शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

लॉकडाऊन, अनलॉकदरम्यान जिल्ह्यात दीड हजार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST

बुलडाणा: लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या प्रारंभीक काळातील ११७ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल दीड हजार गुन्हे दाखल झाले होते. यापैकी ...

बुलडाणा: लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या प्रारंभीक काळातील ११७ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल दीड हजार गुन्हे दाखल झाले होते. यापैकी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल १ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केल्या गेला होता. दाखल गुन्ह्यांमध्ये तब्बल २,५४९ जणांना अटकही करण्यात आली होती.या कालावधीत जिल्ह्यातंर्गत आणि राज्याच्या सिमांवर एकूण ३३ चेकपोस्ट उभारण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात प्रामुख्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले होते. थोडक्यात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण या कालावधी वाढले होते. त्यासंदर्भाने २१ गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली होती. यातील १३३ पैकी ७६ आरोपींना अटकही केल्या गेली होती. त्यामुळे कोरोनाचा पहिल्या टप्प्यातील हा काळ फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून पोलिसांसाठी मोठा कठीण गेला होता.

--क्वारंटीन संदर्भात ३९ व्यक्तींवर गुन्हे--

लॉकडाऊन दरम्यान कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता संदिग्धांना क्वारंटीन करण्यात येत होते. मात्र या नियमांचे उल्लंघन केल्या जात होते. पोलिसांनाही जुमानल्या जात नव्हते. त्यामुळे अशा प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये ३९ व्यक्ती आरोपी होते. १५ प्रकरणांचा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय स्तरावरून तपास केल्या गेला होता.

--११ टक्क्यांनी वाढली गुन्हेगारी--

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण वाढला होता. तपासणी नाके, प्रतिबंधीत क्षेत्रात पोलिसांना कर्तव्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. परिणामस्वरुप २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्षात जिल्ह्यात ११ टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे समोर आले होते. वास्तविक जेथे २,७३२ पोलिस कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ २६०० पोलिस कर्मचारी या कालवधीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच कोरोना प्रतिबंधाच्या कालावधीत फ्रंटलाईन वर्कर्स म्हणन काम करत होते. त्याततही ३३ पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही पोलिस दलात कमतरता होती. आताही मनुष्यबळाच्या बाबतीत असेच चित्र आहे. त्यामुळे २६ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पोलिस दलता मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे आहे.