शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

जिल्ह्यात ८ मार्च ते १६ मार्च दरम्यान रात्रीची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST

जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित केला असून सर्व ठिकाणचे बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे ...

जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित केला असून सर्व ठिकाणचे बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे ८ मार्च ते १६ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने सुरू राहतील. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळणे त्यांना बंधनकारक राहणार आहे. त्याचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. हॉटेल्स, खाद्यगृहे ही सकाळी ९ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत त्यांना केवळ पार्सल देण्याची मुभा राहील. या व्यतिरिक्त या कालावधीत सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री ९:३० पर्यंत मुभा राहील. या कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा या वेळापत्रकानुसार होणार असून परीक्षेच्या कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र संबंधितांनी सोबत ठेवणे अनिवार्य राहील.

--लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना मुभा--

या कालावधीत लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी घेणे अनिवार्य राहील. तसेच लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बॅँड पथकातील सदस्यांचाही समावेश राहील, असे ६ मार्च रोजीच्या आदेशात स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली, आंदोलने यावर बंदी घालण्यात आली आहे; मात्र केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन शासकीय विभागास निवेदन देता येईल, असेही आदेशात नमूद केेले आहे.

--बाजार समितीनेही गर्दीवर नियंत्रण ठेवावे--

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनावर राहील. तसेच शारीरिक अंतराचे पालन, मास्कचा वापर होतो की नाही, तथा हात धुण्याची व्यवस्था बाजार समिती सचिवांनीच करणे गरजेचे आहे. यासोबतच जिल्हा उपनिबंधकांनी सर्व संबंधित बाजार समित्यांमध्ये जाऊन नियमांचे पालन होते की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.