शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

दाेन वर्षात मलेरियाचे केवळ १८ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र ...

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे़ जागतिक मलेरिया दिनानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेतला असला गत दाेन वर्षात केवळ १८ रुग्ण आढळले आहेत़ जिल्हा हिवताप कार्यालयाच्या ठोस उपाययोजनांमुळे चार महिन्यात हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे उपरोक्त आकडेवारी पाहता कोरोना काळातही बुलडाणा जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे.

मागील दहा वर्षात ठोस उपाययोजना व उपचारामुळे ही मलेरिया रुग्णांची संख्या हळूहळू खाली आली आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी हीच संख्या हजाराेंच्या संख्येने हाेती़ २०१९ मध्ये १३ व २०२० या वर्षात ५ असे एकूण या दोन वर्षात केवळ अठरा रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील चार महिन्यांत हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. राज्य स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यास २०१५ च्या हिवताप रुग्ण संख्येवरून हिवतापाचे दुरीकरण व हिवतापाचे समूळ उच्चाटन ठरावीक कालावधीत करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यानुुसार बुलडाणा जिल्ह्यास २०२५ पर्यंत हिवताप दुरीकरण करणे व हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. निदान तत्पर.. उपचार सत्वर.. हे ब्रीदवाक्य घेऊननुसार संशयित हिवताप रुग्णाचे रक्त नमुने घेऊन त्याची त्वरित तपासणी करून त्याच दिवशी उपचारास सुरुवात केली जाते. आतापर्यंत खासगी दवाखान्यातून ९८० रक्त नमुने गोळा करण्यात आले आहेत. परंतु त्यापैकी एकही हिवतापाचा रुग्ण आढळून आला नाही. तसेच खासगी प्रयोगशाळांना सुध्दा आरोग्य कर्मचारी भेटी देऊन त्यांच्याकडील हिवताप रुग्णाची माहिती गोळा करीत आहेत. त्यामुळे हिवतापाचे रुग्ण घटले आहेत़

३ लाखाच्यावर तपासणींची नोंद

मागील सन २०१९ मध्ये ४ लाख ८८ हजार ८३३ रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता त्यामध्ये १३ रुग्ण हिवतापाचे आढळून आले होते. तसेच २०२० मध्ये ३ लाख २४ हजार ३७ रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता हिवतापाचे पाच रुग्ण असे एकूण नाममात्र १८ रुग्ण आढळून आले होते.

काेट

गत काही वर्षात मलेरिया रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली असून जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल सुरू आहे़ आराेग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे परिश्रम व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे़ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळल्यास मलेरियाचे जिल्ह्यातून उच्चाटन हाेण्यास वेळ लागणार नाही़

एस.बी. चौहान, जिल्हा हिवताप अधिकारी