बुलडाणा: आरोग्य विभागाला जसे साथींच्या आजारावर आणि इतर काही रोगांवर सर्वेक्षण करून उपचार करावे लागतात. तसेच ग्रामीण भागातील परिसरात होणाऱ्या विंचू दंश, श्वानदंश व सर्पदंश अशा रुग्णांवर वेळेत उपचार करून रुग्णांचा जीव वाचवावा लागतो. गेल्या एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या बारा महिन्यात जिल्ह्याभरात १०२४ लोकांना विंचू दंश झाल्याच्या घटना घडल्या; मात्र एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत प्राप्त झाली आहे.एप्रिल, मे आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये विंचू डंक मारण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ग्रामीण भागात विशेषत: एप्रिल व मे महिन्यामध्ये उष्ण वातावरणामुळे रात्रीचे विंचू बाहेर पडतात, तर हिवाळ्यात बऱ्याच अडगळीत विंचू दबा धरुन बसलेले असतात. त्यामुळे याकाळात विंचू दंशाचे प्रमाण वाढते. यामुळे घरकाम व शेतीचे काम करताना बऱ्याचवेळा विंचू दंश होण्याचे प्रमाण जास्त आहे.जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व १२ ग्रामीण रुग्णालयात गत वर्षभरात विंचू दंशाचे १०२४ रुग्ण नोंदविण्यात आली. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ५६० एवढी जास्त आढळून आली. या दंशावरती आरोग्य विभागात औषध उपचार उपलब्ध असल्याने या रुग्णांवरती तातडीने उपचार करुन संभाव्य धोका टाळण्यात आला.वर्षभरात झालेल्या विंचू दंशांची नोंदबुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात १६० विंचू दंश रुग्ण तर खामगाव सामान्य रुग्णालयात १९३ नोंद आहे. उपजिल्हा रुग्णालय शेगावमध्ये ८५, मलकापूरमध्ये ९ रुग्णांची नोंद आहे. तर चिखली ग्रामीण रुग्णालयात १६९, दे.मही ११०, देऊळगावराजामध्ये ७०, सिंदखेडराजामध्ये ७०, बिबी ११, लोणार १२, लाखनवाडा १३, वरवट बकाल २८, ज.जमोद ३४, मोताळा २१ आणि धाड ग्रामीण रुग्णालयात २८ रुग्ण अशी एकूण १०२४ विंचू दंश रुग्णांची नोंद बारा महिन्यात करण्यात आली.विंचू व सर्प दंश झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा प्रकारचे प्रथम आपल्या जवळच्या आरोग्य विभागात संपर्क साधून उपचार घ्यावात, वैद्यकीय उपचार घेण्यास उशीर झाल्यास त्या रुग्णाच्या जीवास धोका पोहोचण्याची शक्यता असते. -डॉ.ए.व्ही.सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.
एक हजार नागरिकांना विंचू दंश
By admin | Updated: April 27, 2017 00:17 IST