शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित पाण्यामुळे आरोग्यास धोका!

By admin | Updated: March 19, 2016 00:29 IST

शासनप्रमाणित चाचण्यांना फाटा देत पाण्याचा व्यवसाय बोभाट सुरू.

हर्षनंदन वाघ /बुलडाणाशहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटर कॅन प्रत्येक दुकानात, कार्यक्रमात वापरण्याचे फॅड वाढले आहे. याचाच लाभ घेत शहरात तसेच परिसरातील काही भागांमध्ये अशा शुद्ध पाण्याच्या मोठय़ा कंपन्या उभ्या राहत आहेत. बोअरवेल करून मिनरल वॉटरच्या नावाखाली वॉटर जारमधून बिनबोभाट पाणी विकले जात आहे. अशा अप्रमाणित पाण्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याचा फायदा घेत हा व्यवसाय जोर धरत असल्याचे दिसते. यावर कोणाचेच नियंत्नण नसल्याने हा व्यवसाय फोफावत असल्याचे चित्न आहे. जिल्ह्यात विकल्या जात असलेल्या पाण्याची कधी तपासणी होते अथवा नाही, याची माहिती अन्न व औषधी विभागाच्यावतीने देण्यात आली नाही. जलजन्य आजार याविषयी समाजात मोठय़ा प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. मुळात उन्हाळ्यात घराबाहेर पाण्याच्या शुद्धतेची खात्नी नसल्याने या पाण्याचा धोका पत्करायला कोणीही धजावत नाही. त्यामुळे मोठय़ा आस्थापनांना जेव्हा उन्हाळ्यात शुद्ध व थंड पाण्याची गरज वाटू लागली, तेव्हा थेट घरपोच पाणी, तेदेखील शुद्ध व थंड करून देता येईल, यावर विचार सुरू झाला; मात्न मिनरल वॉटरचे प्लांट महागडे ठरत असल्याने राज्यातील काही उद्योजकांनी त्यास तुलनेत अगदी कमी किमतीची यंत्रणा तयार करून मिनरल वॉटरला पर्याय दिला.*फक्त सहा वॉटर प्लांटने घेतले परवाने शहरासह ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात मिनरल वॉटरचे प्लांट टाकून पाणी विक्रीचा व्यवसाय झपाट्याने वाढला. हेच पाणी आता हजारो जारद्वारे मिनरल वॉटरचे लेबल मारून ग्राहकांना विकले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा मिनरल वॉटर प्लांटना परवानागी देण्यात आली आहे. त्यात केद्राचे परवाने असलेले चॅस्टिटी बेव्हरेजेस, सोना अँक्वा इंडस्ट्रीज, अजिंक्य बेव्हरेजेस तसेच राज्याचा परवाना असलेले उमाश्री इंडस्ट्रीज, मंगला मागासवर्गीय संस्था यांचा समावेश आहे, तर बहुतांश मिनरल वॉटर प्लांट विनापरवानगी असल्याचे दिसून येत आहे. नियमाप्रमाणे शेतात बोअरवेल करायला परवानगी लागते; मात्न बहुतांश शेतात मिनरल वॉटर प्लांट टाकले आहे. बोअरवेलचे पाणी ग्राहकांना विकले जात आहे. त्यामुळे फुकटात मिळणार्‍या पाण्यावर गुणवत्तेची कोणतीही हमी न देणारा लाखोंनी पैसा कमविण्याचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.