शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी महिला कागदोपत्री राहू नये!

By admin | Updated: May 17, 2017 00:31 IST

लोकमत परिचर्चेतील सूर : महिला सक्षमीकरणानेच लोकशाही बळकट होईल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पतीराजांनी कारभारात हस्तक्षेप केल्यास संबंधित महिला पदाधिकाऱ्यास पद गमवावे लागणार आहे, असा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर निर्णय योग्य असून, त्यामुळे महिलांना काम करण्याची संधी मिळेल. खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल व महिला पदाधिकारी केवळ कागदोपत्री राहणार नाहीत, असा सूर मंगळवारी ‘पतींच्या हस्तक्षेपामुळे जाणार महिला सदस्यांचे पद ? हा निर्णय योग्य की अयोग्य?’ या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला. महिला पदाधिकारी घरात आणि पतिराजांचा कारभार जोरात, अशी स्थिती असल्यामुळे पतीराजांच्या हस्तक्षेपामुळे महिला सदस्याचे पद रद्द, या निर्णयाची अंमलबजावणी जोरदार सुरू झाली आहे. पतीराजांना महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगर परिषदेच्या शासकीय कामकाजात हस्तक्षेप करता येणार नाही. महापालिका, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हस्तक्षेप करणे, गटार का उपसले नाही, पाणी का सोडले नाही, औषध का फवारले नाही, टँकर का पाठविला नाही, म्हणून शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणे किंवा त्यांच्या कामात अडथळा आणल्यास त्यांच्या पत्नीला महापौर किंवा नगरसेविका पद गमवावे लागणार आहे. महिला पदाधिकाऱ्यांकडे निर्णयक्षमता यावी, एखादा निर्णय चुकला तरी चालेल; पण त्यांना निर्णय घेता यावा, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांना आरक्षण दिले असताना ही पदे केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली जाऊ नयेत, याचीही खबरदारी शासनाकडून घेतली जात आहे. सदर निर्णय योग्य असून, महिलांना कामाची संधी मिळेल, लोकशाही बळकट होईल, असा सूर परिचर्चेत उमटला. महिला सक्षमीकरणासाठी शासनाने विविध क्षेत्रात महिलांना आरक्षणाच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला, तरी निवडणुकीत सहभागी होणाऱ्या महिलेला किंवा पुरूषाला त्या क्षेत्रातील किती ज्ञान आहे, याबाबत काही अटी ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलेला चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळेल, या माध्यमातून विकास साधता येईल व खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल. -किरण खिल्लारे, बुलडाणाराज्यात पुरूषांच्या तुलनेत महिला पदाधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यंत कमी असून, काम करण्याची क्षमता जास्त आहे. जर निवडून येणाऱ्या महिलांना त्यांच्या अधिकारात ढवळा-ढवळ न करता अधिकार वापरण्याची संधी दिली तर आपल्या देशात आमूलाग्र बदल घडेल व राजकारणातील भ्रष्टाचाराला आळा बसेल. त्यामुळे महिला प्रतिनिधींआडून त्यांचे काम त्यांचे पती करत असतील तर त्या महिलेचे पद रद्द करण्याचा निर्णय योग्य राहील. त्यामुळे महिलांना काम करण्याची चांगली संधी मिळेल व त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होईल. -मीना कुलकर्णी, बुलडाणानिवडणूक आयोगाने महिलांना व्यक्तिमत्त्व व त्यांच्या कार्यशीलतेला वाव देण्यासाठी निवडणुकीत अनेक पदे राखीव ठेवली आहेत; परंतु सुरुवातीपासून संबंधित पदावर असलेल्या महिलांचे नातेवाइक त्या महिलेला स्वावलंबीपणे काम करू देत नाहीत. प्रत्येक महिला आपल्या घराला निट-नेटके ठेवते. घरासाठी चांगले नियोजन करते. घरातील लहान सदस्यांचे संगोपन करते, वृद्ध मंडळीची देखभाल करते. यावरून महिलेमध्ये चांगले काम करण्याची निर्णय क्षमता असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे शासनाने जो निर्णय घेतला तो चांगला असून, अनेक महिलांना स्वतंत्र काम करण्याची संधी मिळेल.- आरती राऊत, बुलडाणामहिलांना ५० टक्के आरक्षण देऊन शासनाने महिलांचा सन्मान केला आहे; परंतु राजकारण क्षेत्र फार वेगळे आहे. राजकारणात येणाऱ्या प्रत्येक महिला त्या पदासाठी किंवा त्या क्षेत्रासाठी सक्षमपणे काम करण्याचा निर्णय घेऊ शकतील, असे सांगता येत नाही. अनेक महिला पदाधिकारी प्रत्येक निवडणुकीत नवीन असतात. अशा परिस्थितीत त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ज्या महिला स्वतंत्रपणे काम करतात, ते कौतुकास पात्र आहेत; मात्र ज्या महिलांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांनी मार्गदर्शन मागितल्यास व संबंधितांनी मार्गदर्शन केल्यास हरकत नाही. म्हणून सदर निर्णय अयोग्य आहे.- अशोक इंगळे, माजी जि.प.सदस्य,बुलडाणाशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे महिलांना न्याय मिळेल; परंतु प्रत्येक पदाधिकाऱ्याला चांगले काम करण्यासाठी सल्लागाराची गरज असते. त्यामुळे महिला पदाधिकारी पती किंवा कुटुंबातील मोठ्या सदस्यांचा सल्ला घेतात. त्याला कारभारात हस्तक्षेप म्हणता येणार नाही. याशिवाय महिलांना सक्षम करायचे असेल तर निवडणुकीच्या वेळी महिलांचे शिक्षण, त्या क्षेत्रातील अनुभवाची अट टाकल्यास पुढील निवडणुकीत सक्षम महिला निवडून येईल. यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.-अनंता लहासे, बुलडाणा