शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

बुलडाणा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:32 IST

बुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून,  पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ८८ गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देबाष्पीभवनाचा फटका १२ गावात टँकर तर ८८ गावात विहिरींचे अधिग्रहण

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून,  पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ८८ गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मागील वर्षी शेवटी दमदार पावसाळा झाल्यामुळे उन्हाळ्यात काही गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती; मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पात अल्प जलसाठा आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच बाष्पीभवनामुळे काही प्रकल्पात आतापासून पाण्याचा ठणठणाट आहे, तर जमिनीखालील पाण्याची पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर २०१७ ते जून २०१८ नुसार कृती आराखडा प्रस्तावित केला होता. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ७९७ गावासाठी १ हजार १४८ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यासाठी १८९४.२५ लक्ष रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी  १०५ गावातील १२७ उपाययोजनांसाठी १८०.२० लक्ष रुपयांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ९८ गावात ११९ उपाययोजना करण्यात आल्या असून, त्यासाठी ४४.४९ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपाययोजनांमध्ये ९८ गावात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून, अडचणीच्या चिखली तालुक्यातील ३, देऊळगाव राजा तालुक्यातील ३, सिंदखेड राजा तालुक्यात १, खामगाव तालुक्यात २, शेगाव तालुक्यात १ व मोताळा तालुक्यातील २ अशा प्रकारे ६ तालुक्यातील १२ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या गावात सुरू आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात चिखली तालुक्यातील मेरा बु., चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, नागणगाव, सरंबा, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूड, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गवळी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा