शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 23:48 IST

१ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.

सुधीर चेके पाटीलचिखली(बुलडाणा): बुलडाणा जिल्हय़ात दूध संकलन व वितरण केंद्रापेक्षा जास्त देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने, बार, वाईन शॉपची दुकाने होती. या दुकानांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने चाप बसल्याने आता केवळ बोटावर मोजण्याइतकीच दारूची दुकाने शिल्लक राहीली आहेत. सद्यस्थिती हे चित्र असले तरी महामार्गांवरून हद्दपार झालेली ही दुकाने महार्गांपासून ५00 मीटर अंतरावर पुन्हा थाटली जाणार आहेत. व पुन्हा दारूचा महापूर वाहून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होण्यास कारणीभूत ठरणार आहेत. ही वस्तुस्थिती पाहता किमान बंद झालेली ही दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत व नव्याने कोणाला परवाना मिळणार नाही यासाठी आता सुजान नागरीकांनी विशेषत: महिलांनी जागरूक राहणे गरजेचे असून येत्या १ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सध्या विशेषत: शहरा जवळील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५00 मिटर अंतरातील सर्व देशी दारूची दुकाने, बार, वाईन शॉपी, बियर शॉपी बंद आहेत. त्यामुळे तळीरामांच्या संख्येत काही अंशी घट होत आहे. सध्या बुलडाणा जिल्हय़ातील घाटावरील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, चिखली, देऊळगावराजा व बुलडाणा या सहा तालुक्यात सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे सुमारे ८0 टक्के मद्यविक्रीची दुकाने बंद झाली असून घाटावरील सहा तालुक्यात सद्यस्थितीत २0 देशी दारूची दुकाने, ९ बीयर शॉप, ८ वाईन बार आणि २ वाईन शॉप असे एकूण ३९ मद्यविक्रीची दुकाने शिल्लक राहीली आहेत. यामध्ये चिखली तालुक्यात मद्यविक्रीची एकूण ८९ परवानाधारक दुकाने होती. यात २ होलसेलर, ५७ वाईन बार, १६ देशी दारू व १४ बियर शॉपींचा समावेश होता. या एकूण ८९ पैकी तब्बल ७२ परवानाधारक दुकाने आजरोजी बंद आहेत. ग्रामपंचायतींचे ना हरकत प्रमाणपत्न असल्याशिवाय दारूचे दुकान सुरू करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी १ मे रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये दारूबंदीचे ठराव करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने शांतताप्रिय नागरिकांनी, महिलांनी आता सक्रीय होण्याची फारच गरज आहे, आपला दारू व अंमली पदार्थांना विरोध आहे हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. महामार्गाचे स्थानीय स्वराज्य संस्थांना होत असलेले हस्तांतरण थांबवले पाहिजे. गाव व शहरांत सध्या सुरु असलेली दारू दुकाने बंद करा किंवा शहराबाहेर त्यांना वेगळी जागा द्या ज्यायोगे कायदा व सुरक्षेचा धोका उद्भवणार नाही, यासाठी सामाजिक हीत जोपसणार्‍या पक्ष, संघटना, संस्थां, महिला मंडळे, बचत गट या सर्वांनी एकत्रीतपणे समोर येऊन प्रखर विरोध करणे गजरेचे आहे.