शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ‘पाणीबाणी’ नाही; बुलडाणा शहरवासीयांना ऑगस्टपर्यंत दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:47 IST

बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. 

ठळक मुद्देयेळगाव धरणात पुरेसा जलसाठा 

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळयापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे अनेक ठिकाणी जलसंकट ओढवले आहे. तथापि, शहरवासीयांना मात्र या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेद्वारे १ लाख लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाइपलाइन तर काही भागात थ्री व्हॉल्व्ह सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभात शहर परिसरात चवथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत काही वर्षात कमी पर्जन्यमानामुळे येळगाव धरणात जलसाठा कमी प्रमाणात होता. परिणामी नागरिकांना उन्हाळ्याच्या शेवटी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते; मात्र यावेळी मागील दोन वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. धरणात ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट नसले तरी जनतेने पाण्याचे नियोजन व काटकसरीने वापरण्याची गरज आहे.  

येळगाव धरणात ५.१0 दलघमी जलसाठाबुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात पाणीसाठय़ाची क्षमता १२.४0 दलघमी आहे. यावर्षी पावसाळय़ाच्या शेवटी धरण जवळपास १00 टक्के भरले होते. सध्या धरणात ५.१0 दलघमी जलसाठा असून, ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरवासीयांसह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यापूर्वीच पावसाळा सुरू होणार असल्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. 

‘अवैध नळधारकांवर कारवाई व्हावी!’शहर परिसरात अनेक भागात अवैध नळधारक आहेत. अशा नळधारकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पालिकेद्वारे पाणीटंचाई काळात किंवा उन्हाळ्यात दिले जाते; मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या कारवाईकडे कोणीही लक्ष देत नाही. परिणामी दरवर्षी अवैध नळधारकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. पालिकेने आताच अवैध नळधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. 

शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन नळाला तोट्या लावाव्यात तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी. - करणकुमार चव्हाणमुख्याधिकारी, नगरपालिका, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाyelgao damयेळगाव धरण