शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

एक हजार नागरिकांना विंचू दंश

By admin | Updated: April 27, 2017 00:17 IST

वर्षभरातील घटना : ग्रामीण भागात धोका जास्त

बुलडाणा: आरोग्य विभागाला जसे साथींच्या आजारावर आणि इतर काही रोगांवर सर्वेक्षण करून उपचार करावे लागतात. तसेच ग्रामीण भागातील परिसरात होणाऱ्या विंचू दंश, श्वानदंश व सर्पदंश अशा रुग्णांवर वेळेत उपचार करून रुग्णांचा जीव वाचवावा लागतो. गेल्या एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या बारा महिन्यात जिल्ह्याभरात १०२४ लोकांना विंचू दंश झाल्याच्या घटना घडल्या; मात्र एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत प्राप्त झाली आहे.एप्रिल, मे आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये विंचू डंक मारण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ग्रामीण भागात विशेषत: एप्रिल व मे महिन्यामध्ये उष्ण वातावरणामुळे रात्रीचे विंचू बाहेर पडतात, तर हिवाळ्यात बऱ्याच अडगळीत विंचू दबा धरुन बसलेले असतात. त्यामुळे याकाळात विंचू दंशाचे प्रमाण वाढते. यामुळे घरकाम व शेतीचे काम करताना बऱ्याचवेळा विंचू दंश होण्याचे प्रमाण जास्त आहे.जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व १२ ग्रामीण रुग्णालयात गत वर्षभरात विंचू दंशाचे १०२४ रुग्ण नोंदविण्यात आली. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ५६० एवढी जास्त आढळून आली. या दंशावरती आरोग्य विभागात औषध उपचार उपलब्ध असल्याने या रुग्णांवरती तातडीने उपचार करुन संभाव्य धोका टाळण्यात आला.वर्षभरात झालेल्या विंचू दंशांची नोंदबुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात १६० विंचू दंश रुग्ण तर खामगाव सामान्य रुग्णालयात १९३ नोंद आहे. उपजिल्हा रुग्णालय शेगावमध्ये ८५, मलकापूरमध्ये ९ रुग्णांची नोंद आहे. तर चिखली ग्रामीण रुग्णालयात १६९, दे.मही ११०, देऊळगावराजामध्ये ७०, सिंदखेडराजामध्ये ७०, बिबी ११, लोणार १२, लाखनवाडा १३, वरवट बकाल २८, ज.जमोद ३४, मोताळा २१ आणि धाड ग्रामीण रुग्णालयात २८ रुग्ण अशी एकूण १०२४ विंचू दंश रुग्णांची नोंद बारा महिन्यात करण्यात आली.विंचू व सर्प दंश झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा प्रकारचे प्रथम आपल्या जवळच्या आरोग्य विभागात संपर्क साधून उपचार घ्यावात, वैद्यकीय उपचार घेण्यास उशीर झाल्यास त्या रुग्णाच्या जीवास धोका पोहोचण्याची शक्यता असते. -डॉ.ए.व्ही.सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.