शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार नागरिकांना विंचू दंश

By admin | Updated: April 27, 2017 00:17 IST

वर्षभरातील घटना : ग्रामीण भागात धोका जास्त

बुलडाणा: आरोग्य विभागाला जसे साथींच्या आजारावर आणि इतर काही रोगांवर सर्वेक्षण करून उपचार करावे लागतात. तसेच ग्रामीण भागातील परिसरात होणाऱ्या विंचू दंश, श्वानदंश व सर्पदंश अशा रुग्णांवर वेळेत उपचार करून रुग्णांचा जीव वाचवावा लागतो. गेल्या एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या बारा महिन्यात जिल्ह्याभरात १०२४ लोकांना विंचू दंश झाल्याच्या घटना घडल्या; मात्र एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत प्राप्त झाली आहे.एप्रिल, मे आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये विंचू डंक मारण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ग्रामीण भागात विशेषत: एप्रिल व मे महिन्यामध्ये उष्ण वातावरणामुळे रात्रीचे विंचू बाहेर पडतात, तर हिवाळ्यात बऱ्याच अडगळीत विंचू दबा धरुन बसलेले असतात. त्यामुळे याकाळात विंचू दंशाचे प्रमाण वाढते. यामुळे घरकाम व शेतीचे काम करताना बऱ्याचवेळा विंचू दंश होण्याचे प्रमाण जास्त आहे.जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व १२ ग्रामीण रुग्णालयात गत वर्षभरात विंचू दंशाचे १०२४ रुग्ण नोंदविण्यात आली. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ५६० एवढी जास्त आढळून आली. या दंशावरती आरोग्य विभागात औषध उपचार उपलब्ध असल्याने या रुग्णांवरती तातडीने उपचार करुन संभाव्य धोका टाळण्यात आला.वर्षभरात झालेल्या विंचू दंशांची नोंदबुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात १६० विंचू दंश रुग्ण तर खामगाव सामान्य रुग्णालयात १९३ नोंद आहे. उपजिल्हा रुग्णालय शेगावमध्ये ८५, मलकापूरमध्ये ९ रुग्णांची नोंद आहे. तर चिखली ग्रामीण रुग्णालयात १६९, दे.मही ११०, देऊळगावराजामध्ये ७०, सिंदखेडराजामध्ये ७०, बिबी ११, लोणार १२, लाखनवाडा १३, वरवट बकाल २८, ज.जमोद ३४, मोताळा २१ आणि धाड ग्रामीण रुग्णालयात २८ रुग्ण अशी एकूण १०२४ विंचू दंश रुग्णांची नोंद बारा महिन्यात करण्यात आली.विंचू व सर्प दंश झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा प्रकारचे प्रथम आपल्या जवळच्या आरोग्य विभागात संपर्क साधून उपचार घ्यावात, वैद्यकीय उपचार घेण्यास उशीर झाल्यास त्या रुग्णाच्या जीवास धोका पोहोचण्याची शक्यता असते. -डॉ.ए.व्ही.सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.