शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीचा कार्यकाळ वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:53 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा कार्यकाळ एक वर्षाचा  आहे. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकाळ वाढविण्याची  मागणी वारंवार केली जात आहे. यासंदर्भात तत्कालीन गृहमंत्र्यांनी  अनुकूलता दर्शवत हा कालावधी दोन वर्षांचा करण्याचे जाहीर केले;  परंतु ही घोषणा अद्याप कागदावर न आल्यामुळे हा विषय प्रलंबित  राहिला आहे.

ठळक मुद्देतंटामुक्त गाव मोहिमेचा कार्यकाळ एक वर्षाचाच घोषणेची अंमलबजावणी प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा कार्यकाळ एक वर्षाचा  आहे. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकाळ वाढविण्याची  मागणी वारंवार केली जात आहे. यासंदर्भात तत्कालीन गृहमंत्र्यांनी  अनुकूलता दर्शवत हा कालावधी दोन वर्षांचा करण्याचे जाहीर केले;  परंतु ही घोषणा अद्याप कागदावर न आल्यामुळे हा विषय प्रलंबित  राहिला आहे.तंटामुक्त गाव समिती कायमस्वरूपी कार्यरत राहते. दरवर्षी १५ ते ३0  ऑगस्ट या कालावधीत मोहिमेत भाग घेऊ इच्छिणार्‍या ग्रामपंचाय तींनी ग्रामसभा आयोजित करून या मोहिमेत सहभाग घेण्याचा निर्णय  घेणे आवश्यक आहे. यासंदर्भातील पत्र व तंटामुक्त गाव समिती  सदस्यांची यादी संबंधित पोलीस ठाण्यास पाठविली जाते. समिती  सदस्यांसाठी शासनाने आचारसंहिता ठरवून दिलेली आहे. समितीच्या  सदस्यांनी निरपेक्ष व नि:पक्षपातीपणे काम करणे आवश्यक आहे.  मोहिमेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गावाला तंटामुक्त गाव समिती स्था पन करणे अनिवार्य असते. या कालावधीत सामोपचाराने तंटे मिटविणे  वा नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्यासदेखील पुरेसा वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन त त्कालीन गृहमंत्री स्व.आर. आर. पाटील यांनी मोहिमेचा कालावधी  दोन वर्षांचा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुषंगाने समितीला काम  करण्यास पुरेसा वेळ मिळणार होता; मात्र अद्याप यासंदर्भात कागदो पत्री कुठलीच हालचाल झालेली नाही. सदस्यांनी समितीच्या  बैठकांना उपस्थित राहणे, समितीच्या कामासाठी वेळ देणे व तंटे  मिटविण्याच्या कामात रस घेणे आवश्यक आहे. तंटे मिटविताना  सकारात्मक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत नकारात्मक  अथवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असल्यास मोहिमेचा मूळ उद्देश साध्य  होणार नाही. जे सदस्य समितीच्या कामकाजात रस घेत नसतील,  समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करत असतील, अशा  सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याचा निर्णय प्रत्येक वर्षाच्या  पहिल्या ग्रामसभेत ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येतो; परंतु  नियमानुसार कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्त गाव समितीचे एक तृ तीयांशहून अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येत नाही. तसेच  समितीचा अध्यक्ष बदलण्याची ग्रामसभेला आवश्यकता वाटत  असल्यास अध्यक्ष बदलून नवीन अध्यक्षाची निवड त्याच ग्रामसभेत  करावी लागते. हे सोपस्कार पार पाडल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रमुख  तंटामुक्त गाव समितीच्या जाहीर यादीची प्रत ग्रामपंचायतीस पाठविता त.  गावांमध्ये शक्यतोवर तंटे निर्माण होऊ नयेत, सामाजिक व  राजकीय सामंजस्य आणि अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करण्यासाठीच्या व  इतर सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांची रूपरेषा ठरविणे, त्याबाबत  जनजागृती करणे व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी समितीवर  असते.

तत्कालीन गृहमंत्र्यांनी केले होते सूतोवाचतंटे मिटविताना तंटामुक्त गाव समिती ही मध्यस्थ व प्रेरकाची भूमिका  निभावते. या सर्व कामांसाठी समितीला एक वर्षाचा कालावधी मिळ तो. कारण वर्षभरात प्रत्येक गावाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जा ते. मोहिमेचा हा कालावधी अतिशय कमी असल्याचे निष्पन्न  झाल्यावर २0१३ साली तत्कालीन गृहमंत्र्यांनी तो दोन वर्षांचा  करण्याचे सूतोवाच केले होते; परंतु हा निर्णय अद्याप प्रत्यक्षात  आलेला नाही.आता नवीन सरकार असून, ही योजना लोकाभिमुख असल्याने  समि तीचा कार्यकाळ दोन वर्षांचा करावा, अशी मागणी होत आहे.