शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

आता वेध लग्नोत्सवाचे !

By admin | Updated: November 24, 2015 01:27 IST

तुळशी विवाहास थाटात प्रारंभ.

खामगाव : दीपावली संपताच वेध लागतात ते त्रिपुरारी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेचे. कार्तिक एकादशीनंतर तुळशी विवाहास प्रारंभ होत असल्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. तथापि, २३ ते २५ हे तीन तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त असून, तुळशी विवाहानंतरच खर्‍या अर्थाने विवाह मुहूर्तास प्रारंभ होतो. भारतीय संस्कृती ही मुळातच भावात्मकता प्रधान आहे. त्यामुळे तुळशीला हिंदू संस्कृतीत कन्येचे स्थान दिले जाते. तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होत असल्याचा समज असल्यामुळे पोटच्या कन्येला उत्तम वर मिळावा, तिला सर्व सुख प्राप्त व्हावे, यासाठी बहुतांश नागरिक आनंदाने हा उत्सव साजरा करतात. कार्तिकी व्दादशीपासून पौर्णिमेपर्यंंत एखाद्या दिवशी सायंकाळी तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात येते; मात्र बहुतांश नागरिक यासाठी व्दादशीचा दिवस निवडतात. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी, कार्तिक म्हणजेच प्रबोधिनी एकादशी व चातुर्मासाच्या कालावधीत विवाह मुहूर्त नसतात. हा कालावधी मुहूर्त शास्त्रानुसार विवाहासाठी प्रतिकुल मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. तुळशी विवाहानंतर विवाहासाठी अनुकूल वेळ प्राप्त होते. त्यामुळे तुळशी विवाहापासून पंचांगात विवाह मुहूर्त दिलेले असतात. यावर्षी २३ ते २५ नोव्हेंबर तीनच दिवसाचे मुहूर्त तुळशी विवाहासाठी आहेत. या कालावधीत सर्वत्र तुळशी विवाहाचा सोहळा दिसून येणार आहे. तुळशी विवाहानंतर सर्वत्र ह्यशुभमंगल सावधानह्ण चा ध्वनी कानी पडण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, तुळशी विवाहासाठी लागणार्‍या बोर, भाजी, आवळा, बांगड्या, हरभर्‍याची भाजी आदी साहित्याची दुकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर थाटली जावू लागली आहेत. ग्रामीण भागातील विक्रेते यासाठी शहरात दाखल झाले असून, तुळशी विवाहनिमित्त काही प्रमाणात त्यांना रोजगार प्राप्त होत आहे.