शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

आता नकाशावर दूषित पाण्याचे गाव!

By admin | Updated: March 6, 2017 01:54 IST

जीआयएस मॅपिंग प्रणाली; निरीक्षण विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणार!

बुलडाणा, दि. ५- पिण्याच्या पाण्यामध्ये रासायनिक घटकांचे वाढलेले प्रमाण घातक आहे. ही बाब लक्ष घेऊन पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांच्या रासायनिक तपासणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. भूवैज्ञानिक विभागाच्यावतीने ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये १६७ जुन्या निरीक्षण विहिरींसह ११४६ नव्या निरीक्षण विहिरींची पाणी तपासणी केली जात आहे. यात दूषित पाणी नमुने आढळलेले गाव भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) द्वारे नकाशावर दर्शविण्यात येणार आहेत.काही गावांमध्ये पाण्यातील रासायनिक घटकांची तपासणी गतवर्षी करण्यात आली. यात प्रत्येकी चारशे स्रोतांचे नमुने तपासल्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये बाधित स्रोतांची संख्या व रासानियक घटकांचे प्रमाण वाढलेले आढळून आले. ही बाब गांभीर्याने घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या विभागीय प्रयोगशाळा यांच्यामार्फत पिण्याच्या पाण्यातील एचपी, सॉलीड, फ्लोराइड, नाईट्रेड, आयर्न हे पाच घटक तपासण्यात आले. यात २५0 गावांचे जीआयएस मॅपिंग करण्याचे काम टप्याटप्यात पूर्णत्वास गेले आहे.यावर्षी १३ तालुक्यात १४२0 गावांतील ११४६ निरीक्षण विहिरींची नव्याने निवड करण्यात आली आहे. यातील नियमित पाणी तपासणी जलसुरक्षकांकडून केली जाणार आहे. पाणी नमुने गोळा करून जलसुरक्षकांकडून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविले जाणार आहे. ज्या गावांतील विहिरीचे पाणी नमुने दूषित आढळले, ते गाव जिल्ह्याच्या नकाशावर जीआयएस प्रणालीत दर्शविण्यात येणार आहे. याबाबात लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे.    भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून चांगल्या आणि दूषित पाणी नमुन्याचे गाव जिल्ह्याच्या नकाशावर विविध रंगामध्ये दर्शविण्यात येते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोणत्या ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित आहे, गुणवत्तापूर्ण आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ही बाब फायद्याची ठरते. शिवाय जिल्ह्याचे पेयजलाबाबतचे धोरण ठरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची संधी उपलब्ध होते.काय आहे 'जीआयएस मॅपिंग'?पाण्याचे जैविक व रासायनिक असे दोन नमुने घेऊन ते प्रयोगशाळेमार्फत तपासून त्याचा पिण्यास वापर होत असल्याची निश्‍चित करण्यात येते. तसेच हंगामी, बारमाही, बंद असलेल्या जलस्रोत निश्‍चिती, यानंतर गाव, वस्ती, तांडे येथील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे अक्षांश, रेखांश काढणे, पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांना सांकेतांक देण्यात येते. त्याचबरोबर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची सद्यस्थितीविषयी नकाशे तयार करण्यात येते.