शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीमुक्ती कागदावरच : शौचालये बांधली; मात्र वापर नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:15 IST

Buldhana News शाैचालये बांधण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा वापरच हाेत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्देपुरस्कार मिळविणाऱ्या गावातही हगणदरी कायम असल्याचे चित्र आहे.  कुठलीही पडताळणी हाेत नसल्याने गैरप्रकार समाेर आला नाही. ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथके कार्यान्वित करण्याची गरज आहे. 

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काेट्यवधी रुपयांचा खर्च करून घराेघरी शाैचालये बांधण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा वापरच हाेत नसल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. एवढेच नव्हे तर पुरस्कार मिळविणाऱ्या गावातही हगणदरी कायम असल्याचे चित्र आहे. शाैचालय बांधण्यासाठी राज्य शासन काेट्यावधी रुपयांचे अनुदान देते. पाच वर्षात ३ लाख ८४ हजार २२७ शाैचालये बांधण्यात आली आहेत. शाैचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाली असली तरी ग्रामस्थ त्याचा वापरच करत नसल्याचे अमडापूर, डाेणगावसह इतर गावांमध्ये आढळले. गावांमध्ये केवळ अनुदान घेण्यासाठी शाैचालये बांधण्यात आली आहेत. अनेक गावांमध्ये शाैचालय अनुदानातही माेठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. एकाच लाभार्थ्यांना दाेनदा अनुदान देण्यात आले आहेत. याची कुठलीही पडताळणी हाेत नसल्याने गैरप्रकार समाेर आला नाही. तसेच शाैचायलांचा वापर ग्रामस्थ करीत आहेत किंवा नाही याविषयी ग्रामंपचायत प्रशासन कुठलीही पडताळणी करीत नसल्याने शाैचालये अडगळीत पडल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. त्यामुळे शाैचालयांचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. तसेच ग्रामीण भागात गुड माॅर्निंग पथके कार्यान्वित करण्याची गरज आहे. 

शौचालयांचा वापर      इंधन ठेवण्यासाठीजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये इंधन ठेवण्यासाठी शाैचालयाचा वापर करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी शाैचालयांना कुलूप लावण्यात आले आहे. शाैचालयांना पाणी जास्त लागते. ग्रामीण भागात कायम पाणीटंचाई असते. त्यामुळेही शाैचालयांचा वापर हाेत नसल्याचे चित्र आहे. काही ग्रामस्थांची मानसिकता कायम आहे.

‘जैसे थे’ स्थिती हगणदरीमुक्त झालेल्या गावांना राज्य व जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्यात आलेले आहेत; मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर या गावांमध्ये हगणदारी कायम असल्याचे चित्र आहे. अनेक गावे केवळ कागदावरच हगणदरीमुक्त झाल्याचे चित्र आहे.

ऐनखेड गावाला सन २०१५,१६ हगणदरीमुक्त ग्रामचा पुरस्कार मिळाला हाेता. ६०० लाेकसंख्या असलेल्या गावात घराेघरी शाैचालये बांधण्यात आली आहे. तसेच त्याचा वापरही ग्रामस्थ करीत आहेत. - श्रीकांत गिऱ्हे, माजी सरपंच, ऐनखेड

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान