शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे - संजय गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 19:39 IST

जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे आहे. कारण काहीही अशक्य नाही हे सिंदखेड (प्रजा) वासियांनी सिध्द केले.

- नवीन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे :  मोताळा तालुक्यातील जनुना हे अवघे ३५६ लोकवस्तीचे गाव. कायम दुष्काळी पट्टा, गाव पाणीदार करण्यासाठी गावातील चार मित्र टेलर, गवंडी, पेंटर व विद्यार्थी दुष्काळाशी एकाकी लढा देत आहे. पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत मागील दीड महिन्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत श्रमदानाचे टार्गेट पुर्ण केले आहे. त्यामध्ये शामराव कळमकर व्यवसायाने गवंडी, शिवाजी मानकर व्यवसायाने टेलर, संजय गायकवाड व्यवसायाने पेंटर व योगेश मानकर या चौघांच्या सांघिक प्रयत्नाबाबत संजय गायकवाड यांच्याशी झालेला संवाद. पाणीप्रश्नी चौघे एकत्र कसे आले?  मागील ५ ते ६ वर्षापासून गावातील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. टँकर भरण्यासाठीसुध्दा परिसरात पाणी नाही. त्यामुळे पाणी समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची गरज चर्चेतून पुढे आली व कामाला लागलो.  प्रेरणा कोठून मिळाली?  पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत मोताळा तालुक्यात मोठे काम श्रमदानातून झाले. सिंदखेड गावाने संघर्ष व श्रमदानाच्या जोरावर राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारली व गाव पाणीदार झाले. त्यांना शक्य आहे तर आपणहीकरू शकतो याची प्रेरणा मिळाली व फाऊंडेशननेही प्रतोत्साहन दिले.अपयशाची भीती वाटत होती का?  काम करित असताना परिणामाची चिंता करायची नाही, हे ठरविले होते. त्यामुळे अपयशाची भीती मनात नाही. गमविण्यासारखे आमचेकडे काहीच नाही.आपल्या या प्रयत्नामुळे गाव पाणीदार होईल का?  गाव एकदम पाणीदार होईल, असे आम्ही म्हणणार नाही; परंतु निश्चित फरक पडेल व ते बघून पुढील वर्षी गावकरी या चळवळीत सहभागी होतील. 

पॅकेजबाबत काय मत आहे. आजपर्यंत किती काम झाले?  गावच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला मिळालेले टार्गेट श्रमदानाचे व मशिनव्दारे दोन्ही आम्ही पुर्ण केले व स्पर्धेची तालुकास्तरीय फेरी गाठली आहे. व्यवसायाने पेंटर, गवंडी, टेलर आणि एक विद्यार्थी असलेल्या या चौघा मित्रांनी प्रारंभी आपला व्यवसाय व शिक्षणासाठी वेळ काढून श्रमदानाचे काम सुरू ठेवले होते. परंतु मागील १५ दिवसांपासून फक्त श्रमदान व इतर नियोजनात वेळ कमी  पडतोय. मात्र आमच्या एकाकी लढ्याची समाजानेही दखल घेण्यास प्रारंभ केला आहे. ‘लोकमत’ लोकांसमोर आमचा संघर्ष आणला. तो अनेकांना माहिती झाला. त्यानंतर अनेकांनी आमची भेट घेऊन सहकार्य करण्याची भूमिका दाखवली. आम्हाला आर्थिक पाटबळही त्यामुळे मिळण्यास प्रारंभ झाल्याचे संजय गायकवाड यांनी संवाद साधताना आवर्जून सांगितले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाinterviewमुलाखत