शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

इतर परीक्षा होऊ शकतात, मग एमपीएससी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण समोर करत वर्ग ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण समोर करत वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ गटातील अधिकारीपदासाठी १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यात २०० जागांसाठी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी २ लाख ६३ हजार उमेदवार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, परीक्षेला अवघे तीन दिवस उरले असताना परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यापूर्वी एमपीएससीची परीक्षा फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आली होती.

आता २१ मार्चला होणार परीक्षा

गेल्या वर्षभरात चौथ्यांदा परीक्षा रद्द झाली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये शेवटची परीक्षा झाली होती. त्यानंतर २०२० ची परीक्षा जाहीर झाली, ती आजवर होऊ शकलेली नाही. एप्रिल २०२० ची परीक्षा कोरोनामुळे रद्द झाली. सप्टेंबर २०२० मध्येही झाली नाही, ऑक्टोबर २०२० मध्ये दोनदा परीक्षा जाहीर झाल्या व पुन्हा रद्दही झाल्या, आता मार्चमध्ये नक्की होणार, याची आशा असताना पुन्हा रद्द झाली. आता २१ मार्चला ही परीक्षा होणार आहे.

परीक्षेसाठी हॉलतिकीटही दिले गेले होते

परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली असताना आणि परीक्षेसाठी हॉलतिकीटही मिळालेले असताना ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यापूर्वीही अशाचप्रकारे परीक्षा एक दोन दिवसांवर असताना पुढे ढकलली होती. अशा प्रकारांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन त्यांचा वारंवार हिरमोड होत आहे.

इतर परीक्षा होतात, मग एमपीएससीवरच गंडांतर का ?

१ महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. केंद्र सरकारच्या परीक्षाही होत आहेत. मग एमपीएससी परीक्षार्थिंवरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, विद्यार्थ्यांना पीपीई कीटचे संरक्षण देऊन तसेच विद्यार्थ्यांची वयोमर्यादेच्या अटीत ३ वर्षांची वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

३ गेल्या दोन वर्षांत युपीएससीची उपपरीक्षा प्रक्रिया होऊन दुसरी पूर्वपरीक्षाही झाली. जेईई, नीट, वेगवेगळ्या सीईटीही झाल्या. मग एमपीएससीचीच परीक्षेवर गंडांतर का येते, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

युपीएससी देशभरात परीक्षा घेत असतानाही दोन परीक्षा झाल्या. त्याचप्रमाणे जेईई, नीटसारख्याही परीक्षा कोविडमध्येच झाल्या. असे असताना केवळ एमपीएससीच वारंवार पुढे का ढकलली जात आहे.

- वैभव शेळके, परीक्षार्थी

परीक्षा होणे आवश्यक होते. युपीएससीने कोरोनाचा प्रभाव असताना परीक्षा घेतल्या. मग एमपीएससीलाच काय अडचण आहे. असा प्रश्न परीक्षार्थिंना पडला आहे. परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती.

- श्याम येनकर, परीक्षार्थी.

परीक्षा पुढे ढकलल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाकाळात अन्य परीक्षा होत असतील तर एमपीएससीची परीक्षा का होत नाही? हा अनाकलनीय प्रश्न आहे.

- योगेश पोटे, परीक्षार्थी.