शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आता वाढदिवशी केक नाही, तर फळ कापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळाला आता चांगली मागणी येणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. इंग्रज जाऊन ७५ वर्षांचा कालखंड ...

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळाला आता चांगली मागणी येणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. इंग्रज जाऊन ७५ वर्षांचा कालखंड लोटला असतानाही इंग्रज कालीन परंपरा आपल्या देशात अजूनही राबविल्या जातात. त्यातलीच एक परंपरा म्हणजे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असो, त्यामध्ये केक कापून आनंद उत्सव साजरा करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली आहे. केक तयार करत असताना, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर दुकानदार व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात करतात. त्या केकची किंमतही १०० रुपयांपासून अधिकच आहे. त्यामुळे आर्थिक लूट तर होतेच, परंतु केक खाल्ल्यानंतर त्यामध्ये असलेल्या केमिकलयुक्त पदार्थांमुळे माणसाच्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. याचीच दखल घेत, अनेक शेतकरी ग्रुप सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले असून, सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या फळांना पाहिजे त्या प्रमाणात मागणी नाही. ‘शेतकरी जगला, तर देश जगेल’ म्हणून शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या फळांना कापून व उपस्थितांना फळे वाटून जर वाढदिवस साजरा केला, तर फळांची मागणी वाढून शेतकरी आर्थिक सधन होतील. नागरिकांचे आरोग्यही यामुळे सुधारेल. यासाठी प्रत्येकाने जर वाढदिवशी शपथ घेतली की, मी केक कापून नाही, तर फळे कापून माझा वाढदिवस साजरा करेन व शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावेन, तर शेतकरी नक्कीच आत्मनिर्भर होईल. या संदर्भात सध्या सोशल मीडियावर संदेश व्हायरल करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतात पिकविलेले फळ हे आरोग्यवर्धक व शक्तिवर्धक असते. त्यामधून माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असलेले अ जीवनसत्व व सी जीवनसत्व हे घटक मिळतात. मिनरलही मोठ्या प्रमाणात शरीरासाठी मिळतात. त्यामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होऊन आजाराचे प्रमाण कमी होते. उलट केकमध्ये असलेल्या केमिकलमुळे माणसाच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय आरोग्याच्या व आर्थिक दृष्टीने हितकारक आहे.

- डॉ.सुभाष खुरद, बालरोग तज्ज्ञ, मेहकर