शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आत्महत्येनंतरही मदत नाही!

By admin | Updated: April 13, 2016 01:12 IST

बुलडाणा जिल्ह्यात तीन महिन्यांत ४४ शेतकरी आत्महत्या; ४0 कुटुंबांना अद्याप न्यायाची प्रतीक्षा.

नीलेश शहाकार/ बुलडाणासततची नापिकी व कर्जामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी अनेक सामाजिक हात पुढे येत असले, तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. यावर्षी तीन महिन्यात झालेल्या ४४ शेतकरी आत्महत्यांपैकी ४0 प्रकरणे अद्यापही शासनाच्या उंबरठय़ावर प्रलंबित आहेत, तर केवळ दोन शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीचा लाभ झाला असल्याची बाब पुढे आली आहे. मंगळवारी पुन्हा दोन शेतकर्‍यांनी गळफास जवळ केल्याने हा आकडा वाढताच आहे. यावर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात ४४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. जानेवारी महिन्यात नऊ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यांपैकी केवळ दोन प्रकरणं पात्र ठरवून त्यांना मदत देण्यात आली. दोन प्रकरणं अपात्र ठरवून पाच प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्याची माहिती संकलीत करणे सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्यांबाबत विचार करायला वेळच मिळाला नसल्याचे चित्र दिसले. कारण फेब्रुवारीत १६ आणि मार्चमध्ये १९ शेतकरी आत्महत्या झाल्यानंतरही यापैकी एकही प्रकरण पात्र व अपात्र घोषित न करता, सर्व प्रकरणं चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे ४0 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.