शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

हगणदरीमुक्ती कागदावरच : शौचालये बांधली; मात्र वापर नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:15 IST

Buldhana News शाैचालये बांधण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा वापरच हाेत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्देपुरस्कार मिळविणाऱ्या गावातही हगणदरी कायम असल्याचे चित्र आहे.  कुठलीही पडताळणी हाेत नसल्याने गैरप्रकार समाेर आला नाही. ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथके कार्यान्वित करण्याची गरज आहे. 

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काेट्यवधी रुपयांचा खर्च करून घराेघरी शाैचालये बांधण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा वापरच हाेत नसल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. एवढेच नव्हे तर पुरस्कार मिळविणाऱ्या गावातही हगणदरी कायम असल्याचे चित्र आहे. शाैचालय बांधण्यासाठी राज्य शासन काेट्यावधी रुपयांचे अनुदान देते. पाच वर्षात ३ लाख ८४ हजार २२७ शाैचालये बांधण्यात आली आहेत. शाैचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाली असली तरी ग्रामस्थ त्याचा वापरच करत नसल्याचे अमडापूर, डाेणगावसह इतर गावांमध्ये आढळले. गावांमध्ये केवळ अनुदान घेण्यासाठी शाैचालये बांधण्यात आली आहेत. अनेक गावांमध्ये शाैचालय अनुदानातही माेठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. एकाच लाभार्थ्यांना दाेनदा अनुदान देण्यात आले आहेत. याची कुठलीही पडताळणी हाेत नसल्याने गैरप्रकार समाेर आला नाही. तसेच शाैचायलांचा वापर ग्रामस्थ करीत आहेत किंवा नाही याविषयी ग्रामंपचायत प्रशासन कुठलीही पडताळणी करीत नसल्याने शाैचालये अडगळीत पडल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. त्यामुळे शाैचालयांचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. तसेच ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथके कार्यान्वित करण्याची गरज आहे. 

शौचालयांचा वापर      इंधन ठेवण्यासाठीजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये इंधन ठेवण्यासाठी शाैचालयाचा वापर करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी शाैचालयांना कुलूप लावण्यात आले आहे. शाैचालयांना पाणी जास्त लागते. ग्रामीण भागात कायम पाणीटंचाई असते. त्यामुळेही शाैचालयांचा वापर हाेत नसल्याचे चित्र आहे. काही ग्रामस्थांची मानसिकता कायम आहे.

‘जैसे थे’ स्थिती हगणदरीमुक्त झालेल्या गावांना राज्य व जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्यात आलेले आहेत; मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर या गावांमध्ये हगणदारी कायम असल्याचे चित्र आहे. अनेक गावे केवळ कागदावरच हगणदरीमुक्त झाल्याचे चित्र आहे.

ऐनखेड गावाला सन २०१५,१६ हगणदरीमुक्त ग्रामचा पुरस्कार मिळाला हाेता. ६०० लाेकसंख्या असलेल्या गावात घराेघरी शाैचालये बांधण्यात आली आहे. तसेच त्याचा वापरही ग्रामस्थ करीत आहेत. - श्रीकांत गिऱ्हे, माजी सरपंच, ऐनखेड

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान