शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

साहित्य संमेलनाच्या नवीन स्थळाची उत्सुकता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:17 IST

हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव मागे घे तल्यामुळे  सदर संमेलन आता कुठे होते, याबाबत साहि ित्यकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत साहित्य  महामंडळ निर्णय घेणार असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार  आहे. तसेच हिवरा आश्रम येथे संमेलन होऊ शकले नाही,  तर बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव  पाठविणार आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील साहित्यिकांमध्ये नाराजी सांस्कृतिक हानी झाल्याची प्रतिक्रिया 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव मागे घे तल्यामुळे  सदर संमेलन आता कुठे होते, याबाबत साहि ित्यकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत साहित्य  महामंडळ निर्णय घेणार असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार  आहे. तसेच हिवरा आश्रम येथे संमेलन होऊ शकले नाही,  तर बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव  पाठविणार आहे. ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याकरिता  देशभरातून सहा प्रस्ताव आले होते. त्यापैकी तीन ठिकाणांची  पाहणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. यामध्ये  दिल्ली, बडोदा व हिवरा आश्रमचा समावेश होता. दिल्लीने  प्रस्ताव मागे घेतल्यामुळे बडोदा किंवा हिवरा आश्रम या दोन पैकी एका ठिकाणी संमेलन घेण्याचा पर्याय महामंडळापूढे  होता. त्यापैकी हिवरा आश्रम हे स्थळ निवडण्यात आले.  त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये नवचैतन्य  निर्माण झाले होते; मात्र अंनिसने विरोध दर्शविल्यानंतर  विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घेतला. संमेलन स्थळ  निश्‍चित झाल्यानंतर प्रस्ताव मागे घेण्यात आला, तर अन्य स् थळांचा विचार करण्यात येतो. यावेळी दिल्लीने प्रस्ताव मागे  घेतल्याने केवळ आता बडोदा हेच एकमेव स्थळ आहे.  त्यामुळे महामंडळ बडोद्याला प्राधान्य देते की पुन्हा नव्याने  प्रस्ताव मागविते, याकडे साहित्य वतरुळाचे लक्ष लागले आहे.  याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री पाद भालचंद्र जोशी यांना विचारणा केली असता, त्यांनी  महामंडळ चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेणार  असल्याचे सांगितले. संमेलन रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये नाराजी  आहे. तसेच ही साहित्य क्षेत्रातील अपरिमित हानी  असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यानंतरही ही संधी  मिळेल की नाही, अशी चिंताही व्यक्त केली.   साहित्य महामंडळाने प्रस्ताव मागितले, तर बुलडाणा येथील  विदर्भ साहित्य संघाची शाखा प्रस्ताव पाठविण्यात येणार  आहे. ९१ वे संमेलन जिल्ह्यातच व्हावे, अशी साहि ित्यकांची इच्छा आहे. त्यामुळे आता बुलडाणा येथे संमेलन  घेण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.  

जिल्हय़ातील साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.  इतिहासात पहिल्यांदाच जिल्हय़ाला अखिल भारतीय संमेलन  आयोजित करण्याची संधी मिळाली होती; मात्र ती संधी  हिरावल्या गेली. आता यानंतर संधी केव्हा येईल, याची  शाश्‍वती नाही. बुलडाणा जिल्हय़ाला मोठी वाड्मयीन परंपरा  लाभली आहे. त्या परंपरेला पुन्हा संमेलनाच्या माध्यमातून  उजाळा मिळाला असता. - अजिम नवाज राही, कवी, साहित्यिक, बुलडाणा.

हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घे तला आहे. त्यामुळे आता महामंडळ पुढील दिशा ठरविणार  आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. - श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी  साहित्य महामंडळ. 

 हिवरा आश्रम येथे काही कारणास्तव संमेलन होऊ शकले  नाही; मात्र आम्ही जहाज सोडले नसून, जर महामंडळाने  पुन्हा प्रस्ताव मागितला, तर बुलडाणा येथे संमेलन  घेण्यासाठी प्रस्ताव पाठविणार आहे. संमेलन यशस्वीपणे  घेऊन दाखवू. - नरेंद्र लांजेवार,साहित्यिक बुलडाणा.

संमेलन जिल्हय़ात न होणे हे दुर्दैव आहे. इतिहासात  पहिल्यांदाच जिल्हय़ात संमेलन होणार होते. हा जिल्हय़ाचा  गौरव होता. जिल्हय़ाला साहित्याची मोठी परंपरा लाभली  आहे. संमेलनामुळे जिल्हय़ाचे नाव साहित्य क्षेत्रात मोठे  होणार होते.   - गोविंद गायकी, साहित्यिक, बुलडाणा.

साहित्य संमेलन जिल्हय़ात न होणे ही सांस्कृतिक हानी  आहे. या पिढीला मिळालेली ही खूप मोठी संधी होती. साहि त्य परंपरेला उजाळा मिळाला असता; मात्र ती हिरावल्या  गेली. महामंडळाचा कारभार सध्या नागपूरला असल्यामुळे ही  संधी मिळाली. यानंतर कारभार दुसरीकडे गेला, तर कदाचित  मिळणार नाही.  - सुरेश साबळे, साहित्यिक, बुलडाणा.