शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आता पॉस मशीन देईल शेतकऱ्यांना खताची माहिती!

By admin | Updated: June 29, 2017 01:32 IST

माती परीक्षण आवश्यक : मातीतील पोषक घटकांची माहिती मिळणार!

विवेक चांदूरकर । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतातील मातीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे, याचा अभ्यास न करता दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात खत टाकतात, त्यामुळे बरेचदा त्यांचा अनाठायी खर्च होतो. यावर शासनाने तोडगा काढला असून, यानंतर शेतकऱ्यांना खत खरेदी करताना त्यांच्या शेतात कोणत्या खताची किती आवश्यकता आहे, याची माहिती पॉस मशीनच देणार आहे. आगामी तीन वर्षांमध्ये राज्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रांवर पॉस मशीन बसविण्यात येणार आहेत.सध्या शासनाच्यावतीने खताची सबसिडी देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सध्या कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन लावण्यात येत आहे. या पॉस मशीनमध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड व बोटाचे ठसे घेण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या आधार कार्डासोबतच त्यांच्या शेतातील माती परीक्षणाचा अहवालही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी दुकानात खत खरेदीसाठी गेल्यावर त्याच्या शेतातील मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यापैकी कोणत्या पोषक घटकांची किती कमतरता आहे, याची माहितीही मिळणार आहे. सद्यस्थितीमध्ये बहुतेक शेतकऱ्यांकडून माती परीक्षण न करता ठरावीक खत पिकांना देण्यात येते. दरवर्षी एकच खत दिल्यामुळे मातीमध्ये एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण वाढते, तर एखाद्याचे कमी होते. त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावर होतो तसेच उत्पन्नातही घट येते. यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतातील घटकांचे प्रमाण कळणार असल्यामुळे शेतात योग्य खत देण्यात येणार आहे. परिणामी, मातीचे आरोग्य चांगले राहील, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादनातही वाढ होणार आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्यांच्या आधार कार्डशी लिंक करण्याचे काम सुरू झाले असून, आगामी तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. तीन वर्षांनंतर पूर्ण शेतकऱ्यांना पॉस यंत्राद्वारे मातीतील पोषक घटकांची माहिती मिळणार आहे, तर तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे माती परीक्षण व आधार लिंक झाले आहे, त्यांना आतापासूनच माहिती मिळणार आहे.पॉस मशीनमध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड व माती परीक्षणाचा अहवाल लिंक करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीत कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार शेतकरी खत खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल व उत्पादनात वाढ होईल. - विजय मोकाळे, कृषी विकास अधिकारी, बुलडाणा