शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारचे साथीचे आजार बळावतात. या साथीच्या आजारांबरोबरच कानाचे आजारही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारचे साथीचे आजार बळावतात. या साथीच्या आजारांबरोबरच कानाचे आजारही डोके वर काढतात. पावसात भिजल्याने कानात पाणी जाऊन बुरशी, बॅक्टेरियाचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. नागरिकांना अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. अन्यथा कानाला इजा पोहोचून बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळ्यात अनेक जण भिजण्याचा आनंद लुटतात. मात्र, पाऊस कसाही पडत असल्याने कानात पाणी जाऊन कान ओला राहण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कानात बुरशी, बॅक्टेरियाचा धोका संभवतो. पावसाळ्यात कान कोरडा ठेवणे अत्यावश्यक असते. पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही आंघोळ करताना कानात पाणी न जाण्यासाठी कापूस घालून राहणे चांगले असते. कानात बुरशी, बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव झाल्यास कोणतेही औषध घालण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कानामध्ये खाज आल्यास तेल टाकणे हानीकारक असते.

काय घ्याल काळजी?

कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावे. विशेषत: आंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. पावसाचे किंवा आंघोळ करताना कानात पाणी न जाण्यासाठी कानात कापसाचे बोळे घालून ठेवावेत. कानामध्ये कोणत्याही प्रकारची टोकदार वस्तू घालून कान साफ करण्याचे टाळावे.

हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करून वापरला पाहिजे. कानामध्ये कोणत्याही प्रकारचे तेल टाकू नये. त्यामुळे कानात चिकटपणा राहून, कान ओलसर राहण्याचा धोका अधिक असतो. कानात बुरशी, बॅक्टेरिया झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे. कान दुखू लागल्यास किंवा पाणी येत असल्यास डॉक्टरांना दाखवावे.

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

पावसाला सुरुवात झाली की, अनेकांना पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्याचा मोह होतो. पावसात भिजल्यामुळे पावसाचे पाणी कानात जाण्याचा धोका अधिक असतो. कानात पाणी गेल्यास तो वेळीच कोरडा न केल्यास ओलावा तसाच राहतो. त्यामुळे कानात बरशी पकडून कान दुखू लागतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास जखम होऊन त्यातून पाणी येऊ लागते आणि त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा पोहोचू शकते.

कानात गेलेले पाणी सहसा काढता येत नाही. त्यामुळे पाणी न जाण्यासाठी कान बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी कानात कापसाचे बोळे घालून ठेवणे हिताचे आहे.

कापसाचे बोळे न ठेवल्यास कान कोरडा केला पाहिजे. पावसाळ्यात कानाचे विकार मोठ्या प्रमाणात उद्भवतात. त्याचे कारण कानात पाणी जाऊन तयार झालेला ओलावा हेच आहे. कानातील विकार डोळ्यांना दिसत नसल्याने डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर असते.

पावसाळ्यात कानात पाणी गेल्यास कानाच्या आतील भाग दमट राहून बुरशी पकडते. तसेच ओटीटीस एक्सटा हा आजारही होऊ शकतो. त्यामुळे कानाला इजा होऊन कमी ऐकायला येऊ शकते. काही वेळेला बहिरेपणाही येऊ शकतो. तसेच कानाचा भाग थेट मेंदूच्या जवळ असल्याने मेंदूलाही इजा पोहोचू शकते. त्यामुळे कान कोरडे ठेवले पाहिजेत. कानात बट्स न घालता कापसाची वात करून त्याने कान कोरडा करावा.

- डॉ. जे. पी. राजपूत, कान-नाक-घसा तज्ज्ञ.

कानात पाणी गेल्यास कानात ओलावा तयार होऊन बुरशी, बॅक्टेरियाचा धोका उद्भवतो. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. या हंगामात दिवसाला १० ते १५ रुग्ण उपचारासाठी येतात. पाणी गेल्याने कान ओलसर होऊन चिकटपणा तयार होतो. त्यामुळे कानात बुरशी पकडते. असे झाल्यास काही जण कानात तेल टाकतात. हे तेल आपण निर्जंतुकीकरण करून टाकत नाही. त्यामुळे ते हानीकारक ठरते.

-डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक.