शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

जिल्ह्यात केवळ तीन टक्के खतसाठा उपलब्ध

By admin | Updated: May 30, 2017 00:57 IST

कृषी विभागाचा गतवर्षीच्या खतसाठ्यावर भर!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप हंगाम २०१७-१८ साठी कृषी विभागाकडून नियोजनानुसार १ लाख ३६ हजार मे.टन रासायनिक खतांची जिल्ह्यात आवश्यकता आहे. यापैकी खरिपाच्या तोंडावर जिल्ह्यात केवळ ३ हजार मे.टन खत उपलब्ध झाले आहे; मात्र गतवर्षीचे २३ हजार २८८ मे.टन खत शिल्लक असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी खताच्या मंजूर कोट्याला गतवर्षीच्या शिल्लक खताचा आधार होणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, शेतकऱ्यांसाठी १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल विविध बियाणे तसेच १ लाख ३६ हजार मे.टन खतांची मागणी आहे. शिवाय मान्सूनचे वेध लागल्यामुळे शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. सुरू झालेली खत, बियाणे उपलब्धतेची गती संथ आहे; परंतु मंजूर कोट्यानुसार खते, बियाणे उपलब्ध होतील, असा दावा कृषी विभागाने केला आहे. यावर्षी हंगामापर्यंत पुरेसा खतसाठा उपलब्ध नसला तरी, यंदाचा ३ हजार मे.टन व गतर्षीचा २३ हजार २८८ मे.टन खतासाठी असा एकूण २६ हजार ३०३ मे.टन. रासायनिक खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. यात युरिया, सल्फेट, एस.एस.पी., डी.ए.पी., एम.ओ.पी असे एकूण १२६६४ मे.टन, संयुक्त खते १३३३३ मे.टन आणि मिश्र खते ३०६ मे.टन शिल्लक आहे. यामुळे एकूण उपलब्ध खतसाठ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.१ लाख ३६ हजार क्विंटल बियाण्याची मागणीजल्ह्यात २०१७-१८ या खरीप हंगामात १०० टक्के पेरणीचे उद्दिष्टपूर्ती डोळ्यापुढे ठेवून कृषी विभागाकडून बियाणे व खतांचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या बियाणे पुरवठा व विक्री अहवालानुसार खरीप हंगामात यंदा १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल विविध बियाण्याची मागणी आहे; मात्र वेळेपर्यंत पेरणीसाठी बियाणे उपलब्ध झाले नाही. यंदा खताच्या मागणीत घट२०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी १ लाख ५८ हजार मे.टन खत आवंटनाला मंजुरात देण्यात आली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार मे.टन खत खरीप हंगामात वापरले गेले; मात्र २०१७-१८ च्या खरीप हंगामात खताच्या मागणीत घट झाली असून, यंदा केवळ १ लाख ३६ हजार मे.टन खताची मागणी करण्यात आली आहे.