शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

इतर परीक्षा होऊ शकतात, मग एमपीएससी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण समोर करत वर्ग ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण समोर करत वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ गटातील अधिकारीपदासाठी १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यात २०० जागांसाठी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी २ लाख ६३ हजार उमेदवार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, परीक्षेला अवघे तीन दिवस उरले असताना परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यापूर्वी एमपीएससीची परीक्षा फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आली होती.

आता २१ मार्चला होणार परीक्षा

गेल्या वर्षभरात चौथ्यांदा परीक्षा रद्द झाली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये शेवटची परीक्षा झाली होती. त्यानंतर २०२० ची परीक्षा जाहीर झाली, ती आजवर होऊ शकलेली नाही. एप्रिल २०२० ची परीक्षा कोरोनामुळे रद्द झाली. सप्टेंबर २०२० मध्येही झाली नाही, ऑक्टोबर २०२० मध्ये दोनदा परीक्षा जाहीर झाल्या व पुन्हा रद्दही झाल्या, आता मार्चमध्ये नक्की होणार, याची आशा असताना पुन्हा रद्द झाली. आता २१ मार्चला ही परीक्षा होणार आहे.

परीक्षेसाठी हॉलतिकीटही दिले गेले होते

परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली असताना आणि परीक्षेसाठी हॉलतिकीटही मिळालेले असताना ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यापूर्वीही अशाचप्रकारे परीक्षा एक दोन दिवसांवर असताना पुढे ढकलली होती. अशा प्रकारांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन त्यांचा वारंवार हिरमोड होत आहे.

इतर परीक्षा होतात, मग एमपीएससीवरच गंडांतर का ?

१ महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. केंद्र सरकारच्या परीक्षाही होत आहेत. मग एमपीएससी परीक्षार्थिंवरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, विद्यार्थ्यांना पीपीई कीटचे संरक्षण देऊन तसेच विद्यार्थ्यांची वयोमर्यादेच्या अटीत ३ वर्षांची वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

३ गेल्या दोन वर्षांत युपीएससीची उपपरीक्षा प्रक्रिया होऊन दुसरी पूर्वपरीक्षाही झाली. जेईई, नीट, वेगवेगळ्या सीईटीही झाल्या. मग एमपीएससीचीच परीक्षेवर गंडांतर का येते, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

युपीएससी देशभरात परीक्षा घेत असतानाही दोन परीक्षा झाल्या. त्याचप्रमाणे जेईई, नीटसारख्याही परीक्षा कोविडमध्येच झाल्या. असे असताना केवळ एमपीएससीच वारंवार पुढे का ढकलली जात आहे.

- वैभव शेळके, परीक्षार्थी

परीक्षा होणे आवश्यक होते. युपीएससीने कोरोनाचा प्रभाव असताना परीक्षा घेतल्या. मग एमपीएससीलाच काय अडचण आहे. असा प्रश्न परीक्षार्थिंना पडला आहे. परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती.

- श्याम येनकर, परीक्षार्थी.

परीक्षा पुढे ढकलल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाकाळात अन्य परीक्षा होत असतील तर एमपीएससीची परीक्षा का होत नाही? हा अनाकलनीय प्रश्न आहे.

- योगेश पोटे, परीक्षार्थी.