शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

अंगणवाडी भरते उघड्यावर

By admin | Updated: July 3, 2017 01:14 IST

पालक चायगाव येथील अंगणवाडीवर टाकणार बहिष्कार!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्याने अनेक अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याने बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. चायगाव येथील अंगणवाडी क्रमांक दोनला स्वतंत्र खोली नसल्याने या अंगणवाडीतील मुले उघड्यावर तर कधी झाडाखाली बसत असल्याने मुलांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. येत्या १५ दिवसात मुलांना सुविधा न दिल्यास अंगणवाडीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.शासनाने ग्रामीण भागातील ० ते ५ वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रत्येक खेडेगावात अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. शासनाकडून या अंगणवाडीतील मुलांना सुविधा मिळावी, यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहेत. तर प्रत्येक अंगणवाडीला स्वतंत्र खोल्या असल्या पाहिजेत, यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे; परंतु स्थानिक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्याने मुले चावडीमध्ये, झाडाखाली तर कधी उघड्यावर बसत आहे. त्यामुळे मुलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने अनेक गावासाठी स्वतंत्र खोल्या बांधकामासाठी निधी मंजूर केलेला आहे; परंतु स्थानिक पंचायत समिती अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे नवीन अंगणवाडी स्वतंत्र खोल्यांचे बांधकाम रखडले आहे. चायगाव येथे अंगणवाडी क्रमांक २ साठी स्वतंत्र खोली बांधकाम मंजूर झालेले आहे. स्वतंत्र खोली बांधकामासाठी जागासुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी ग्रा.पं. च्यावतीने ठराव घेण्यात आला आहे; मात्र तरीही बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. या अंगणवाडीतील मुले जिल्हा परिषद शाळेच्या आवारात तर कधी झाडाखाली बसतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने मुलांना त्रास होत आहे. निधी मंजूर असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे काम रखडले आहे.मुलांना अंगणवाडीत न पाठविण्याचा पालकांचा इशाराचायगाव येथील अंगणवाडी क्रमांक २ ला स्वतंत्र खोली बांधकामासाठी निधी मंजूर झालेला आहे. ग्रा.पं.चा ठराव आहे. खोली बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे; मात्र तरीही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खोली बांधकाम रखडले आहे. स्वतंत्र खोली नसल्याने मुले ही झाडाखाली तर कधी शाळेच्या आवारात बसतात. त्यामुळे मुलांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. येत्या १५ दिवसात मुलांना सुविधा न दिल्यास अंगणवाडीत मुलांना पाठविणार नाही. तसेच अंगणवाडीवर बहिष्कार टाकू, असा इशारा भास्करराव देशमुख, वसंतराव सरोदे, लिंबाजी देशमुख, रमेश राठोड, राजू चव्हाण, रवी राठोड, लिंबाजी राठोड, उकंडा आडे, गणेश आडे, रमेश आडे, अरविंद आडे, शिवाजी मोरे, कडूबा बोरकर, गजानन बोरकर, गजानन पिछोरे, कुंडलीक देशमुख, अशोक आडे, भीमराव चव्हाण, रामेश्वर राठोड, कालीम अंभोरे, देवीदास सास्ते, उत्तम मोरे, सुभाष देशमुख, संतोष सहाने, सुधीर मोरे आदींनी दिला आहे.