शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अग्रिम कर्जासाठी एकही शेतकरी पात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:44 IST

रुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्‍यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्‍याला अग्रिम दहा हजार रुपये मिळाले नाहीत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र बँक चांडोळ येथील प्रकार बँक खाते एनपीएमध्ये गेल्याने अग्रिम मंजूर करता येणार नसल्याची बँक अधिक-यांची स्पष्टोक्ती

बबन फेपाळे । लोकमत न्यूज नेटवर्करुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्‍यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्‍याला अग्रिम दहा हजार रुपये मिळाले नाहीत.शासनाने अल्पभूधारक सर्व शेतकर्‍यांचे दीड लाखांच्या आत कर्ज माफ केले. तशाप्रकारची घोषणा मंत्र्यांनी केली. तसेच पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांचाही आता कर्जमाफीत समावेश करण्यात आला आहे. २00९ पासून तर २0१६ पर्यंत थकीत असलेले कर्ज शासनाने माफ केले आहे. त्यानुसार परिसरातील सर्व शेतकरी शासनाच्या निकषात बसतात. तसेच शेतकर्‍यांना खरिपाच्या पेरणीसाठी मदत म्हणून अग्रिम १0 हजारांची मदत जाहीर केली. त्यानुसार चांडोळ परिसरातील कुलमखेड, माेंढाळा, सातगाव म्ह., म्हसला बु., म्हसला खु., ईरला, चांडोळ, रुईखेड मां., मोहोज, भडगाव, ढंगारपूर, जांब आदी गावांतील एकूण ३00 शेतकर्‍यांनी रीतसर अर्ज भरून शेतीची महत्त्वाची कामे असताना दिवसभर बँकेत रांगा लावून अर्ज भरून दिले. एका अर्जासाठी कमीत कमी ३00 रुपयांपर्यत खर्च झाला. सध्या शेतात कामे सुरू असून, शेतकर्‍यांना २00 ते ३00 रुपये रोज मिळत आहे. सदर मजुरीला न जाता शेतकरी बँकेत उभे राहिले. त्यानंतर शेतकर्‍यांच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली. त्यावर तुमचे बँक खाते एनपीएमध्ये गेल्याने अग्रिम मंजूर करता येणार नसल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले. त्यामुळे स्वत: जवळ पैसे असते, तर खाते एनपीएमध्ये गेलेच कशाला असते, अशी शेतकर्‍यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकर्‍यांची होत असलेली हेळसांड थांबविण्याची मागणी परिसरातून होत आहे.

२१ महिन्यांपेक्षा जास्त काळ खाते थकल्यामुळे ते एनपीएमध्ये जाते. त्यामुळे अग्रिमसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अग्रिम जमा करता येणार नाही.- चंद्रशेखर पाठराबेव्यवस्थापक, महाराष्ट्र बँक चांडोळ