शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

नऊ हजारावर शेतकरी अन्नधान्य योजनेपासून वंचित

By admin | Updated: February 7, 2017 03:09 IST

दोन महिन्यापासून ४ हजार ७00 क्विंटल अन्नधान्य आलेच नाही

उद्धव फंगाळ मेहकर (जि. बुलडाणा), दि. ६- शेतकर्‍यांना गहू व तांदूळ स्वस्त दरात मिळावे, यासाठी प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानामधून दरमहा शेतकर्‍यांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात येते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ४ हजार ७00 क्विंटल अन्नधान्य मेहकर तालुक्यात आले नसल्याने ९ हजारावर लाभार्थी शेतकरी लाभार्थी अन्नधान्य योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांचे मनोबल वाढावे, शेतकर्‍यांना शासनाकडून मदत व्हावी यासाठी शेतकरी अन्नधान्य योजना सुरु करण्यात आली. मात्र, या योजनेचा मेहकर तालुक्यात बोजवारा उडाला असून, डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे अन्नधान्य शेतकरी लाभार्थ्यांना मिळालेच नाही. त्यामुळे हजारो शेतकरी अन्नधान्य योजनेपासून वंचित आहेत. तालुक्यात शेतकरी अन्नधान्य योजनेचे ९ हजार ८२२ शेतकरी लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दर महिन्याला १ हजार ८७४.९६ क्विंटल गहू तर ४६८.७४ क्विंटल तांदूळ लागतो. मात्र दोन महिन्यापासून अन्नधान्य आलेच नाही. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण होत आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्याचा शेतकरी अन्नधान्य योजनेतील गहू व तांदूळ आले नसल्याने वाटप करण्यात आले नाही. त्यासंदर्भात जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले असून, धान्य आल्यावर लवकरच वाटप करण्यात येईल.- ए. एफ. सैय्यदअन्नपुरवठा निरिक्षक अधिकारी, मेहकर.