंडअळीचा प्रकाेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 17:59 IST

कृ‍षि विभाग विविध उपाय योजनांच्या माध्यमातून बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने १७४ गावांमध्ये आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे.  कृ‍षि विभाग विविध उपाय योजनांच्या माध्यमातून बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी या उपाय योजनांचा प्रभावी वापर करीत बोंड अळीवर नियंत्रण मिळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बोंड अळी नियंत्रणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी जायभाये आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाईक यांनी सादरीकरण केले.  ते म्हणाले, बोंड अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सायंकाळी फवारणी करावी. दिवसा फवाणी ही प्रभावी ठरत नाही. तसेच पेस्टीसाईड हे गॅस श्रेणीतील वापरावे. बोंड अळी नियंत्रणासाठी कामगंध व प्रकाश सापळे लावण्यात यावेत. जिनींग परीसरातही किमान २० ते २५ कामगंध सापळे लावावेत. जेणेकरून नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होवून मरण पावतील.  बोंड  अळी नियंत्रण जनजागृती करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती