शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

मानधनाअभावी वृद्धांची फरफट!

By admin | Updated: February 19, 2016 01:38 IST

संजय गांधी निराधार योजनेच्या समितीअभावी कामे झाली ठप्प.

बुलडाणा: भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने सत्ता स्थापन करून वर्ष उलटून गेले तरी विविध लोकपयोगी योजना गतिमान करण्यासाठी कार्यरत यंत्रणा कमी पडत आहे. परिणामी लोकांची कामे विलंबाने होत आहेत. महसूल विभागांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयाला संजय गांधी निराधार योजनेची समिती आहे. मागील सरकारच्या कार्यकाळातील या समित्या बरखास्त करण्यात आल्या. आता नव्याने या समित्या कार्यान्वित करणे गरजेचे असताना, त्यांचे पुनर्गठण अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे श्रावण बाळ, वृद्धापकाळ व संजय गांधी निराधार योजनेची कामे रखडली आहेत. त्यामुळे वृद्धांची फरफट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात १३ तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यात समिती आहे. यापैकी एकाही तालुक्यातील समिती अद्याप गठित करण्यात आलेली नाही. सत्ताधारी राजकीय पक्षांचे वर्चस्व असलेल्या या समित्यांचे अध्यक्ष तथा सदस्य हे निराधार, वृद्ध तथा अपंग, विधवा, घटस्फोटित यांसह विविध गटांत मोडणार्‍या विविध प्रकरणांची नियमानुसार तपासणी करून प्रस्तावाला मंजुरी देत असतात; परंतु मागील एक वर्षापासून समित्या गठित झाल्या नसल्यामुळे कामे रेंगाळली आहेत. प्रकरणे निकाली काढण्यास अधिक विलंब होत आहे. ग्रमीण भागातील गोरगरीब, निरा२िँं१्रूँं१त, विधवा, परितक्त्या घटकातील लोकांचा जगण्याचा केवळ हाच एक आधार असल्यामुळे सामाजिक न्यायाच्या भावनेतून सत्ताधार्‍यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. महागाई वाढल्याने वृद्ध, निराधार, अनाथ लाभार्थींंची दोन वेळच्या जेवणाची भ्रांती असून, ते शासनाकडे मद तीचा हात मागत आहे. धन तर दूरच, साधा मानही सामान्यांना मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.