शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता पॉस मशीन देईल शेतकऱ्यांना खताची माहिती!

By admin | Updated: June 29, 2017 01:32 IST

माती परीक्षण आवश्यक : मातीतील पोषक घटकांची माहिती मिळणार!

विवेक चांदूरकर । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतातील मातीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे, याचा अभ्यास न करता दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात खत टाकतात, त्यामुळे बरेचदा त्यांचा अनाठायी खर्च होतो. यावर शासनाने तोडगा काढला असून, यानंतर शेतकऱ्यांना खत खरेदी करताना त्यांच्या शेतात कोणत्या खताची किती आवश्यकता आहे, याची माहिती पॉस मशीनच देणार आहे. आगामी तीन वर्षांमध्ये राज्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रांवर पॉस मशीन बसविण्यात येणार आहेत.सध्या शासनाच्यावतीने खताची सबसिडी देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सध्या कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन लावण्यात येत आहे. या पॉस मशीनमध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड व बोटाचे ठसे घेण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या आधार कार्डासोबतच त्यांच्या शेतातील माती परीक्षणाचा अहवालही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी दुकानात खत खरेदीसाठी गेल्यावर त्याच्या शेतातील मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यापैकी कोणत्या पोषक घटकांची किती कमतरता आहे, याची माहितीही मिळणार आहे. सद्यस्थितीमध्ये बहुतेक शेतकऱ्यांकडून माती परीक्षण न करता ठरावीक खत पिकांना देण्यात येते. दरवर्षी एकच खत दिल्यामुळे मातीमध्ये एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण वाढते, तर एखाद्याचे कमी होते. त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावर होतो तसेच उत्पन्नातही घट येते. यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतातील घटकांचे प्रमाण कळणार असल्यामुळे शेतात योग्य खत देण्यात येणार आहे. परिणामी, मातीचे आरोग्य चांगले राहील, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादनातही वाढ होणार आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्यांच्या आधार कार्डशी लिंक करण्याचे काम सुरू झाले असून, आगामी तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. तीन वर्षांनंतर पूर्ण शेतकऱ्यांना पॉस यंत्राद्वारे मातीतील पोषक घटकांची माहिती मिळणार आहे, तर तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे माती परीक्षण व आधार लिंक झाले आहे, त्यांना आतापासूनच माहिती मिळणार आहे.पॉस मशीनमध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड व माती परीक्षणाचा अहवाल लिंक करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीत कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार शेतकरी खत खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल व उत्पादनात वाढ होईल. - विजय मोकाळे, कृषी विकास अधिकारी, बुलडाणा