शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

केवळ ४९७ बेरोजगारांना झाले कर्जवाटप

By admin | Updated: August 26, 2015 23:36 IST

१२९१ प्रकरणांपैकी मार्चअखेर ४९७ युवकांना स्वयम रोजगारासाठी कर्ज वाटप.

बुलडाणा : जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम नाही. छोट्या व्यवसायावरच येथील युवक अवलंबून आहेत. त्यातही स्वतंत्र व्यवसाय करायचा म्हणजे कर्जपुरवठा करताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि हमखास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे व्यवसायाचे प्रमाणही येथे कमी आहे. तरीेदेखील मार्च २0१५ पर्यंंत ४९७ सुशिक्षित बेरोगारांना विविध व्यवसायांसाठी बँकांनी कर्जपुरवठा केला आहे. महात्मा फुले अर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, अपंग बीजभांडवल योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) मार्फत हे कर्जवाटप करण्यात आले. या सर्व महामंडळाच्या माध्यमातून १२९१ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी मार्चअखेर ४९७ प्रकरणांची उद्दिष्टपूर्ती करण्यात आली. असे झाले कर्जवाटप विविध आर्थिक विकास महामंडळांमार्फत कर्जपुरवठय़ासाठी आलेली प्रकरणे बँकांकडे मंजुरीसाठी पाठविली जातात. त्यानुसार बँका योग्य असलेली प्रकरणे मंजूर करून कर्जपुरवठा करते. मार्च २0१५ पर्यंंत डीआयसीने ३२0 प्रकरणांचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी १३५ प्रकरणे मंजूर करण्यात आले. महात्मा फुले महामंडळामार्फत आलेल्या ४00 पैकी ११७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत आलेल्या १७२ पैकी १२0 प्रकरणे निकाली काढण्यात आली. वसंतराव नाईक अर्थिक विकास महामंडळाच्या ३0 प्रकरणांपैकी २६, तर अपंग बीजभांडवल योजनेच्या ३७९ प्रकरणांपैकी बँकांनी ९९ प्रकरणे मंजूर करून त्यांना कर्जपुरवठा केला.