शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
4
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
7
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
8
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
9
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
10
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
11
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
12
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
13
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
14
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
15
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
16
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
17
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
18
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
19
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
20
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!

लॉकडाऊन, अनलॉकदरम्यान जिल्ह्यात दीड हजार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST

बुलडाणा: लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या प्रारंभीक काळातील ११७ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल दीड हजार गुन्हे दाखल झाले होते. यापैकी ...

बुलडाणा: लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाच्या प्रारंभीक काळातील ११७ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल दीड हजार गुन्हे दाखल झाले होते. यापैकी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल १ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केल्या गेला होता. दाखल गुन्ह्यांमध्ये तब्बल २,५४९ जणांना अटकही करण्यात आली होती.या कालावधीत जिल्ह्यातंर्गत आणि राज्याच्या सिमांवर एकूण ३३ चेकपोस्ट उभारण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात प्रामुख्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले होते. थोडक्यात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण या कालावधी वाढले होते. त्यासंदर्भाने २१ गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली होती. यातील १३३ पैकी ७६ आरोपींना अटकही केल्या गेली होती. त्यामुळे कोरोनाचा पहिल्या टप्प्यातील हा काळ फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून पोलिसांसाठी मोठा कठीण गेला होता.

--क्वारंटीन संदर्भात ३९ व्यक्तींवर गुन्हे--

लॉकडाऊन दरम्यान कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता संदिग्धांना क्वारंटीन करण्यात येत होते. मात्र या नियमांचे उल्लंघन केल्या जात होते. पोलिसांनाही जुमानल्या जात नव्हते. त्यामुळे अशा प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये ३९ व्यक्ती आरोपी होते. १५ प्रकरणांचा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय स्तरावरून तपास केल्या गेला होता.

--११ टक्क्यांनी वाढली गुन्हेगारी--

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण वाढला होता. तपासणी नाके, प्रतिबंधीत क्षेत्रात पोलिसांना कर्तव्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. परिणामस्वरुप २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्षात जिल्ह्यात ११ टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे समोर आले होते. वास्तविक जेथे २,७३२ पोलिस कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ २६०० पोलिस कर्मचारी या कालवधीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच कोरोना प्रतिबंधाच्या कालावधीत फ्रंटलाईन वर्कर्स म्हणन काम करत होते. त्याततही ३३ पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही पोलिस दलात कमतरता होती. आताही मनुष्यबळाच्या बाबतीत असेच चित्र आहे. त्यामुळे २६ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पोलिस दलता मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे आहे.