शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

दहावीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून शाळा बंद झाल्या. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम (वार्षिक) परीक्षा घेता आली नाही. ...

कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून शाळा बंद झाल्या. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम (वार्षिक) परीक्षा घेता आली नाही. त्यांना पुढील वर्गांमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यात नववीत ४६ हजार २५० विद्यार्थिसंख्या असून, यातील ४५ हजार ४५७ विद्यार्थी उत्तीर्ण दाखविण्यात आलेले आहेत. यापैकी किती विद्यार्थ्यांनी दहावीसाठी अर्ज केले याची माहिती अद्यापही माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त नाही. इतर काही नववीतील विद्यार्थिसंख्या आणि दहावीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज यामध्ये तफावत आढळली आहे. मग हे विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पटसंख्येचा घोळ

इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण (नापास) केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी हा मध्येच शाळाबाह्य झाला, तरी पटसंख्येसाठी तसे दाखविले जात नाही.

नववीतून दहावीसाठी अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणे

१. नववीमध्ये असलेले सर्वच विद्यार्थी दहावी जात नाहीत. त्यामुळे दहावीतील विद्यार्थिसंख्या कमी होते. त्यामागे

कुटुंबातील आई-वडिलांचे आजारपण व इतर अडचणी कारणीभूत असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

२. परराज्य, जिल्ह्यातून रोजगार, नोकरीनिमित्त स्थलांतरित झाल्यामुळे अनेक मुले दुसऱ्या शाळेत टाकली जातात. स्थलांतरण केल्याने काही विद्यार्थ्यांना दहावीमध्ये प्रवेशित होता आले नाही.

३. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष आहे; पण यंदा कोरोनामुळे शिक्षणाचे वेळापत्रक आणि स्वरूप बदलले आहे. ऑनलाइन शिक्षणातील मर्यादा, अभ्यास, नीट होत नसल्याने या महत्त्वाच्या वर्षामध्ये कमी गुण मिळतील, अशी भीती काही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी यंदा इअर ड्रॉप घेऊन पुढील वर्षी जोमाने परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वरूपातील कारणांमुळे दहावीमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थी प्रवेशित झाले नसल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी - ४५,४५७