शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

जिल्ह्यात ८ मार्च ते १६ मार्च दरम्यान रात्रीची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST

जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित केला असून सर्व ठिकाणचे बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे ...

जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित केला असून सर्व ठिकाणचे बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे ८ मार्च ते १६ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने सुरू राहतील. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळणे त्यांना बंधनकारक राहणार आहे. त्याचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. हॉटेल्स, खाद्यगृहे ही सकाळी ९ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत त्यांना केवळ पार्सल देण्याची मुभा राहील. या व्यतिरिक्त या कालावधीत सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री ९:३० पर्यंत मुभा राहील. या कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा या वेळापत्रकानुसार होणार असून परीक्षेच्या कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र संबंधितांनी सोबत ठेवणे अनिवार्य राहील.

--लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना मुभा--

या कालावधीत लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी घेणे अनिवार्य राहील. तसेच लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बॅँड पथकातील सदस्यांचाही समावेश राहील, असे ६ मार्च रोजीच्या आदेशात स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली, आंदोलने यावर बंदी घालण्यात आली आहे; मात्र केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन शासकीय विभागास निवेदन देता येईल, असेही आदेशात नमूद केेले आहे.

--बाजार समितीनेही गर्दीवर नियंत्रण ठेवावे--

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनावर राहील. तसेच शारीरिक अंतराचे पालन, मास्कचा वापर होतो की नाही, तथा हात धुण्याची व्यवस्था बाजार समिती सचिवांनीच करणे गरजेचे आहे. यासोबतच जिल्हा उपनिबंधकांनी सर्व संबंधित बाजार समित्यांमध्ये जाऊन नियमांचे पालन होते की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.