शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण आहार अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:25 IST

-  हर्षनंदन वाघबुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर १७ व्यक्तींच्या टिमची निवडण्यात येणार आहे. आदिवासी व ग्रामीण भागात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून ...

ठळक मुद्देबालकांसह किशोरवयीन मुली, महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जन्मत: कमी वजनाचे, कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. जन्मत: कमी वजनाचे असणाºया बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून पोषण आहार अभियान सन २०१७-१८ मध्ये राबविण्यात येत आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असून शासनाचे इतर आठ विभाग या अभियानासाठी सहकार्य करणार आहेत.

-  हर्षनंदन वाघ

बुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर १७ व्यक्तींच्या टिमची निवडण्यात येणार आहे. आदिवासी व ग्रामीण भागात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून बालकांसह किशोरवयीन मुली, महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जन्मत: कमी वजनाचे, कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ० ते ६ वर्षे वयोगटातील खुजे, बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी , १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणाºया बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून पोषण आहार अभियान सन २०१७-१८ मध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी केंद्र शासन ८० टक्के व राज्य २० टक्के प्रमाणे निधी उपलब्ध करून देणार आहे. सदर अभियान महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असून शासनाचे इतर आठ विभाग या अभियानासाठी सहकार्य करणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर अभिसरण समिती गठित करण्यात येणार आहे. त्यात जिल्हाधिकाºयांसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागचे अधिकाºयांचा समावेश राहणार आहे. तर जिल्हास्तरावर प्रकल्पराबविण्यासाठी जिल्हा समन्वयक १, जिल्हा प्रकल्प सहाय्यक १ व गट समन्वयक म्हणून १५ व्यक्तींची टिम बनविण्यात येणार आहे. सदर टिम अंगणवाडींची समन्वय ठेवणार असून जिल्ह्यातील २ हजार ७१८ अंगणवाडी केंद्रातील बालकांचा, किशोरवयीन मुली व महिलांचा पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवून घेणार आहे.

उद्दिष्ट गाठण्यासाठी या विभागाचे घेणार सहकार्य

पोषण आहार अभियानअंतर्गंत ठरविण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बाल विकास विभागासाठी शासनाचे विविध विभाग सहकार्य करणार आहे. त्यात ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नगरविकास विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, खाद्यपोषण आहार बोर्ड, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आदी विभागाचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना