शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

धामणगाव बढे येथे नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:34 IST

येथील ग्रामपंचायतमध्ये प्रशासक नेमल्यानंतर सामान्य जनतेसाठी असणाऱ्या किमान सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. येथील प्रशासकीय व्यवस्था संपूर्णपणे ...

येथील ग्रामपंचायतमध्ये प्रशासक नेमल्यानंतर सामान्य जनतेसाठी असणाऱ्या किमान सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. येथील प्रशासकीय व्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. मागील चार महिन्यांपासून गावात अस्वच्छता पसरली आहे. कित्येक महिने गावातील नाल्या साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. गावामधील सार्वजनिक खांबावरील दिवे कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठासुद्धा अनियमित आहे. गावामध्ये कोरोनाकाळात प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे कुठलेही पालन केले जात नाही. कोरोनाविषयी गावांमध्ये कुठलेही गांभीर्य राहिले नाही. मजुरी वेळेवर मिळत नसल्यामुळे गावातील नाल्या साफ करणारे मजूर कित्येक दिवसांपासून कामावर आले नाही. मध्यंतरी बाहेरगावाहून मजूर बोलावून नाल्यांची थातूरमातूर साफसफाई करण्यात आली. एकाच वेळेस संपूर्ण गावातील नाल्यांची सफाई केल्यामुळे संपूर्ण गावात घाण पसरली होती. ती वेळेवर न उचलल्यामुळे परत नालीत जाऊन पडली. गावातील घाण पाणीसुद्धा नालीमध्ये साचून राहिले आहे. गावांच्या सोयीसुविधा शासनाचा मोठा खर्च होत असताना हा पैसा नेमका कुठे खर्च होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अस्वच्छतेमुळे गावात रोगराई वाढण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांनी कोणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न आता पडला आहे.

विद्युत पुरवठ्याची समस्या

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्यामुळे विद्युत कर्मचारी सुद्धा गावात राहत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. गावकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा रामभरोसे आहेत. मध्यंतरी वसुलीसाठी गावकऱ्यांचा सार्वजनिक पाणीपुरवठा ग्रामपंचायत प्रशासनाने बंद करून गावकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.