शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

अप्रमाणित पाण्यामुळे आरोग्यास धोका!

By admin | Updated: March 19, 2016 00:29 IST

शासनप्रमाणित चाचण्यांना फाटा देत पाण्याचा व्यवसाय बोभाट सुरू.

हर्षनंदन वाघ /बुलडाणाशहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटर कॅन प्रत्येक दुकानात, कार्यक्रमात वापरण्याचे फॅड वाढले आहे. याचाच लाभ घेत शहरात तसेच परिसरातील काही भागांमध्ये अशा शुद्ध पाण्याच्या मोठय़ा कंपन्या उभ्या राहत आहेत. बोअरवेल करून मिनरल वॉटरच्या नावाखाली वॉटर जारमधून बिनबोभाट पाणी विकले जात आहे. अशा अप्रमाणित पाण्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याचा फायदा घेत हा व्यवसाय जोर धरत असल्याचे दिसते. यावर कोणाचेच नियंत्नण नसल्याने हा व्यवसाय फोफावत असल्याचे चित्न आहे. जिल्ह्यात विकल्या जात असलेल्या पाण्याची कधी तपासणी होते अथवा नाही, याची माहिती अन्न व औषधी विभागाच्यावतीने देण्यात आली नाही. जलजन्य आजार याविषयी समाजात मोठय़ा प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. मुळात उन्हाळ्यात घराबाहेर पाण्याच्या शुद्धतेची खात्नी नसल्याने या पाण्याचा धोका पत्करायला कोणीही धजावत नाही. त्यामुळे मोठय़ा आस्थापनांना जेव्हा उन्हाळ्यात शुद्ध व थंड पाण्याची गरज वाटू लागली, तेव्हा थेट घरपोच पाणी, तेदेखील शुद्ध व थंड करून देता येईल, यावर विचार सुरू झाला; मात्न मिनरल वॉटरचे प्लांट महागडे ठरत असल्याने राज्यातील काही उद्योजकांनी त्यास तुलनेत अगदी कमी किमतीची यंत्रणा तयार करून मिनरल वॉटरला पर्याय दिला.*फक्त सहा वॉटर प्लांटने घेतले परवाने शहरासह ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात मिनरल वॉटरचे प्लांट टाकून पाणी विक्रीचा व्यवसाय झपाट्याने वाढला. हेच पाणी आता हजारो जारद्वारे मिनरल वॉटरचे लेबल मारून ग्राहकांना विकले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा मिनरल वॉटर प्लांटना परवानागी देण्यात आली आहे. त्यात केद्राचे परवाने असलेले चॅस्टिटी बेव्हरेजेस, सोना अँक्वा इंडस्ट्रीज, अजिंक्य बेव्हरेजेस तसेच राज्याचा परवाना असलेले उमाश्री इंडस्ट्रीज, मंगला मागासवर्गीय संस्था यांचा समावेश आहे, तर बहुतांश मिनरल वॉटर प्लांट विनापरवानगी असल्याचे दिसून येत आहे. नियमाप्रमाणे शेतात बोअरवेल करायला परवानगी लागते; मात्न बहुतांश शेतात मिनरल वॉटर प्लांट टाकले आहे. बोअरवेलचे पाणी ग्राहकांना विकले जात आहे. त्यामुळे फुकटात मिळणार्‍या पाण्यावर गुणवत्तेची कोणतीही हमी न देणारा लाखोंनी पैसा कमविण्याचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे.