शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

आता पॉस मशीन देईल शेतकऱ्यांना खताची माहिती!

By admin | Updated: June 29, 2017 01:32 IST

माती परीक्षण आवश्यक : मातीतील पोषक घटकांची माहिती मिळणार!

विवेक चांदूरकर । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतातील मातीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे, याचा अभ्यास न करता दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात खत टाकतात, त्यामुळे बरेचदा त्यांचा अनाठायी खर्च होतो. यावर शासनाने तोडगा काढला असून, यानंतर शेतकऱ्यांना खत खरेदी करताना त्यांच्या शेतात कोणत्या खताची किती आवश्यकता आहे, याची माहिती पॉस मशीनच देणार आहे. आगामी तीन वर्षांमध्ये राज्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रांवर पॉस मशीन बसविण्यात येणार आहेत.सध्या शासनाच्यावतीने खताची सबसिडी देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सध्या कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन लावण्यात येत आहे. या पॉस मशीनमध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड व बोटाचे ठसे घेण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या आधार कार्डासोबतच त्यांच्या शेतातील माती परीक्षणाचा अहवालही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी दुकानात खत खरेदीसाठी गेल्यावर त्याच्या शेतातील मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यापैकी कोणत्या पोषक घटकांची किती कमतरता आहे, याची माहितीही मिळणार आहे. सद्यस्थितीमध्ये बहुतेक शेतकऱ्यांकडून माती परीक्षण न करता ठरावीक खत पिकांना देण्यात येते. दरवर्षी एकच खत दिल्यामुळे मातीमध्ये एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण वाढते, तर एखाद्याचे कमी होते. त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावर होतो तसेच उत्पन्नातही घट येते. यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतातील घटकांचे प्रमाण कळणार असल्यामुळे शेतात योग्य खत देण्यात येणार आहे. परिणामी, मातीचे आरोग्य चांगले राहील, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादनातही वाढ होणार आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्यांच्या आधार कार्डशी लिंक करण्याचे काम सुरू झाले असून, आगामी तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. तीन वर्षांनंतर पूर्ण शेतकऱ्यांना पॉस यंत्राद्वारे मातीतील पोषक घटकांची माहिती मिळणार आहे, तर तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे माती परीक्षण व आधार लिंक झाले आहे, त्यांना आतापासूनच माहिती मिळणार आहे.पॉस मशीनमध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड व माती परीक्षणाचा अहवाल लिंक करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीत कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार शेतकरी खत खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल व उत्पादनात वाढ होईल. - विजय मोकाळे, कृषी विकास अधिकारी, बुलडाणा