शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

आत्महत्येनंतरही मदत नाही!

By admin | Updated: April 13, 2016 01:12 IST

बुलडाणा जिल्ह्यात तीन महिन्यांत ४४ शेतकरी आत्महत्या; ४0 कुटुंबांना अद्याप न्यायाची प्रतीक्षा.

नीलेश शहाकार/ बुलडाणासततची नापिकी व कर्जामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी अनेक सामाजिक हात पुढे येत असले, तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. यावर्षी तीन महिन्यात झालेल्या ४४ शेतकरी आत्महत्यांपैकी ४0 प्रकरणे अद्यापही शासनाच्या उंबरठय़ावर प्रलंबित आहेत, तर केवळ दोन शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीचा लाभ झाला असल्याची बाब पुढे आली आहे. मंगळवारी पुन्हा दोन शेतकर्‍यांनी गळफास जवळ केल्याने हा आकडा वाढताच आहे. यावर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात ४४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. जानेवारी महिन्यात नऊ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यांपैकी केवळ दोन प्रकरणं पात्र ठरवून त्यांना मदत देण्यात आली. दोन प्रकरणं अपात्र ठरवून पाच प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्याची माहिती संकलीत करणे सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्यांबाबत विचार करायला वेळच मिळाला नसल्याचे चित्र दिसले. कारण फेब्रुवारीत १६ आणि मार्चमध्ये १९ शेतकरी आत्महत्या झाल्यानंतरही यापैकी एकही प्रकरण पात्र व अपात्र घोषित न करता, सर्व प्रकरणं चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे ४0 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.