शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण आहार अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:25 IST

-  हर्षनंदन वाघबुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर १७ व्यक्तींच्या टिमची निवडण्यात येणार आहे. आदिवासी व ग्रामीण भागात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून ...

ठळक मुद्देबालकांसह किशोरवयीन मुली, महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जन्मत: कमी वजनाचे, कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. जन्मत: कमी वजनाचे असणाºया बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून पोषण आहार अभियान सन २०१७-१८ मध्ये राबविण्यात येत आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असून शासनाचे इतर आठ विभाग या अभियानासाठी सहकार्य करणार आहेत.

-  हर्षनंदन वाघ

बुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर १७ व्यक्तींच्या टिमची निवडण्यात येणार आहे. आदिवासी व ग्रामीण भागात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून बालकांसह किशोरवयीन मुली, महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जन्मत: कमी वजनाचे, कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ० ते ६ वर्षे वयोगटातील खुजे, बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी , १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणाºया बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून पोषण आहार अभियान सन २०१७-१८ मध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी केंद्र शासन ८० टक्के व राज्य २० टक्के प्रमाणे निधी उपलब्ध करून देणार आहे. सदर अभियान महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असून शासनाचे इतर आठ विभाग या अभियानासाठी सहकार्य करणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर अभिसरण समिती गठित करण्यात येणार आहे. त्यात जिल्हाधिकाºयांसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागचे अधिकाºयांचा समावेश राहणार आहे. तर जिल्हास्तरावर प्रकल्पराबविण्यासाठी जिल्हा समन्वयक १, जिल्हा प्रकल्प सहाय्यक १ व गट समन्वयक म्हणून १५ व्यक्तींची टिम बनविण्यात येणार आहे. सदर टिम अंगणवाडींची समन्वय ठेवणार असून जिल्ह्यातील २ हजार ७१८ अंगणवाडी केंद्रातील बालकांचा, किशोरवयीन मुली व महिलांचा पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवून घेणार आहे.

उद्दिष्ट गाठण्यासाठी या विभागाचे घेणार सहकार्य

पोषण आहार अभियानअंतर्गंत ठरविण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बाल विकास विभागासाठी शासनाचे विविध विभाग सहकार्य करणार आहे. त्यात ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नगरविकास विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, खाद्यपोषण आहार बोर्ड, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आदी विभागाचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना