शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण आहार अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:25 IST

-  हर्षनंदन वाघबुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर १७ व्यक्तींच्या टिमची निवडण्यात येणार आहे. आदिवासी व ग्रामीण भागात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून ...

ठळक मुद्देबालकांसह किशोरवयीन मुली, महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जन्मत: कमी वजनाचे, कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. जन्मत: कमी वजनाचे असणाºया बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून पोषण आहार अभियान सन २०१७-१८ मध्ये राबविण्यात येत आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असून शासनाचे इतर आठ विभाग या अभियानासाठी सहकार्य करणार आहेत.

-  हर्षनंदन वाघ

बुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर १७ व्यक्तींच्या टिमची निवडण्यात येणार आहे. आदिवासी व ग्रामीण भागात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून बालकांसह किशोरवयीन मुली, महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जन्मत: कमी वजनाचे, कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ० ते ६ वर्षे वयोगटातील खुजे, बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी , १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणाºया बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून पोषण आहार अभियान सन २०१७-१८ मध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी केंद्र शासन ८० टक्के व राज्य २० टक्के प्रमाणे निधी उपलब्ध करून देणार आहे. सदर अभियान महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असून शासनाचे इतर आठ विभाग या अभियानासाठी सहकार्य करणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर अभिसरण समिती गठित करण्यात येणार आहे. त्यात जिल्हाधिकाºयांसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागचे अधिकाºयांचा समावेश राहणार आहे. तर जिल्हास्तरावर प्रकल्पराबविण्यासाठी जिल्हा समन्वयक १, जिल्हा प्रकल्प सहाय्यक १ व गट समन्वयक म्हणून १५ व्यक्तींची टिम बनविण्यात येणार आहे. सदर टिम अंगणवाडींची समन्वय ठेवणार असून जिल्ह्यातील २ हजार ७१८ अंगणवाडी केंद्रातील बालकांचा, किशोरवयीन मुली व महिलांचा पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवून घेणार आहे.

उद्दिष्ट गाठण्यासाठी या विभागाचे घेणार सहकार्य

पोषण आहार अभियानअंतर्गंत ठरविण्यात आलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बाल विकास विभागासाठी शासनाचे विविध विभाग सहकार्य करणार आहे. त्यात ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नगरविकास विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, खाद्यपोषण आहार बोर्ड, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आदी विभागाचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना