शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अग्रिम कर्जासाठी एकही शेतकरी पात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:44 IST

रुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्‍यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्‍याला अग्रिम दहा हजार रुपये मिळाले नाहीत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र बँक चांडोळ येथील प्रकार बँक खाते एनपीएमध्ये गेल्याने अग्रिम मंजूर करता येणार नसल्याची बँक अधिक-यांची स्पष्टोक्ती

बबन फेपाळे । लोकमत न्यूज नेटवर्करुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्‍यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्‍याला अग्रिम दहा हजार रुपये मिळाले नाहीत.शासनाने अल्पभूधारक सर्व शेतकर्‍यांचे दीड लाखांच्या आत कर्ज माफ केले. तशाप्रकारची घोषणा मंत्र्यांनी केली. तसेच पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांचाही आता कर्जमाफीत समावेश करण्यात आला आहे. २00९ पासून तर २0१६ पर्यंत थकीत असलेले कर्ज शासनाने माफ केले आहे. त्यानुसार परिसरातील सर्व शेतकरी शासनाच्या निकषात बसतात. तसेच शेतकर्‍यांना खरिपाच्या पेरणीसाठी मदत म्हणून अग्रिम १0 हजारांची मदत जाहीर केली. त्यानुसार चांडोळ परिसरातील कुलमखेड, माेंढाळा, सातगाव म्ह., म्हसला बु., म्हसला खु., ईरला, चांडोळ, रुईखेड मां., मोहोज, भडगाव, ढंगारपूर, जांब आदी गावांतील एकूण ३00 शेतकर्‍यांनी रीतसर अर्ज भरून शेतीची महत्त्वाची कामे असताना दिवसभर बँकेत रांगा लावून अर्ज भरून दिले. एका अर्जासाठी कमीत कमी ३00 रुपयांपर्यत खर्च झाला. सध्या शेतात कामे सुरू असून, शेतकर्‍यांना २00 ते ३00 रुपये रोज मिळत आहे. सदर मजुरीला न जाता शेतकरी बँकेत उभे राहिले. त्यानंतर शेतकर्‍यांच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली. त्यावर तुमचे बँक खाते एनपीएमध्ये गेल्याने अग्रिम मंजूर करता येणार नसल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले. त्यामुळे स्वत: जवळ पैसे असते, तर खाते एनपीएमध्ये गेलेच कशाला असते, अशी शेतकर्‍यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकर्‍यांची होत असलेली हेळसांड थांबविण्याची मागणी परिसरातून होत आहे.

२१ महिन्यांपेक्षा जास्त काळ खाते थकल्यामुळे ते एनपीएमध्ये जाते. त्यामुळे अग्रिमसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अग्रिम जमा करता येणार नाही.- चंद्रशेखर पाठराबेव्यवस्थापक, महाराष्ट्र बँक चांडोळ