शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इतर परीक्षा होऊ शकतात, मग एमपीएससी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण समोर करत वर्ग ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. त्यानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण समोर करत वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ गटातील अधिकारीपदासाठी १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यात २०० जागांसाठी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी २ लाख ६३ हजार उमेदवार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, परीक्षेला अवघे तीन दिवस उरले असताना परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यापूर्वी एमपीएससीची परीक्षा फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आली होती.

आता २१ मार्चला होणार परीक्षा

गेल्या वर्षभरात चौथ्यांदा परीक्षा रद्द झाली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये शेवटची परीक्षा झाली होती. त्यानंतर २०२० ची परीक्षा जाहीर झाली, ती आजवर होऊ शकलेली नाही. एप्रिल २०२० ची परीक्षा कोरोनामुळे रद्द झाली. सप्टेंबर २०२० मध्येही झाली नाही, ऑक्टोबर २०२० मध्ये दोनदा परीक्षा जाहीर झाल्या व पुन्हा रद्दही झाल्या, आता मार्चमध्ये नक्की होणार, याची आशा असताना पुन्हा रद्द झाली. आता २१ मार्चला ही परीक्षा होणार आहे.

परीक्षेसाठी हॉलतिकीटही दिले गेले होते

परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली असताना आणि परीक्षेसाठी हॉलतिकीटही मिळालेले असताना ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यापूर्वीही अशाचप्रकारे परीक्षा एक दोन दिवसांवर असताना पुढे ढकलली होती. अशा प्रकारांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन त्यांचा वारंवार हिरमोड होत आहे.

इतर परीक्षा होतात, मग एमपीएससीवरच गंडांतर का ?

१ महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. केंद्र सरकारच्या परीक्षाही होत आहेत. मग एमपीएससी परीक्षार्थिंवरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, विद्यार्थ्यांना पीपीई कीटचे संरक्षण देऊन तसेच विद्यार्थ्यांची वयोमर्यादेच्या अटीत ३ वर्षांची वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

३ गेल्या दोन वर्षांत युपीएससीची उपपरीक्षा प्रक्रिया होऊन दुसरी पूर्वपरीक्षाही झाली. जेईई, नीट, वेगवेगळ्या सीईटीही झाल्या. मग एमपीएससीचीच परीक्षेवर गंडांतर का येते, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

युपीएससी देशभरात परीक्षा घेत असतानाही दोन परीक्षा झाल्या. त्याचप्रमाणे जेईई, नीटसारख्याही परीक्षा कोविडमध्येच झाल्या. असे असताना केवळ एमपीएससीच वारंवार पुढे का ढकलली जात आहे.

- वैभव शेळके, परीक्षार्थी

परीक्षा होणे आवश्यक होते. युपीएससीने कोरोनाचा प्रभाव असताना परीक्षा घेतल्या. मग एमपीएससीलाच काय अडचण आहे. असा प्रश्न परीक्षार्थिंना पडला आहे. परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती.

- श्याम येनकर, परीक्षार्थी.

परीक्षा पुढे ढकलल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाकाळात अन्य परीक्षा होत असतील तर एमपीएससीची परीक्षा का होत नाही? हा अनाकलनीय प्रश्न आहे.

- योगेश पोटे, परीक्षार्थी.