शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

रस्त्यावरचे डांबरही सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

धाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून रहदारी करणे आता जीवावरचा खेळ बनला आहे. या रस्त्याने साधे चालणेही अवघड झाले आहे. ...

धाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून रहदारी करणे आता जीवावरचा खेळ बनला आहे. या रस्त्याने साधे चालणेही अवघड झाले आहे. अनेक मार्गांवर खड्ड्यांची मोजदाद केल्यास कधी तरी हा मार्ग पूर्णतः डांबरीकरण झाला होता काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. खड्डेमय रस्त्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक रस्त्यांवर तर डांबर शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे.

अगदी नजीकच्या असलेल्या ८ ते १० कि.मी. लांबीच्या ग्रामीण मार्गाची डागडुजी, दुरुस्ती आदी काही प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षेत येतात किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. धाड ते चांडोळ या गावांचे किमान अंतर नऊ कि.मी. आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर बांधकाम विभागाच्या वतीने प्रतिवर्षी देखभाल दुरुस्ती केली नाही. प्रत्येक वर्षी या मार्गाची दुरवस्था अधिक प्रमाणात होत गेली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखली या कार्यालयाच्या अंतर्गत धाड भागातील रस्ते येतात. गतकाळात धाड-चांडोळ, धाड-भडगाव, धाड-जामठी, धाड-कुंबेफळ, टाकळी या रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. वरचेवर काही ठिकाणी ठिगळे लावल्यागत दुरुस्ती करून आपण जबाबदारी पूर्ण केल्याचे एक समाधान बांधकाम विभागाचे अधिकारी करून घेत आहेत. मात्र त्यांच्या या निर्धास्त कारभाराने या भागातील अनेकांनी याच रस्त्यावर अपघातात आपला अमूल्य जीव गमावला आहे, हे दुर्दैव आहे.

रस्ता डांबीकरणाचा होता का?

धाड भागात चांडोळ हे एक मोठी लोकसंख्या आणि व्यापारी केंद्र असलेले गाव आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, काॅलेज, बँक, विविध सार्वजनिक सेवा केंद्रे आहेत. विदर्भ आणि मराठवाडा परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना या ठिकाणी दैनंदिन व्यवहारासाठी चांडोळ येथे ये-जा करावी लागते. परंतु या गावाला जोडणारा महत्त्वपूर्ण धाड-चांडोळ रस्ता मागणी काही वर्षांत रहदारीच्या कामाचा राहिलाच नाही. आता हा रस्ता डांबरीकरणाचाच आहे काय, असा प्रश्न वाहनधारकांना पडतो.

रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काहीही उपाययोजना केली नसल्यामुळे आज पावसाळ्यात हा रस्ता नागरिकांना जीवघेणा ठरू पाहत आहे. यावर तातडीने बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्ता रहदारीकरता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.