बुलडाणा : रोहिण्या बरसल्या नाही. आता मृग नक्षत्रास प्रारंभ होऊन आठवडा पूर्ण होत आला; पण पेरणीलायक पाऊस नसल्याने बळीराजासह सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. वादळही झाले; मात्र जोरदार पाऊस न झाल्याने सार्यांचाच भ्रमनिरास झाला. गेल्या वर्षी ५ व ७ जूनला जोरदार पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झाली होती; पण यंदा अद्याप पाऊस झालेला नाही. पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांची नासाडी केली आहे. ११ जून रोजी वादळी वार्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, बुलडाणा तालुक्यातील धाड परिसर तसेच चिखली तालुक्यातील काही भागाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू झाल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली.धूळपेरणी अल्प प्रमाणातपेरणीसाठी ४५ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. एवढा पाऊस फक्त जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात झाला नाही. मोताळा, खामगाव, नांदूरा, मलकापूर तालुक्यासह बुलडाणा तालुक्यातही धूळ पेरणी होत असते. यावर्षी शेतकर्यांनी अत्याल्प प्रमाणात धूळपेरणी केली आहे. मागिल वर्षी धूळ पेरणी केल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने बियाणे वाय गेले होते. त्यानंतर पुन्हा दुबार पेरणी केल्यानंतर पावसाने पाठ दाखवली. पुन्हा शेतकर्यांनी कर्ज काढून तिबार पेरणी केली. अशा प्रकारे शेतकर्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी धूळ पेरणीकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे. फक्त ज्या व्यक्तींकडे ठिबक सिंचनची सोय आहे. अशा शेतकर्यांनी कपाशीची लागवड केली आहे.*खते अत्यल्प बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४00 परवानाधारक कृषी केंद्र असून, जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी १ लाख ९३ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १ लाख १ हजार ३४0 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.**अधिक पैशाची मागणीशेतकर्यांची पैसे मोजण्याची तयारी असली तरी विक्रेत्यांकडून खतांचा तुटवडा सांगण्यात येत आहे. आजरोजी बाजारात डीएपी खताची अधिक मागणी होत आहे. त्यामुळे ११८३ रुपये किंमत असलेल्या डीएपीच्या एका बॅगसाठी १२00 ते १३00 रुपये मोजावे लागत आहेत.
आता नजरा आकाशाकडे
By admin | Updated: June 22, 2014 01:18 IST