शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

दाेन वर्षात मलेरियाचे केवळ १८ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र ...

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे़ जागतिक मलेरिया दिनानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेतला असला गत दाेन वर्षात केवळ १८ रुग्ण आढळले आहेत़ जिल्हा हिवताप कार्यालयाच्या ठोस उपाययोजनांमुळे चार महिन्यात हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे उपरोक्त आकडेवारी पाहता कोरोना काळातही बुलडाणा जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे.

मागील दहा वर्षात ठोस उपाययोजना व उपचारामुळे ही मलेरिया रुग्णांची संख्या हळूहळू खाली आली आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी हीच संख्या हजाराेंच्या संख्येने हाेती़ २०१९ मध्ये १३ व २०२० या वर्षात ५ असे एकूण या दोन वर्षात केवळ अठरा रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील चार महिन्यांत हिवतापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. राज्य स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यास २०१५ च्या हिवताप रुग्ण संख्येवरून हिवतापाचे दुरीकरण व हिवतापाचे समूळ उच्चाटन ठरावीक कालावधीत करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यानुुसार बुलडाणा जिल्ह्यास २०२५ पर्यंत हिवताप दुरीकरण करणे व हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. निदान तत्पर.. उपचार सत्वर.. हे ब्रीदवाक्य घेऊननुसार संशयित हिवताप रुग्णाचे रक्त नमुने घेऊन त्याची त्वरित तपासणी करून त्याच दिवशी उपचारास सुरुवात केली जाते. आतापर्यंत खासगी दवाखान्यातून ९८० रक्त नमुने गोळा करण्यात आले आहेत. परंतु त्यापैकी एकही हिवतापाचा रुग्ण आढळून आला नाही. तसेच खासगी प्रयोगशाळांना सुध्दा आरोग्य कर्मचारी भेटी देऊन त्यांच्याकडील हिवताप रुग्णाची माहिती गोळा करीत आहेत. त्यामुळे हिवतापाचे रुग्ण घटले आहेत़

३ लाखाच्यावर तपासणींची नोंद

मागील सन २०१९ मध्ये ४ लाख ८८ हजार ८३३ रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता त्यामध्ये १३ रुग्ण हिवतापाचे आढळून आले होते. तसेच २०२० मध्ये ३ लाख २४ हजार ३७ रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली असता हिवतापाचे पाच रुग्ण असे एकूण नाममात्र १८ रुग्ण आढळून आले होते.

काेट

गत काही वर्षात मलेरिया रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटली असून जिल्ह्याची हिवताप निर्मूलनाकडे वाटचाल सुरू आहे़ आराेग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे परिश्रम व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे़ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळल्यास मलेरियाचे जिल्ह्यातून उच्चाटन हाेण्यास वेळ लागणार नाही़

एस.बी. चौहान, जिल्हा हिवताप अधिकारी