शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

बुलडाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी निर्धार परिषदेचे आयोजन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:55 IST

दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात अग्रेसर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या कर्त्या समाजसुधारकांच्या मार्गदर्शनात १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये सदर परिषद होत आहे. परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वृषाली बोंद्रे, आ. राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

ठळक मुद्दे हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात अग्रेसर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या कर्त्या समाजसुधारकांच्या मार्गदर्शनात १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये सदर परिषद होत आहे. परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वृषाली बोंद्रे, आ. राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.येथील पत्रकार भवनमध्ये निर्धार परिषदेच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आ. राहुल बोंद्रे, वृषाली बोंद्रे, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, पंजाब गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी माहिती देताना आ. बोंद्रे म्हणाले की, राष्ट्रमाता माँ जिजाऊंना जन्म देणार्‍या मातृतीर्थ जिल्ह्यात सध्या गावागावामध्ये दारू विक्रीचा उच्चांक निदर्शनास येत आहे. या दारूच्या व्यसनामुळे माता भगिनी त्रस्त आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषद आयोजित केली असल्याचे आ. बोंद्रे यांनी सांगितले. १५ सप्टेंबर रोजी या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन दुपारी १२ वाजता सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते होईल. आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, बुलडाणा नगराध्यक्ष नजमुन्नीसा बेगम यांची उद्घाटन समारंभात उपस्थिती राहणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ‘हिरकणी’च्या संस्थापक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे राहतील. या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन आ. राहुल बोंद्रे, नरेंद्र लांजेवार, प्रेमलता सोनुने, गणेश वानखेडे, सुनीता भांड, राजेंद्र वानखेडे, ज्योती ढोकणे, पंजाब गायकवाड, मनजितसिंग शीख, ज्योती बियाणी, शोभा सवडतकर यांनी केले आहे.