शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

यंदा ‘पाणीबाणी’ नाही; बुलडाणा शहरवासीयांना ऑगस्टपर्यंत दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:47 IST

बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. 

ठळक मुद्देयेळगाव धरणात पुरेसा जलसाठा 

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे अनेक ठिकाणी जलसंकट ओढवले आहे. तथापि, शहरवासीयांना मात्र या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेद्वारे १ लाख लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाइपलाइन तर काही भागात थ्री व्हॉल्व्ह सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभात शहर परिसरात चवथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत काही वर्षात कमी पर्जन्यमानामुळे येळगाव धरणात जलसाठा कमी प्रमाणात होता. परिणामी नागरिकांना उन्हाळ्याच्या शेवटी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते; मात्र यावेळी मागील दोन वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. धरणात ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट नसले तरी जनतेने पाण्याचे नियोजन व काटकसरीने वापरण्याची गरज आहे.  

येळगाव धरणात ५.१0 दलघमी जलसाठाबुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात पाणीसाठय़ाची क्षमता १२.४0 दलघमी आहे. यावर्षी पावसाळय़ाच्या शेवटी धरण जवळपास १00 टक्के भरले होते. सध्या धरणात ५.१0 दलघमी जलसाठा असून, ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरवासीयांसह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यापूर्वीच पावसाळा सुरू होणार असल्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. 

‘अवैध नळधारकांवर कारवाई व्हावी!’शहर परिसरात अनेक भागात अवैध नळधारक आहेत. अशा नळधारकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पालिकेद्वारे पाणीटंचाई काळात किंवा उन्हाळ्यात दिले जाते; मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या कारवाईकडे कोणीही लक्ष देत नाही. परिणामी दरवर्षी अवैध नळधारकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. पालिकेने आताच अवैध नळधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. 

शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन नळाला तोट्या लावाव्यात तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी. - करणकुमार चव्हाणमुख्याधिकारी, नगरपालिका, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाyelgao damयेळगाव धरण