शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विवाह सोहळ्यांवर वाढले पुन्हा एकदा कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST

राहेरी - कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत. अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू ...

राहेरी - कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिक तसेच हातमजूर अडचणीत सापडले आहेत.

अनलॉकनंतर आता कुठे सर्वच व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत होते; मात्र पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे सुरू झालेले व्यवहार, उद्योग पूर्ण बंद करावे लागतात की काय, अशी परिस्थिती सध्या शहरांसह ग्रामीण भागात दिसून येत आहे. अगोदरच लग्नकार्य, धार्मिक सोहळे यासह इतर अनेक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने निगडीत सर्व व्यवसायांवर संकट आले आहे. आता परत एकदा घातलेल्या मर्यादेमुळे पुन्हा व्यवसाय अडचणीत आला असून, यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेने सर्वांना घेरले आहे, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न सोहळा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या सोहळ्यात माणूस कोणतीही तडजोड करत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते. त्यामुळे ते धूमधडाक्‍यात व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अलीकडे लग्ने ही घरासमोर न करता लॉन्स किंवा मंगल कार्यालयात केली जातात. त्या ठिकाणी सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात तसेच कुटुंबातील व्यक्तींची धावपळ होत नाही. लॉन्सचा मालक वाद्य, जेवण, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, जेवणाची सर्व सोय, पाहुण्यांची देखभाल करणारे केटरर्स, हार-पुष्पगुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा असे सर्व एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे सर्वात जास्त कल हा लाॅन्सवर लग्न करण्याकडे असतो. एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आणि आर्थिक बजेट सर्व याच व्यवसायावर अवलंबून असते. शिवाय लॉन्स मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात. यंदा मात्र जवळपास एक वर्ष लग्नसोहळे बंद होते. यादरम्यान अनेकांनी घरापुढे चार पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न लावले; परंतु त्यानंतर या विवाह सोहळ्यांना परवानगी मिळाली, तीसुद्धा अनेक अटींवर. यामुळे पूर्वीसारखे थाटामाटाचे दिवस आता नाहीत. कोरोना संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी लग्न सोहळा अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. लग्नसोहळे थोडक्या माणसात साजरे करण्याचे फर्मान काढल्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आताच्या घडीला लग्नप्रसंगीसुद्धा वऱ्हाडी मंडळी मास्क न घालता बेफिकीर फिरत आहेत. म्हणून आपणच कोराेना संक्रमण वाढीस जबाबदार आहोत; पण एका सोहळ्यावर अनेक व्यवसाय अवलंबून असतात. त्यामुळे लग्न समारंभ साजरे करण्यासाठी नियमांचे कठोर पालन करून उद्योग सुरू ठेवण्याची मागणी व्यावसायिक करत आहेत.

*

गेल्यावर्षीपासून कोविडमुळे लग्न समारंभाला मर्यादा आल्यामुळे आमच्या बिछायत केंद्र व्यवसायावर फार मोठे संकट आले असून, आमचा बिछायत केंद्र व्यवसाय २० टक्क्यांवरच आला आहे. तरी मला यामुळे किराणा दुकान पर्याय म्हणून सुरू करावे लागले आहे.

अशोकराव सोनुने,

बिछायत केंद्र, राहेरी बु ....