शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एकही माेलकरीण पॅकेजसाठी पात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ‘ब्रेक द चैन’अंतर्गंत कडक निर्बंध लादले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ‘ब्रेक द चैन’अंतर्गंत कडक निर्बंध लादले आहेत. काेराेना संसर्ग वाढल्यामुळे घरगुती काम करणाऱ्या माेलकरणी आर्थिक संकटात सापडल्या आहेत. नाेंदणीकृत माेलकरणींना मदत देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, जिल्ह्यातील एकही माेलकरीण यासाठी पात्र नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ३ हजार ६४३ माेलकरणींनी कामगार कार्यालयात नाेंदणी केली आहे. मात्र, दाेन ते तीन वर्षांपासून त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. तसेच तालुका व गावपातळीवर काम करणाऱ्या अनेक माेलकरणींनीनी नाेंदणीच केलेली नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या पॅकेजचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे अनेक माेलकरणींना काम मिळणे बंद झाले आहे. अनेकांनी घरात माेलकरणीला कामावर न येण्यास सांगितले आहे. आधीच अठरा विश्व दारिद्र असलेल्या माेलकरणींवर काेराेनाच्या रूपाने आणखी एक संकट आले आहे. या माेलकरणींना मदत देण्याची घाेषणा शासनाने केली असली तरी नाेंदणीकृत असलेल्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे इतर माेलकरणींना मदतीपासून वंचित राहावे लाणार आहे.

सहा हजार माेलकरणींची नाेंदच नाही

जिल्ह्यात जवळपास १० हजार माेलकरणी आहेत. त्यापैकी केवळ ३ हजार ६४३ माेलकरणींनी नाेंदणी केली आहे. दाेन ते तीन वर्षांपासून नूतनीकरण केलेले नाही. शासनाकडून विविध याेजनांच्या माध्यमातून माेलकरणींना लाभ देण्यात येणार आहे. मात्र, अनेक माेलकरणींना माहितीच नसल्याने त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे, सहा हजारांपेक्षा जास्त माेलकरणी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.

नूतनीकरण आवश्यक

जिल्हाभरातील ३ हजार ६४३ माेलकरणींनी कामगार कार्यालयात नाेंदणी केली आहे. मात्र, दाेन ते तीन वर्षांपासून नाेंदणीचे नूतनीकरण केलेले नाही. नाेंदणी केल्यानंतर दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र, नाेंदणी केलेल्या एकाही माेलकरणीने नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश माेलकरणींनी तर नाेंदणीच केलेली नाही. त्यामुळे, शासनाने पॅकेज जाहीर केले असले तरी जिल्ह्यातील माेलकरणींना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग वाढल्यानंतर काम मिळणे बंद झाले आहे. आधीच अल्प मजुरी मिळते. त्यातच मिळणारे कामही बंद झाल्याने आर्थिक संकट आले आहे. शासनाने नाेंदणीकृतची अट न ठेवता सरकट मदत देण्याची गरज आहे. तरच लाभ मिळेल.

शांताबाई इंगळे

कामगार कार्यालयात नाेंदणी करावी लागते, याविषयी माहितीच नाही. त्यामुळे, नाेंदणी केली नाही. गेल्या वर्षीपासून काम बंद झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा हाेताे. यावर्षी पुन्हा काेराेना संसर्ग वाढल्याने अनेक घरमालकांनी कामावर बाेलावणे बंद केले आहे. त्यामुळे, शासनाने भरीव मदत देण्याची गरज आहे.

सविता वानखडे, बुलडाणा

काेराेनाचा सर्वाधिक फटका माेलकरीणला बसला आहे. काेराेनाच्या भीतीने घरमालकांनी घरकामाला बाेलावणे बंद केले आहे. त्यामुळे, उदर निर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. शासनाने नाेंदणीकृतची अट शिथिल करून सरसकट घरकाम करणाऱ्या सर्वच महिलांना मदत द्यावी.

रजनी जाधव, बुलडाणा