शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

अन्यथा गावागावांतून दिंड्या पंढरपूरला जातील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

चिखली : बंडात्यात्या कराडकर व वारकऱ्यांना आळंदी (देवाची) येथे ३ जुलैला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा महाराष्ट्र ...

चिखली : बंडात्यात्या कराडकर व वारकऱ्यांना आळंदी (देवाची) येथे ३ जुलैला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने तीव्र निषेध नोंदविला असून, वारकऱ्यांवरील अन्याय थांबवा, अन्यथा गावागावांतून दिंड्या पंढरपूरला जातील, असा इशारा या पृष्ठभूमीवर वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी दिला आहे.

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना ३ जुलै रोजी आळंदी देवाची येथे पोलिसांनी अटक करून स्टेशनला नेले आहे. या घटनेमुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे ह.भ.प. शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने त्यांनी प्रसिद्धिपत्रक काढले असून, यामध्ये ह.भ.प. कराडकर हे एका चांगल्या हेतूने आळंदीला गेले होते. वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे. 'पंढरीचा वारकरी । वारी चुकू न दे हरी ।।' या संत वचनाप्रमाणे शेकडो वर्षांच्या वारी परंपरेला शासनाने पायबंध घातले आहेत. कोरोनाचे कारण असले तरी वारकरी सर्व नियमांचे पालन करून पायी वारी करायला तयार आहेत. स्वत:च्या जीवित्वाची जबाबदारी स्वत: घेऊन मायबाप पांडुरंगाच्या भेटीला निघत आहेत. तरीसुद्धा पोलीस त्यांना अटक करतात, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोना काळात निवडणूका झाल्या, राजकीय पुढाऱ्यांच्या सभा झाल्या, त्यांना कोणी अडविले नाही आणि अटकही केली नाही. प्रत्येक शहरात तोबा गर्दी आहे. अशी स्थिती असताना केवळ वारीतूनच कोरोना वाढतो का? असा प्रश्न देखील ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी उपस्थित केला आहे. शासन वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ वारकऱ्यांना अटक करून वारकरी संप्रदायाचा अपमान करत असेल, तर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ कदापि सहन करणार नाही. यापुढे असा प्रकार घडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावातून पंढपूरसाठी दिंड्या निघतील. वारकरी संप्रदायाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी दिला आहे.