शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवीन हरबरा येताच पडले भाव !

By admin | Updated: March 20, 2017 02:01 IST

शेतक-यांना आर्थिक फटका; तीन महिन्यात तीन हजाराने घसरले दर.

बुलडाणा, दि. १९- बाजारात नवीन हरबरा येताच हरबर्‍याचे भाव कमी झाले आहेत. गत तीन महिन्यात तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने हरबर्‍याचे दर घसरले असून, सध्या ४ हजार रुपयापर्यंतच हरबर्‍याला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे. पावसाळा चांगला झाल्याने यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी जमीनीत चांगला ओलावा होता. त्यामुळे यावर्षी हरबरा पीक चांगले आले. सध्या हरबरा काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकर्‍यांना एकरी जवळपास ८ ते १0 क्विंटलपर्यंंत हरबरा उत्पादन होत आहे. तसेच मागील वर्षी हरभर्‍याला सरासरी १0 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. त्यामुळे यावर्षी सहाजीकच हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले. तसेच जमीनीतील ओलावा, गेल्यावर्षी हरबर्‍याला मिळालेले चांगले दर व सिंचनाची सुविधा असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांनी यावर्षी हरबर्‍याचे उत्पादन घेतले. मात्र शेतकर्‍यांच्या घरात हरभर्‍याचे पीक येण्याअगोदर फेब्रुवारी महिन्यातच हरबर्‍याचे दर घसरले. आता नवीन हरबरा बाजारामध्ये येताच त्यात आणखी घसरण झाली आहे. २0१६ मध्ये सुरूवातीला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभर्‍याला ९ हजार ५00 ते ११ हजार ६00 रुपये भाव होता. तर डिसेंबरमध्ये ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव होता; मात्र गेल्या तीन महिन्यात ३ हजार रुपयांने प्रतिक्विंटल हरबर्‍याचे भाव पडले आहेत. सध्या हरबर्‍याचे उत्पादन वाढले असल्याने केवळ ४ ते ४ हजार ५00 रुपयांपर्यंंत हरबर्‍याला प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. उत्पादन येताच हरबर्‍याचे भाव घसरल्याने हरबरा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. तूरीपाठोपाठ हरबर्‍यालाही फटका!काही दिवसांपासून जिल्ह्यात तूर खरेदीचा खेळखंडोबा सुरू आहे. नाफेडकडून शेतकर्‍यांच्या तूर खरेदीस टाळाटाळ सुरू असून, शासनाने दिलेल्या हमीभावात तूर विक्री करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपडत सुरू आहे. तूरीपाठोपाठ आता हरबर्‍यालाही फटका बसत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तूर व हरभर्‍याच्या भावात हजारो रुपयांपेक्षाही घसरण आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.