शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरचे डांबरही सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

धाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून रहदारी करणे आता जीवावरचा खेळ बनला आहे. या रस्त्याने साधे चालणेही अवघड झाले आहे. ...

धाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून रहदारी करणे आता जीवावरचा खेळ बनला आहे. या रस्त्याने साधे चालणेही अवघड झाले आहे. अनेक मार्गांवर खड्ड्यांची मोजदाद केल्यास कधी तरी हा मार्ग पूर्णतः डांबरीकरण झाला होता काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. खड्डेमय रस्त्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक रस्त्यांवर तर डांबर शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे.

अगदी नजीकच्या असलेल्या ८ ते १० कि.मी. लांबीच्या ग्रामीण मार्गाची डागडुजी, दुरुस्ती आदी काही प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षेत येतात किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. धाड ते चांडोळ या गावांचे किमान अंतर नऊ कि.मी. आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर बांधकाम विभागाच्या वतीने प्रतिवर्षी देखभाल दुरुस्ती केली नाही. प्रत्येक वर्षी या मार्गाची दुरवस्था अधिक प्रमाणात होत गेली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखली या कार्यालयाच्या अंतर्गत धाड भागातील रस्ते येतात. गतकाळात धाड-चांडोळ, धाड-भडगाव, धाड-जामठी, धाड-कुंबेफळ, टाकळी या रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. वरचेवर काही ठिकाणी ठिगळे लावल्यागत दुरुस्ती करून आपण जबाबदारी पूर्ण केल्याचे एक समाधान बांधकाम विभागाचे अधिकारी करून घेत आहेत. मात्र त्यांच्या या निर्धास्त कारभाराने या भागातील अनेकांनी याच रस्त्यावर अपघातात आपला अमूल्य जीव गमावला आहे, हे दुर्दैव आहे.

रस्ता डांबीकरणाचा होता का?

धाड भागात चांडोळ हे एक मोठी लोकसंख्या आणि व्यापारी केंद्र असलेले गाव आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, काॅलेज, बँक, विविध सार्वजनिक सेवा केंद्रे आहेत. विदर्भ आणि मराठवाडा परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना या ठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी चांडोळ येथे ये-जा करावी लागते. परंतु या गावाला जोडणारा महत्त्वपूर्ण धाड-चांडोळ रस्ता मागणी काही वर्षांत रहदारीच्या कामाचा राहिलाच नाही. आता हा रस्ता डांबरीकरणाचाच आहे काय, असा प्रश्न वाहनधारकांना पडतो.

रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काहीही उपाययोजना केली नसल्यामुळे आज पावसाळ्यात हा रस्ता नागरिकांना जीवघेणा ठरू पाहत आहे. यावर तातडीने बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्ता रहदारीकरता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.