शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 23:48 IST

१ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.

सुधीर चेके पाटीलचिखली(बुलडाणा): बुलडाणा जिल्हय़ात दूध संकलन व वितरण केंद्रापेक्षा जास्त देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने, बार, वाईन शॉपची दुकाने होती. या दुकानांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने चाप बसल्याने आता केवळ बोटावर मोजण्याइतकीच दारूची दुकाने शिल्लक राहीली आहेत. सद्यस्थिती हे चित्र असले तरी महामार्गांवरून हद्दपार झालेली ही दुकाने महार्गांपासून ५00 मीटर अंतरावर पुन्हा थाटली जाणार आहेत. व पुन्हा दारूचा महापूर वाहून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होण्यास कारणीभूत ठरणार आहेत. ही वस्तुस्थिती पाहता किमान बंद झालेली ही दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत व नव्याने कोणाला परवाना मिळणार नाही यासाठी आता सुजान नागरीकांनी विशेषत: महिलांनी जागरूक राहणे गरजेचे असून येत्या १ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सध्या विशेषत: शहरा जवळील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५00 मिटर अंतरातील सर्व देशी दारूची दुकाने, बार, वाईन शॉपी, बियर शॉपी बंद आहेत. त्यामुळे तळीरामांच्या संख्येत काही अंशी घट होत आहे. सध्या बुलडाणा जिल्हय़ातील घाटावरील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, चिखली, देऊळगावराजा व बुलडाणा या सहा तालुक्यात सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे सुमारे ८0 टक्के मद्यविक्रीची दुकाने बंद झाली असून घाटावरील सहा तालुक्यात सद्यस्थितीत २0 देशी दारूची दुकाने, ९ बीयर शॉप, ८ वाईन बार आणि २ वाईन शॉप असे एकूण ३९ मद्यविक्रीची दुकाने शिल्लक राहीली आहेत. यामध्ये चिखली तालुक्यात मद्यविक्रीची एकूण ८९ परवानाधारक दुकाने होती. यात २ होलसेलर, ५७ वाईन बार, १६ देशी दारू व १४ बियर शॉपींचा समावेश होता. या एकूण ८९ पैकी तब्बल ७२ परवानाधारक दुकाने आजरोजी बंद आहेत. ग्रामपंचायतींचे ना हरकत प्रमाणपत्न असल्याशिवाय दारूचे दुकान सुरू करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी १ मे रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये दारूबंदीचे ठराव करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने शांतताप्रिय नागरिकांनी, महिलांनी आता सक्रीय होण्याची फारच गरज आहे, आपला दारू व अंमली पदार्थांना विरोध आहे हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. महामार्गाचे स्थानीय स्वराज्य संस्थांना होत असलेले हस्तांतरण थांबवले पाहिजे. गाव व शहरांत सध्या सुरु असलेली दारू दुकाने बंद करा किंवा शहराबाहेर त्यांना वेगळी जागा द्या ज्यायोगे कायदा व सुरक्षेचा धोका उद्भवणार नाही, यासाठी सामाजिक हीत जोपसणार्‍या पक्ष, संघटना, संस्थां, महिला मंडळे, बचत गट या सर्वांनी एकत्रीतपणे समोर येऊन प्रखर विरोध करणे गजरेचे आहे.