शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

विवाह सोहळ्यांवर वाढले पुन्हा एकदा कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST

राहेरी - कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत. अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू ...

राहेरी - कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत.

अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत होते; मात्र पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे सुरू झालेले व्यवहार, उद्योग पूर्ण बंद करावे लागतात की काय, अशी परिस्थिती सध्या शहरांसह ग्रामीण भागात दिसून येत आहे. अगोदरच लग्नकार्य, धार्मिक सोहळे यासह इतर अनेक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने निगडीत सर्व व्यवसायांवर संकट आले आहे. आता परत एकदा घातलेल्या मर्यादेमुळे पुन्हा व्यवसाय अडचणीत आला असून, यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेने सर्वांना घेरले आहे, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न सोहळा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या सोहळ्यात माणूस कोणतीही तडजोड करत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते. त्यामुळे ते धूमधडाक्‍यात व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अलीकडे लग्ने ही घरासमोर न करता लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केली जातात. त्या ठिकाणी सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात तसेच कुटुंबातील व्यक्तींची धावपळ होत नाही. लॉन्सचा मालक वाद्य, जेवण, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, जेवणाची सर्व सोय, पाहुण्यांची देखभाल करणारे केटरर्स, हार-पुष्पगुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा असे सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे सर्वात जास्त कल हा लाॅन्सवर लग्न करण्याकडे असतो. एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आणि आर्थिक बजेट सर्व याच व्यवसायावर अवलंबून असते. शिवाय लॉन्स मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात. यंदा मात्र जवळपास एक वर्ष लग्नसोहळे बंद होते. यादरम्यान अनेकांनी घरापुढे चार पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न लावले; परंतु त्यानंतर या विवाह सोहळ्यांना परवानगी मिळाली, तीसुद्धा अनेक अटींवर. यामुळे पूर्वीसारखे थाटामाटाचे दिवस आता नाहीत. कोरोना संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी लग्न सोहळा अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. लग्नसोहळे थोडक्या माणसात साजरे करण्याचे फर्मान काढल्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आताच्या घडीला लग्नप्रसंगीसुद्धा वऱ्हाडी मंडळी मास्क न घालता बेफिकीर फिरत आहेत. म्हणून आपणच कोराेना संक्रमण वाढीस जबाबदार आहोत; पण एका सोहळ्यावर अनेक व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे लग्न समारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे कठोर पालन करून उद्योग सुरू ठेवण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत.

*

गेल्यावर्षीपासून कोविडमुळे लग्न समारंभाला मर्यादा आल्यामुळे आमच्या बिछायत केंद्र व्यवसायावर फार मोठे संकट आले असून, आमचा बिछायत केंद्र व्यवसाय २० टक्क्यांवरच आला आहे. तरी मला यामुळे किराणा दुकान पर्याय म्हणून सुरू करावे लागले आहे.

अशोकराव सोनुने,

बिछायत केंद्र, राहेरी बु ....