शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जिल्ह्यातील एकही माेलकरीण पॅकेजसाठी पात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ‘ब्रेक द चैन’अंतर्गंत कडक निर्बंध लादले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ‘ब्रेक द चैन’अंतर्गंत कडक निर्बंध लादले आहेत. काेराेना संसर्ग वाढल्यामुळे घरगुती काम करणाऱ्या माेलकरणी आर्थिक संकटात सापडल्या आहेत. नाेंदणीकृत माेलकरणींना मदत देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, जिल्ह्यातील एकही माेलकरीण यासाठी पात्र नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ३ हजार ६४३ माेलकरणींनी कामगार कार्यालयात नाेंदणी केली आहे. मात्र, दाेन ते तीन वर्षांपासून त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. तसेच तालुका व गावपातळीवर काम करणाऱ्या अनेक माेलकरणींनीनी नाेंदणीच केलेली नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या पॅकेजचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे अनेक माेलकरणींना काम मिळणे बंद झाले आहे. अनेकांनी घरात माेलकरणीला कामावर न येण्यास सांगितले आहे. आधीच अठरा विश्व दारिद्र असलेल्या माेलकरणींवर काेराेनाच्या रूपाने आणखी एक संकट आले आहे. या माेलकरणींना मदत देण्याची घाेषणा शासनाने केली असली तरी नाेंदणीकृत असलेल्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे इतर माेलकरणींना मदतीपासून वंचित राहावे लाणार आहे.

सहा हजार माेलकरणींची नाेंदच नाही

जिल्ह्यात जवळपास १० हजार माेलकरणी आहेत. त्यापैकी केवळ ३ हजार ६४३ माेलकरणींनी नाेंदणी केली आहे. दाेन ते तीन वर्षांपासून नूतनीकरण केलेले नाही. शासनाकडून विविध याेजनांच्या माध्यमातून माेलकरणींना लाभ देण्यात येणार आहे. मात्र, अनेक माेलकरणींना माहितीच नसल्याने त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे, सहा हजारांपेक्षा जास्त माेलकरणी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.

नूतनीकरण आवश्यक

जिल्हाभरातील ३ हजार ६४३ माेलकरणींनी कामगार कार्यालयात नाेंदणी केली आहे. मात्र, दाेन ते तीन वर्षांपासून नाेंदणीचे नूतनीकरण केलेले नाही. नाेंदणी केल्यानंतर दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र, नाेंदणी केलेल्या एकाही माेलकरणीने नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश माेलकरणींनी तर नाेंदणीच केलेली नाही. त्यामुळे, शासनाने पॅकेज जाहीर केले असले तरी जिल्ह्यातील माेलकरणींना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग वाढल्यानंतर काम मिळणे बंद झाले आहे. आधीच अल्प मजुरी मिळते. त्यातच मिळणारे कामही बंद झाल्याने आर्थिक संकट आले आहे. शासनाने नाेंदणीकृतची अट न ठेवता सरकट मदत देण्याची गरज आहे. तरच लाभ मिळेल.

शांताबाई इंगळे

कामगार कार्यालयात नाेंदणी करावी लागते, याविषयी माहितीच नाही. त्यामुळे, नाेंदणी केली नाही. गेल्या वर्षीपासून काम बंद झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा हाेताे. यावर्षी पुन्हा काेराेना संसर्ग वाढल्याने अनेक घरमालकांनी कामावर बाेलावणे बंद केले आहे. त्यामुळे, शासनाने भरीव मदत देण्याची गरज आहे.

सविता वानखडे, बुलडाणा

काेराेनाचा सर्वाधिक फटका माेलकरीणला बसला आहे. काेराेनाच्या भीतीने घरमालकांनी घरकामाला बाेलावणे बंद केले आहे. त्यामुळे, उदर निर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. शासनाने नाेंदणीकृतची अट शिथिल करून सरसकट घरकाम करणाऱ्या सर्वच महिलांना मदत द्यावी.

रजनी जाधव, बुलडाणा