शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाच्या नवीन स्थळाची उत्सुकता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:17 IST

हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव मागे घे तल्यामुळे  सदर संमेलन आता कुठे होते, याबाबत साहि ित्यकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत साहित्य  महामंडळ निर्णय घेणार असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार  आहे. तसेच हिवरा आश्रम येथे संमेलन होऊ शकले नाही,  तर बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव  पाठविणार आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील साहित्यिकांमध्ये नाराजी सांस्कृतिक हानी झाल्याची प्रतिक्रिया 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव मागे घे तल्यामुळे  सदर संमेलन आता कुठे होते, याबाबत साहि ित्यकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत साहित्य  महामंडळ निर्णय घेणार असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार  आहे. तसेच हिवरा आश्रम येथे संमेलन होऊ शकले नाही,  तर बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव  पाठविणार आहे. ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याकरिता  देशभरातून सहा प्रस्ताव आले होते. त्यापैकी तीन ठिकाणांची  पाहणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. यामध्ये  दिल्ली, बडोदा व हिवरा आश्रमचा समावेश होता. दिल्लीने  प्रस्ताव मागे घेतल्यामुळे बडोदा किंवा हिवरा आश्रम या दोन पैकी एका ठिकाणी संमेलन घेण्याचा पर्याय महामंडळापूढे  होता. त्यापैकी हिवरा आश्रम हे स्थळ निवडण्यात आले.  त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये नवचैतन्य  निर्माण झाले होते; मात्र अंनिसने विरोध दर्शविल्यानंतर  विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घेतला. संमेलन स्थळ  निश्‍चित झाल्यानंतर प्रस्ताव मागे घेण्यात आला, तर अन्य स् थळांचा विचार करण्यात येतो. यावेळी दिल्लीने प्रस्ताव मागे  घेतल्याने केवळ आता बडोदा हेच एकमेव स्थळ आहे.  त्यामुळे महामंडळ बडोद्याला प्राधान्य देते की पुन्हा नव्याने  प्रस्ताव मागविते, याकडे साहित्य वतरुळाचे लक्ष लागले आहे.  याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री पाद भालचंद्र जोशी यांना विचारणा केली असता, त्यांनी  महामंडळ चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेणार  असल्याचे सांगितले. संमेलन रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील साहित्यिकांमध्ये नाराजी  आहे. तसेच ही साहित्य क्षेत्रातील अपरिमित हानी  असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यानंतरही ही संधी  मिळेल की नाही, अशी चिंताही व्यक्त केली.   साहित्य महामंडळाने प्रस्ताव मागितले, तर बुलडाणा येथील  विदर्भ साहित्य संघाची शाखा प्रस्ताव पाठविण्यात येणार  आहे. ९१ वे संमेलन जिल्ह्यातच व्हावे, अशी साहि ित्यकांची इच्छा आहे. त्यामुळे आता बुलडाणा येथे संमेलन  घेण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.  

जिल्हय़ातील साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.  इतिहासात पहिल्यांदाच जिल्हय़ाला अखिल भारतीय संमेलन  आयोजित करण्याची संधी मिळाली होती; मात्र ती संधी  हिरावल्या गेली. आता यानंतर संधी केव्हा येईल, याची  शाश्‍वती नाही. बुलडाणा जिल्हय़ाला मोठी वाड्मयीन परंपरा  लाभली आहे. त्या परंपरेला पुन्हा संमेलनाच्या माध्यमातून  उजाळा मिळाला असता. - अजिम नवाज राही, कवी, साहित्यिक, बुलडाणा.

हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने प्रस्ताव मागे घे तला आहे. त्यामुळे आता महामंडळ पुढील दिशा ठरविणार  आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. - श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी  साहित्य महामंडळ. 

 हिवरा आश्रम येथे काही कारणास्तव संमेलन होऊ शकले  नाही; मात्र आम्ही जहाज सोडले नसून, जर महामंडळाने  पुन्हा प्रस्ताव मागितला, तर बुलडाणा येथे संमेलन  घेण्यासाठी प्रस्ताव पाठविणार आहे. संमेलन यशस्वीपणे  घेऊन दाखवू. - नरेंद्र लांजेवार,साहित्यिक बुलडाणा.

संमेलन जिल्हय़ात न होणे हे दुर्दैव आहे. इतिहासात  पहिल्यांदाच जिल्हय़ात संमेलन होणार होते. हा जिल्हय़ाचा  गौरव होता. जिल्हय़ाला साहित्याची मोठी परंपरा लाभली  आहे. संमेलनामुळे जिल्हय़ाचे नाव साहित्य क्षेत्रात मोठे  होणार होते.   - गोविंद गायकी, साहित्यिक, बुलडाणा.

साहित्य संमेलन जिल्हय़ात न होणे ही सांस्कृतिक हानी  आहे. या पिढीला मिळालेली ही खूप मोठी संधी होती. साहि त्य परंपरेला उजाळा मिळाला असता; मात्र ती हिरावल्या  गेली. महामंडळाचा कारभार सध्या नागपूरला असल्यामुळे ही  संधी मिळाली. यानंतर कारभार दुसरीकडे गेला, तर कदाचित  मिळणार नाही.  - सुरेश साबळे, साहित्यिक, बुलडाणा.