शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत केवळ तीन हजार घरे

By admin | Updated: November 7, 2014 23:29 IST

रमाई आवास घरकुल योजना; बुलडाणा जिल्ह्यात घरकुलांचे काम कासवगतीने

सिद्धार्थ आराख / बुलडाणा

        कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना सामाजिक न्याय विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा यांनी मागील चार वर्षात रमाई आवास योजनेचे केवळ ३ हजार ४0१ घरे बांधली. सामाजिक न्याय विभागाने नुकताच चार वर्षांचा प्रगती अहवाल तयार केला असून, या अहवालात हे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात १२ हजार ३४४ घरांचे बांधकाम अद्याप पुर्णत्वाकडे गेले नाही. अजूनही ६ हजार ९१२ घरे प्रगती पथावर असल्याचे दाखविण्यात आले आहेत, तर ५ हजार ४३२ घरांच्या कामाला सुरूवातच झाली नाही. पर्यायाने या घरासाठी आलेला कोट्यवधी रुपयाचा निधी परत जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. या योजनेसाठी दरवर्षी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील लाभार्थी घटकाकडून घरकुलांसाठी अर्ज मागवले जातात. या योजनेत मागील सन २0१0-११ आणि २0११-१२ या दोन वर्षात रमाई घरकुल योजनेसाठी ६९0 घरांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. यासाठी ४ कोटी ८0 लाख १५ हजार रुपयांची तरतूद शासनाने करून दिली होती. संबंधित यंत्रणेने पाठपुरावा करीत या दोन वर्षात ६५७ घरांचे काम पुर्णत्वास नेले. यावर जवळपास ४ कोटी ६९ लक्ष ८९ हजार रुपये खर्च झाला. त्यामुळे जवळपास ६९0 बेघरांना आपले हक्काचे छत मिळाले. या लाभार्थ्यांना ४ कोटीचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर सन २0१२-१३ आणि २0१३-१४ या दोन वर्षात घरकुल बांधकाम मात्र अत्यंत कासव गतीने झाल्याचे अहवालावरून दिसते. या दान वर्षात दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात आली नाही. २0१२-१३ आणि १३-१४ या दोन वर्षासाठी १५ हजार २0 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यासाठी १0५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती; मात्र दोन वर्षात १५ हजार घरांपैकी केवळ २ हजार ७४४ घरे पुर्णत्वाकडे गेले. यासाठी ९ हजार ५८८ लाभार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना ४२ कोटी रुपये धनादेश वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत शासनाने आता नव्याने तरतूद केली आहे. यापूर्वी एका घरकुलासाठी ७0 हजार रुपये अनुदान मिळत होते यामध्ये वाढ करून ती एक लाख रुपये करण्यात आली आहे. २0१४-१५ या वर्षासाठी जवळपास १0 कोटी ५0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. या घरकुलाच्या कामाला काही ठिकाणी सुरूवातही झाली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्हाभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून लाभार्थिंची निवडही करण्यात आली आहे.