शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी संघर्ष गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासह शेतकरी हिताच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, तीन कायद्याविरोधात जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी केंद्रित सत्तेत असलेल्या भाजप विरोधात ...

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासह शेतकरी हिताच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, तीन कायद्याविरोधात जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी केंद्रित सत्तेत असलेल्या भाजप विरोधात आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. त्यातच २०२० च्या प्रारंभीच जिल्ह्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री बनण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल जल्लोषाचे वातावरण होते. १० जानेवारी रोजी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही याच महिन्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांची नियुक्ती केली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांचा आपत्कालीन सेल कार्यान्वित करून सामाजिक बांधीलकी जोपासण्यास प्राधान्य दिले. तर कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात भिलवाडा पॅटर्न राबविण्याच्या मागणीवर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी प्रशासनास धारेवर धरले. विधान परिषदेच्या एका जागेसाठीही ते आग्रही होते.

या व्यतिरिक्त भुसावळ, अमरावती मामु ट्रेन सुरू करण्यासाठी खा. प्रतापराव जाधव यांनी वर्षाच्या प्रारंभी जोर लावला होता. त्यांची ही मागणी मान्य होऊन ही ट्रेन सुरू झाली; मात्र नंतर कोरोनामुळे दळणवळणही बंद पडले होते.

जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा ड्यू आल्यामुळे बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. दोन वेळा त्यास मुदतवाढ घेण्यात आली. प्रकरणी बाजार समित्यांमधील राजकारण तापले. थेट पणन संचालकांकडे प्रकरणे दाखल झाल्याने काही ठिकाणी संचालक मंडळाला पुन्हा बाजार समितीवर जाता आले.

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वर्षाच्या प्रारंभीच वाजने अपेक्षित होते; मात्र कोरोना संसर्गामुळे त्या पुढे ढकलल्या गेल्या. वर्षाच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; पण सरपंचपद आरक्षण रद्द केल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघाले. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात वर्षाच्या शेवटी काहीशी चेतना आली. शिक्षण क्षेत्र त्यामुळे ढवळून निघाले होते.