शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 23:48 IST

१ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.

सुधीर चेके पाटीलचिखली(बुलडाणा): बुलडाणा जिल्हय़ात दूध संकलन व वितरण केंद्रापेक्षा जास्त देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने, बार, वाईन शॉपची दुकाने होती. या दुकानांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने चाप बसल्याने आता केवळ बोटावर मोजण्याइतकीच दारूची दुकाने शिल्लक राहीली आहेत. सद्यस्थिती हे चित्र असले तरी महामार्गांवरून हद्दपार झालेली ही दुकाने महार्गांपासून ५00 मीटर अंतरावर पुन्हा थाटली जाणार आहेत. व पुन्हा दारूचा महापूर वाहून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होण्यास कारणीभूत ठरणार आहेत. ही वस्तुस्थिती पाहता किमान बंद झालेली ही दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत व नव्याने कोणाला परवाना मिळणार नाही यासाठी आता सुजान नागरीकांनी विशेषत: महिलांनी जागरूक राहणे गरजेचे असून येत्या १ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सध्या विशेषत: शहरा जवळील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५00 मिटर अंतरातील सर्व देशी दारूची दुकाने, बार, वाईन शॉपी, बियर शॉपी बंद आहेत. त्यामुळे तळीरामांच्या संख्येत काही अंशी घट होत आहे. सध्या बुलडाणा जिल्हय़ातील घाटावरील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, चिखली, देऊळगावराजा व बुलडाणा या सहा तालुक्यात सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे सुमारे ८0 टक्के मद्यविक्रीची दुकाने बंद झाली असून घाटावरील सहा तालुक्यात सद्यस्थितीत २0 देशी दारूची दुकाने, ९ बीयर शॉप, ८ वाईन बार आणि २ वाईन शॉप असे एकूण ३९ मद्यविक्रीची दुकाने शिल्लक राहीली आहेत. यामध्ये चिखली तालुक्यात मद्यविक्रीची एकूण ८९ परवानाधारक दुकाने होती. यात २ होलसेलर, ५७ वाईन बार, १६ देशी दारू व १४ बियर शॉपींचा समावेश होता. या एकूण ८९ पैकी तब्बल ७२ परवानाधारक दुकाने आजरोजी बंद आहेत. ग्रामपंचायतींचे ना हरकत प्रमाणपत्न असल्याशिवाय दारूचे दुकान सुरू करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी १ मे रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये दारूबंदीचे ठराव करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने शांतताप्रिय नागरिकांनी, महिलांनी आता सक्रीय होण्याची फारच गरज आहे, आपला दारू व अंमली पदार्थांना विरोध आहे हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. महामार्गाचे स्थानीय स्वराज्य संस्थांना होत असलेले हस्तांतरण थांबवले पाहिजे. गाव व शहरांत सध्या सुरु असलेली दारू दुकाने बंद करा किंवा शहराबाहेर त्यांना वेगळी जागा द्या ज्यायोगे कायदा व सुरक्षेचा धोका उद्भवणार नाही, यासाठी सामाजिक हीत जोपसणार्‍या पक्ष, संघटना, संस्थां, महिला मंडळे, बचत गट या सर्वांनी एकत्रीतपणे समोर येऊन प्रखर विरोध करणे गजरेचे आहे.