शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साहित्य संमेलनाच्या नवीन स्थळाची उत्सुकता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:17 IST

हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव मागे घे तल्यामुळे  सदर संमेलन आता कुठे होते, याबाबत साहि ित्यकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत साहित्य  महामंडळ निर्णय घेणार असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार  आहे. तसेच हिवरा आश्रम येथे संमेलन होऊ शकले नाही,  तर बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव  पाठविणार आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील साहित्यिकांमध्ये नाराजी सांस्कृतिक हानी झाल्याची प्रतिक्रिया 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव मागे घे तल्यामुळे  सदर संमेलन आता कुठे होते, याबाबत साहि ित्यकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत साहित्य  महामंडळ निर्णय घेणार असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार  आहे. तसेच हिवरा आश्रम येथे संमेलन होऊ शकले नाही,  तर बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव  पाठविणार आहे. ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याकरिता  देशभरातून सहा प्रस्ताव आले होते. त्यापैकी तीन ठिकाणांची  पाहणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. यामध्ये  दिल्ली, बडोदा व हिवरा आश्रमचा समावेश होता. दिल्लीने  प्रस्ताव मागे घेतल्यामुळे बडोदा किंवा हिवरा आश्रम या दोन पैकी एका ठिकाणी संमेलन घेण्याचा पर्याय महामंडळापूढे  होता. त्यापैकी हिवरा आश्रम हे स्थळ निवडण्यात आले.  त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये नवचैतन्य  निर्माण झाले होते; मात्र अंनिसने विरोध दर्शविल्यानंतर  विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घेतला. संमेलन स्थळ  निश्‍चित झाल्यानंतर प्रस्ताव मागे घेण्यात आला, तर अन्य स् थळांचा विचार करण्यात येतो. यावेळी दिल्लीने प्रस्ताव मागे  घेतल्याने केवळ आता बडोदा हेच एकमेव स्थळ आहे.  त्यामुळे महामंडळ बडोद्याला प्राधान्य देते की पुन्हा नव्याने  प्रस्ताव मागविते, याकडे साहित्य वतरुळाचे लक्ष लागले आहे.  याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री पाद भालचंद्र जोशी यांना विचारणा केली असता, त्यांनी  महामंडळ चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेणार  असल्याचे सांगितले. संमेलन रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये नाराजी  आहे. तसेच ही साहित्य क्षेत्रातील अपरिमित हानी  असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यानंतरही ही संधी  मिळेल की नाही, अशी चिंताही व्यक्त केली.   साहित्य महामंडळाने प्रस्ताव मागितले, तर बुलडाणा येथील  विदर्भ साहित्य संघाची शाखा प्रस्ताव पाठविण्यात येणार  आहे. ९१ वे संमेलन जिल्ह्यातच व्हावे, अशी साहि ित्यकांची इच्छा आहे. त्यामुळे आता बुलडाणा येथे संमेलन  घेण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.  

जिल्हय़ातील साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.  इतिहासात पहिल्यांदाच जिल्हय़ाला अखिल भारतीय संमेलन  आयोजित करण्याची संधी मिळाली होती; मात्र ती संधी  हिरावल्या गेली. आता यानंतर संधी केव्हा येईल, याची  शाश्‍वती नाही. बुलडाणा जिल्हय़ाला मोठी वाड्मयीन परंपरा  लाभली आहे. त्या परंपरेला पुन्हा संमेलनाच्या माध्यमातून  उजाळा मिळाला असता. - अजिम नवाज राही, कवी, साहित्यिक, बुलडाणा.

हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घे तला आहे. त्यामुळे आता महामंडळ पुढील दिशा ठरविणार  आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. - श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी  साहित्य महामंडळ. 

 हिवरा आश्रम येथे काही कारणास्तव संमेलन होऊ शकले  नाही; मात्र आम्ही जहाज सोडले नसून, जर महामंडळाने  पुन्हा प्रस्ताव मागितला, तर बुलडाणा येथे संमेलन  घेण्यासाठी प्रस्ताव पाठविणार आहे. संमेलन यशस्वीपणे  घेऊन दाखवू. - नरेंद्र लांजेवार,साहित्यिक बुलडाणा.

संमेलन जिल्हय़ात न होणे हे दुर्दैव आहे. इतिहासात  पहिल्यांदाच जिल्हय़ात संमेलन होणार होते. हा जिल्हय़ाचा  गौरव होता. जिल्हय़ाला साहित्याची मोठी परंपरा लाभली  आहे. संमेलनामुळे जिल्हय़ाचे नाव साहित्य क्षेत्रात मोठे  होणार होते.   - गोविंद गायकी, साहित्यिक, बुलडाणा.

साहित्य संमेलन जिल्हय़ात न होणे ही सांस्कृतिक हानी  आहे. या पिढीला मिळालेली ही खूप मोठी संधी होती. साहि त्य परंपरेला उजाळा मिळाला असता; मात्र ती हिरावल्या  गेली. महामंडळाचा कारभार सध्या नागपूरला असल्यामुळे ही  संधी मिळाली. यानंतर कारभार दुसरीकडे गेला, तर कदाचित  मिळणार नाही.  - सुरेश साबळे, साहित्यिक, बुलडाणा.