शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

दाेन वर्षात मलेरियाचे केवळ १८ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र ...

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे़ जागतिक मलेरिया दिनानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेतला असला गत दाेन वर्षात केवळ १८ रुग्ण आढळले आहेत़ जिल्हा हिवताप कार्यालयाच्या ठोस उपाययोजनांमुळे चार महिन्यात हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे उपरोक्त आकडेवारी पाहता कोरोना काळातही बुलडाणा जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे.

मागील दहा वर्षात ठोस उपाययोजना व उपचारामुळे ही मलेरिया रुग्णांची संख्या हळूहळू खाली आली आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी हीच संख्या हजाराेंच्या संख्येने हाेती़ २०१९ मध्ये १३ व २०२० या वर्षात ५ असे एकूण या दोन वर्षात केवळ अठरा रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील चार महिन्यांत हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. राज्य स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यास २०१५ च्या हिवताप रुग्ण संख्येवरून हिवतापाचे दुरीकरण व हिवतापाचे समूळ उच्चाटन ठरावीक कालावधीत करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यानुुसार बुलडाणा जिल्ह्यास २०२५ पर्यंत हिवताप दुरीकरण करणे व हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. निदान तत्पर.. उपचार सत्वर.. हे ब्रीदवाक्य घेऊननुसार संशयित हिवताप रुग्णाचे रक्त नमुने घेऊन त्याची त्वरित तपासणी करून त्याच दिवशी उपचारास सुरुवात केली जाते. आतापर्यंत खासगी दवाखान्यातून ९८० रक्त नमुने गोळा करण्यात आले आहेत. परंतु त्यापैकी एकही हिवतापाचा रुग्ण आढळून आला नाही. तसेच खासगी प्रयोगशाळांना सुध्दा आरोग्य कर्मचारी भेटी देऊन त्यांच्याकडील हिवताप रुग्णाची माहिती गोळा करीत आहेत. त्यामुळे हिवतापाचे रुग्ण घटले आहेत़

३ लाखाच्यावर तपासणींची नोंद

मागील सन २०१९ मध्ये ४ लाख ८८ हजार ८३३ रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता त्यामध्ये १३ रुग्ण हिवतापाचे आढळून आले होते. तसेच २०२० मध्ये ३ लाख २४ हजार ३७ रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता हिवतापाचे पाच रुग्ण असे एकूण नाममात्र १८ रुग्ण आढळून आले होते.

काेट

गत काही वर्षात मलेरिया रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली असून जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल सुरू आहे़ आराेग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे परिश्रम व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे़ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळल्यास मलेरियाचे जिल्ह्यातून उच्चाटन हाेण्यास वेळ लागणार नाही़

एस.बी. चौहान, जिल्हा हिवताप अधिकारी