शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

अन्यथा गावागावांतून दिंड्या पंढरपूरला जातील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

चिखली : बंडात्यात्या कराडकर व वारकऱ्यांना आळंदी (देवाची) येथे ३ जुलैला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा महाराष्ट्र ...

चिखली : बंडात्यात्या कराडकर व वारकऱ्यांना आळंदी (देवाची) येथे ३ जुलैला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने तीव्र निषेध नोंदविला असून, वारकऱ्यांवरील अन्याय थांबवा, अन्यथा गावागावांतून दिंड्या पंढरपूरला जातील, असा इशारा या पृष्ठभूमीवर वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी दिला आहे.

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना ३ जुलै रोजी आळंदी देवाची येथे पोलिसांनी अटक करून स्टेशनला नेले आहे. या घटनेमुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे ह.भ.प. शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने त्यांनी प्रसिद्धिपत्रक काढले असून, यामध्ये ह.भ.प. कराडकर हे एका चांगल्या हेतूने आळंदीला गेले होते. वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे. 'पंढरीचा वारकरी । वारी चुकू न दे हरी ।।' या संत वचनाप्रमाणे शेकडो वर्षांच्या वारी परंपरेला शासनाने पायबंध घातले आहेत. कोरोनाचे कारण असले तरी वारकरी सर्व नियमांचे पालन करून पायी वारी करायला तयार आहेत. स्वत:च्या जीवित्वाची जबाबदारी स्वत: घेऊन मायबाप पांडुरंगाच्या भेटीला निघत आहेत. तरीसुद्धा पोलीस त्यांना अटक करतात, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोना काळात निवडणूका झाल्या, राजकीय पुढाऱ्यांच्या सभा झाल्या, त्यांना कोणी अडविले नाही आणि अटकही केली नाही. प्रत्येक शहरात तोबा गर्दी आहे. अशी स्थिती असताना केवळ वारीतूनच कोरोना वाढतो का? असा प्रश्न देखील ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी उपस्थित केला आहे. शासन वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ वारकऱ्यांना अटक करून वारकरी संप्रदायाचा अपमान करत असेल, तर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ कदापि सहन करणार नाही. यापुढे असा प्रकार घडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावातून पंढपूरसाठी दिंड्या निघतील. वारकरी संप्रदायाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ह.भ.प. दामुअण्णा शिंगणे यांनी दिला आहे.