शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्षय परतीच्या पावसाकडे; तलाव, धरणे, नदी, नाले कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 13:35 IST

साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरात गेल्या चार महिन्यात पावसाने ५० टक्केही हजेरी लावली नाही. पावसाळा कधी सुरु झाला आणि केव्हा संपला यातच चार महिने निघून गेली. एकदाही दमदार पाऊस न पडल्याने नदी, नाले खळाखळी नाही. त्यामुळे दुष्काळाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. परतीच्या पावसाला ५ आॅक्टोंबर पासून सुरुवात झाली. आतातरी दमदार पाऊस ...

साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरात गेल्या चार महिन्यात पावसाने ५० टक्केही हजेरी लावली नाही. पावसाळा कधी सुरु झाला आणि केव्हा संपला यातच चार महिने निघून गेली. एकदाही दमदार पाऊस न पडल्याने नदी, नाले खळाखळी नाही. त्यामुळे दुष्काळाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. परतीच्या पावसाला ५ आॅक्टोंबर पासून सुरुवात झाली. आतातरी दमदार पाऊस पडू दे आणि एकदाची कोरडी पडलेली नदी, नाले, तलाव धरणे यांची पात्र भरु दे अशी प्रार्थना सर्व सामान्य नागरीक करीत आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु झाला कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत गेला. जमिनीची तहान भागत नाही तोच पाऊस गुल झाला. तब्बल ४५ दिवस पाऊस पडलाच नाही. श्रावण महिन्यात ‘श्रावण मासी हर्ष मनासी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात पाऊस येवूनही क्षणात ऊन पडे’ ही कविता आठवल्या शिवाय राहात नाही. यावर्षी श्रावण महिन्यात एकदाही सरी पडल्या नाहीत. उलट हिरवळी ऐवजी चोहीकडे गवत वाळली होती. ओढे कोरडी पडली. असेच काहीसे चित्र होते. गणपती उत्सवात पाऊस येईल अशी भोळी आशा लावून बसलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशाच आली. काहीशा सरी मधून मधून पडत गेल्या  पिकाला जिवदान मिळाले पण ते नुकसान व्हायचे ते झालेच त्याला कोणीही थांबवू शकत नव्हते. पावसाळा संपला परतीचे दिवस सुरु झाले. या परतीच्या दिवसात एकदातरी दमदार पाऊस पडून नदी, नाले, तलाव, धरणे तुडूंब भरावी ही अपेक्षा आहे. साखरखेर्डा परिसरात महालक्ष्मी, गायखेडी, जागदरी तलावासह अनेक छोटे, मोठे तलाव अनेक आहेत. त्यापैकी महालक्ष्मी आणि गायखेडी तलावात मृत साठ्यापेक्षा कमी पाणी असून दिवाळी नंतर या तलावात पाणी साठा राहिलच याची खात्री नाही. महालक्ष्मी तलावातून साखरखेर्डा गावाला पाणी पुरवठा केला जातो. आज तलावच कोरडा पडला तर दोन वर्षापूर्वीची परिस्थिती निर्माण होवू शकते. गायखेडी तलावामुळे राताळी गावाचा पाणी पुरवठा प्रभावीत होवू शकतो. जागदरी धरणावरुन शेंदुर्जन, राजेगाव, जागदरी, लिंगा, बाळसमुद्र या पाच गावात पाणी पुरवठा होता. गावासाठी पाणी राखीव ठेवले तरच या पाच गावाची तहाणी जागदरी तलाव भागवू शकतो. जर खरीप हंगामात शेतीला पाणी सुरु केले तर ही गावेही पाणी टंचाईच्या कंचाट्यात येवू शकतात. डिसेंबर पासून साखरखेर्डा, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, दरेगांव, बाळसमुद्र, गोरेगाव, उमनगाव, सावंगी, भगत या गावात पाण्याची भिषण टंचाई जाणवू शकते अशी विदारक परिस्थिती आहे. (तालुका प्रतिनिधी)