शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

जिल्ह्यातील एकही माेलकरीण पॅकेजसाठी पात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ‘ब्रेक द चैन’अंतर्गंत कडक निर्बंध लादले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ‘ब्रेक द चैन’अंतर्गंत कडक निर्बंध लादले आहेत. काेराेना संसर्ग वाढल्यामुळे घरगुती काम करणाऱ्या माेलकरणी आर्थिक संकटात सापडल्या आहेत. नाेंदणीकृत माेलकरणींना मदत देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, जिल्ह्यातील एकही माेलकरीण यासाठी पात्र नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ३ हजार ६४३ माेलकरणींनी कामगार कार्यालयात नाेंदणी केली आहे. मात्र, दाेन ते तीन वर्षांपासून त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. तसेच तालुका व गावपातळीवर काम करणाऱ्या अनेक माेलकरणींनीनी नाेंदणीच केलेली नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या पॅकेजचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे अनेक माेलकरणींना काम मिळणे बंद झाले आहे. अनेकांनी घरात माेलकरणीला कामावर न येण्यास सांगितले आहे. आधीच अठरा विश्व दारिद्र असलेल्या माेलकरणींवर काेराेनाच्या रूपाने आणखी एक संकट आले आहे. या माेलकरणींना मदत देण्याची घाेषणा शासनाने केली असली तरी नाेंदणीकृत असलेल्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे इतर माेलकरणींना मदतीपासून वंचित राहावे लाणार आहे.

सहा हजार माेलकरणींची नाेंदच नाही

जिल्ह्यात जवळपास १० हजार माेलकरणी आहेत. त्यापैकी केवळ ३ हजार ६४३ माेलकरणींनी नाेंदणी केली आहे. दाेन ते तीन वर्षांपासून नूतनीकरण केलेले नाही. शासनाकडून विविध याेजनांच्या माध्यमातून माेलकरणींना लाभ देण्यात येणार आहे. मात्र, अनेक माेलकरणींना माहितीच नसल्याने त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे, सहा हजारांपेक्षा जास्त माेलकरणी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.

नूतनीकरण आवश्यक

जिल्हाभरातील ३ हजार ६४३ माेलकरणींनी कामगार कार्यालयात नाेंदणी केली आहे. मात्र, दाेन ते तीन वर्षांपासून नाेंदणीचे नूतनीकरण केलेले नाही. नाेंदणी केल्यानंतर दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र, नाेंदणी केलेल्या एकाही माेलकरणीने नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश माेलकरणींनी तर नाेंदणीच केलेली नाही. त्यामुळे, शासनाने पॅकेज जाहीर केले असले तरी जिल्ह्यातील माेलकरणींना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग वाढल्यानंतर काम मिळणे बंद झाले आहे. आधीच अल्प मजुरी मिळते. त्यातच मिळणारे कामही बंद झाल्याने आर्थिक संकट आले आहे. शासनाने नाेंदणीकृतची अट न ठेवता सरकट मदत देण्याची गरज आहे. तरच लाभ मिळेल.

शांताबाई इंगळे

कामगार कार्यालयात नाेंदणी करावी लागते, याविषयी माहितीच नाही. त्यामुळे, नाेंदणी केली नाही. गेल्या वर्षीपासून काम बंद झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा हाेताे. यावर्षी पुन्हा काेराेना संसर्ग वाढल्याने अनेक घरमालकांनी कामावर बाेलावणे बंद केले आहे. त्यामुळे, शासनाने भरीव मदत देण्याची गरज आहे.

सविता वानखडे, बुलडाणा

काेराेनाचा सर्वाधिक फटका माेलकरीणला बसला आहे. काेराेनाच्या भीतीने घरमालकांनी घरकामाला बाेलावणे बंद केले आहे. त्यामुळे, उदर निर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. शासनाने नाेंदणीकृतची अट शिथिल करून सरसकट घरकाम करणाऱ्या सर्वच महिलांना मदत द्यावी.

रजनी जाधव, बुलडाणा