शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आत्महत्येनंतरही मदत नाही!

By admin | Updated: April 13, 2016 01:12 IST

बुलडाणा जिल्ह्यात तीन महिन्यांत ४४ शेतकरी आत्महत्या; ४0 कुटुंबांना अद्याप न्यायाची प्रतीक्षा.

नीलेश शहाकार/ बुलडाणासततची नापिकी व कर्जामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी अनेक सामाजिक हात पुढे येत असले, तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. यावर्षी तीन महिन्यात झालेल्या ४४ शेतकरी आत्महत्यांपैकी ४0 प्रकरणे अद्यापही शासनाच्या उंबरठय़ावर प्रलंबित आहेत, तर केवळ दोन शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीचा लाभ झाला असल्याची बाब पुढे आली आहे. मंगळवारी पुन्हा दोन शेतकर्‍यांनी गळफास जवळ केल्याने हा आकडा वाढताच आहे. यावर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात ४४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. जानेवारी महिन्यात नऊ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यांपैकी केवळ दोन प्रकरणं पात्र ठरवून त्यांना मदत देण्यात आली. दोन प्रकरणं अपात्र ठरवून पाच प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्याची माहिती संकलीत करणे सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्यांबाबत विचार करायला वेळच मिळाला नसल्याचे चित्र दिसले. कारण फेब्रुवारीत १६ आणि मार्चमध्ये १९ शेतकरी आत्महत्या झाल्यानंतरही यापैकी एकही प्रकरण पात्र व अपात्र घोषित न करता, सर्व प्रकरणं चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे ४0 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.