शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

आता वेध लग्नोत्सवाचे !

By admin | Updated: November 24, 2015 01:27 IST

तुळशी विवाहास थाटात प्रारंभ.

खामगाव : दीपावली संपताच वेध लागतात ते त्रिपुरारी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेचे. कार्तिक एकादशीनंतर तुळशी विवाहास प्रारंभ होत असल्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. तथापि, २३ ते २५ हे तीन तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त असून, तुळशी विवाहानंतरच खर्‍या अर्थाने विवाह मुहूर्तास प्रारंभ होतो. भारतीय संस्कृती ही मुळातच भावात्मकता प्रधान आहे. त्यामुळे तुळशीला हिंदू संस्कृतीत कन्येचे स्थान दिले जाते. तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होत असल्याचा समज असल्यामुळे पोटच्या कन्येला उत्तम वर मिळावा, तिला सर्व सुख प्राप्त व्हावे, यासाठी बहुतांश नागरिक आनंदाने हा उत्सव साजरा करतात. कार्तिकी व्दादशीपासून पौर्णिमेपर्यंंत एखाद्या दिवशी सायंकाळी तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात येते; मात्र बहुतांश नागरिक यासाठी व्दादशीचा दिवस निवडतात. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी, कार्तिक म्हणजेच प्रबोधिनी एकादशी व चातुर्मासाच्या कालावधीत विवाह मुहूर्त नसतात. हा कालावधी मुहूर्त शास्त्रानुसार विवाहासाठी प्रतिकुल मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. तुळशी विवाहानंतर विवाहासाठी अनुकूल वेळ प्राप्त होते. त्यामुळे तुळशी विवाहापासून पंचांगात विवाह मुहूर्त दिलेले असतात. यावर्षी २३ ते २५ नोव्हेंबर तीनच दिवसाचे मुहूर्त तुळशी विवाहासाठी आहेत. या कालावधीत सर्वत्र तुळशी विवाहाचा सोहळा दिसून येणार आहे. तुळशी विवाहानंतर सर्वत्र ह्यशुभमंगल सावधानह्ण चा ध्वनी कानी पडण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, तुळशी विवाहासाठी लागणार्‍या बोर, भाजी, आवळा, बांगड्या, हरभर्‍याची भाजी आदी साहित्याची दुकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर थाटली जावू लागली आहेत. ग्रामीण भागातील विक्रेते यासाठी शहरात दाखल झाले असून, तुळशी विवाहनिमित्त काही प्रमाणात त्यांना रोजगार प्राप्त होत आहे.