शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

दुष्काळग्रस्तांना एक दिवसाचे वेतन

By admin | Updated: January 5, 2016 02:08 IST

लोणार तालुक्यात कृषी विभागातील कर्मचार्‍यांनी घेतला पुढाकार.

मयूर गोलेच्छा / लोणार: सतत तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या नैसर्गिक आपदेमुळे अवघ्या महाराष्ट्रात दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाले आहे. या संकटावर समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. यामध्ये आता लोणार तालुक्याच्या कृषी विभागानेही दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आपले हात पुढे केले असून, तालुका कृषी विभागातील कार्यरत कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देणार असल्याचा निर्णय तालुक्यातील कृषी विभागातील कर्मचार्‍यांनी ४ जानेवारी रोजी स्थानिक कृषी कार्यालयात आयोजित सभेत घेतला आहे. राज्यात दुष्काळग्रस्त आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा वारु बेफान असताना त्यांच्या कुटुंबीयांना मदत करायला सर्वात आधी पुढे आले ते संवेदनशील सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. या दोघांनी आपल्या ह्यनामह्ण द्वारे राज्यातील विविध भागात जावून दुष्काळग्रस्त आणि कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना १५ हजार रुपयांची आर्थिक मदत वाटप केली. ह्यनामह्ण च्या या संवेदनशील उपक्रमास समाजातील सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आपले हात पुढे केले. त्यामध्येच आता शेतकर्‍यांशी बांधीलकी जपणार्‍या कृषी विभागानेही पुढाकार घेतला आहे. तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्या पुढाकारातून राज्यात पहिल्यांदाच कृषी विभागात कार्यरत कर्मचारी, अधिकारी आपले एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून जवळपास ३५ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकार्‍यांना देऊन शेतकर्‍यांसाठी मदतीत आपला खारीचा वाटा उचलत आहेत. सध्या राज्यातील शेतकरी बांधव दुष्काळाने होरपळून निघत असल्यामुळे त्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्यापरीने मदतीसाठी हात पुढे केल्यास दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्येवर काही प्रमाणावर राज्य शासनावरील भार हलका होईल. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या घरातील समस्या गंभीर आहे. तुमची मोलाची मदत या परिस्थितीत शेतकर्‍यांच्या जीवनात काही प्रमाणात बदल घडविण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यांच्या चिंताग्रस्त चेहर्‍यावर आनंदाची झुळूक आणू शकते. कृषी विभागातील कर्मचार्‍यांचा आदर्श घेऊन इतर विभागातील कर्मचार्‍यांनी देखील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.