शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

बुलडाणा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:32 IST

बुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून,  पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ८८ गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देबाष्पीभवनाचा फटका १२ गावात टँकर तर ८८ गावात विहिरींचे अधिग्रहण

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून,  पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ८८ गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मागील वर्षी शेवटी दमदार पावसाळा झाल्यामुळे उन्हाळ्यात काही गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती; मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पात अल्प जलसाठा आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच बाष्पीभवनामुळे काही प्रकल्पात आतापासून पाण्याचा ठणठणाट आहे, तर जमिनीखालील पाण्याची पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर २०१७ ते जून २०१८ नुसार कृती आराखडा प्रस्तावित केला होता. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ७९७ गावासाठी १ हजार १४८ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यासाठी १८९४.२५ लक्ष रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी  १०५ गावातील १२७ उपाययोजनांसाठी १८०.२० लक्ष रुपयांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ९८ गावात ११९ उपाययोजना करण्यात आल्या असून, त्यासाठी ४४.४९ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपाययोजनांमध्ये ९८ गावात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून, अडचणीच्या चिखली तालुक्यातील ३, देऊळगाव राजा तालुक्यातील ३, सिंदखेड राजा तालुक्यात १, खामगाव तालुक्यात २, शेगाव तालुक्यात १ व मोताळा तालुक्यातील २ अशा प्रकारे ६ तालुक्यातील १२ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या गावात सुरू आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात चिखली तालुक्यातील मेरा बु., चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, नागणगाव, सरंबा, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूड, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गवळी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा