शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजारावर शेतकरी अन्नधान्य योजनेपासून वंचित

By admin | Updated: February 7, 2017 03:09 IST

दोन महिन्यापासून ४ हजार ७00 क्विंटल अन्नधान्य आलेच नाही

उद्धव फंगाळ मेहकर (जि. बुलडाणा), दि. ६- शेतकर्‍यांना गहू व तांदूळ स्वस्त दरात मिळावे, यासाठी प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानामधून दरमहा शेतकर्‍यांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात येते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ४ हजार ७00 क्विंटल अन्नधान्य मेहकर तालुक्यात आले नसल्याने ९ हजारावर लाभार्थी शेतकरी लाभार्थी अन्नधान्य योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांचे मनोबल वाढावे, शेतकर्‍यांना शासनाकडून मदत व्हावी यासाठी शेतकरी अन्नधान्य योजना सुरु करण्यात आली. मात्र, या योजनेचा मेहकर तालुक्यात बोजवारा उडाला असून, डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे अन्नधान्य शेतकरी लाभार्थ्यांना मिळालेच नाही. त्यामुळे हजारो शेतकरी अन्नधान्य योजनेपासून वंचित आहेत. तालुक्यात शेतकरी अन्नधान्य योजनेचे ९ हजार ८२२ शेतकरी लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दर महिन्याला १ हजार ८७४.९६ क्विंटल गहू तर ४६८.७४ क्विंटल तांदूळ लागतो. मात्र दोन महिन्यापासून अन्नधान्य आलेच नाही. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण होत आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्याचा शेतकरी अन्नधान्य योजनेतील गहू व तांदूळ आले नसल्याने वाटप करण्यात आले नाही. त्यासंदर्भात जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले असून, धान्य आल्यावर लवकरच वाटप करण्यात येईल.- ए. एफ. सैय्यदअन्नपुरवठा निरिक्षक अधिकारी, मेहकर.