शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

विवाह सोहळ्यांवर वाढले पुन्हा एकदा कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राहेरी : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत. अनलॉकनंतर आता कुठे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राहेरी : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत.

अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत होते; मात्र पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे सुरू झालेले व्यवहार, उद्योग पुन्हा संकटात सापडले आहेत. या कडक निर्बंधांमुळे विवाह सोहळ्यांवर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.

अगोदरच लग्नकार्य, धार्मिक सोहळे यासह इतर अनेक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने निगडीत सर्व व्यवसायांवर संकट आले आहे. आता परत एकदा घातलेल्या मर्यादेमुळे पुन्हा व्यवसाय अडचणीत आला असून, यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेने सर्वांना घेरले आहे, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न सोहळा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या सोहळ्यात माणूस कोणतीही तडजोड करत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते. त्यामुळे ते धुमधडाक्‍यात व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अलिकडे लग्न ही घरासमोर न करता, लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केली जातात. त्याठिकाणी सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात तसेच कुटुंबातील व्यक्तींची धावपळ होत नाही. लॉन्सचा मालक वाद्य, जेवण, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, जेवणाची सर्व सोय, पाहुण्यांची देखभाल करणारे केटरर्स, हार-पुष्पगुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा असे सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे सर्वात जास्त कल हा लाॅन्सवर लग्न करण्याकडे असतो. एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आणि आर्थिक बजेट सर्व याच व्यवसायावर अवलंबून असते. शिवाय लॉन मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात. यंदा मात्र जवळपास एक वर्ष लग्नसोहळे बंद होते. लग्नसोहळे थोडक्या माणसात साजरे करण्याचे फर्मान काढल्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आताच्या घडीला लग्नप्रसंगीसुद्धा वऱ्हाडी मंडळी मास्क न घालता बेफिकिरी दाखवत आहेत. म्हणून आपणच कोराेना संक्रमण वाढीसाठी जबाबदार आहोत; पण एका सोहळ्यावर अनेक व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे लग्न समारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे कठोर पालन करून उद्योग सुरू ठेवण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत.

गेल्यावर्षीपासून कोविडमुळे लग्न समारंभाला मर्यादा आल्यामुळे आमच्या बिछायत केंद्र व्यवसायावर फार मोठे संकट आले असून, आमचा बिछायत केंद्र व्यवसाय २० टक्क्यांवरच आला आहे. तरी मला यामुळे किराणा दुकान पर्याय म्हणून सुरू करावे लागले आहे.

अशोकराव सोनुने, बिछायत केंद्र, राहेरी बु.