शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

आता वाढदिवशी केक नाही, तर फळ कापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळाला आता चांगली मागणी येणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. इंग्रज जाऊन ७५ वर्षांचा कालखंड ...

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळाला आता चांगली मागणी येणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. इंग्रज जाऊन ७५ वर्षांचा कालखंड लोटला असतानाही इंग्रज कालीन परंपरा आपल्या देशात अजूनही राबविल्या जातात. त्यातलीच एक परंपरा म्हणजे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असो, त्यामध्ये केक कापून आनंद उत्सव साजरा करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली आहे. केक तयार करत असताना, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर दुकानदार व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात करतात. त्या केकची किंमतही १०० रुपयांपासून अधिकच आहे. त्यामुळे आर्थिक लूट तर होतेच, परंतु केक खाल्ल्यानंतर त्यामध्ये असलेल्या केमिकलयुक्त पदार्थांमुळे माणसाच्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. याचीच दखल घेत, अनेक शेतकरी ग्रुप सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले असून, सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या फळांना पाहिजे त्या प्रमाणात मागणी नाही. ‘शेतकरी जगला, तर देश जगेल’ म्हणून शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या फळांना कापून व उपस्थितांना फळे वाटून जर वाढदिवस साजरा केला, तर फळांची मागणी वाढून शेतकरी आर्थिक सधन होतील. नागरिकांचे आरोग्यही यामुळे सुधारेल. यासाठी प्रत्येकाने जर वाढदिवशी शपथ घेतली की, मी केक कापून नाही, तर फळे कापून माझा वाढदिवस साजरा करेन व शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावेन, तर शेतकरी नक्कीच आत्मनिर्भर होईल. या संदर्भात सध्या सोशल मीडियावर संदेश व्हायरल करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतात पिकविलेले फळ हे आरोग्यवर्धक व शक्तिवर्धक असते. त्यामधून माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असलेले अ जीवनसत्व व सी जीवनसत्व हे घटक मिळतात. मिनरलही मोठ्या प्रमाणात शरीरासाठी मिळतात. त्यामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होऊन आजाराचे प्रमाण कमी होते. उलट केकमध्ये असलेल्या केमिकलमुळे माणसाच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय आरोग्याच्या व आर्थिक दृष्टीने हितकारक आहे.

- डॉ.सुभाष खुरद, बालरोग तज्ज्ञ, मेहकर