शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

निसर्ग हीच जीवनातील संस्काराची पहीली पाठशाळा -  यादव तरटे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:03 IST

अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

 - अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कनिसर्गाची शाळा ही मुक्त शाळा आहे. जो पाहील तो शिकेलच.  जगायच कसे आणि वागायचे कसे? हे जंगलच माणसाला शिकविते. जंगल हेच जिविका देते. त्यामुळेच निसर्गच मनुष्याचा गुरू आहे, असे आपले प्रामाणिक मत आहे. अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

मानव-वन्यजीव संघर्ष याबाबत आपले मत काय?मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे मानवाने स्वत:च्या अस्तित्वाला नामशेष करण्यासाठी स्वत:हून दिलेले आमंत्रण होय. निसर्गाशी असलेली सहजीवनाची मैत्री तोडून आपण त्यापासून दुरावलो. या निर्माण झालेल्या दरीने सहजीवन संपवलं आणि येथून मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू झाला. वनतस्करी, वन्यप्राणी शिकार, अतिक्रमण आणि विकास यातून नवा संघर्ष निर्माण झालाय. गत दहा वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात संघर्षाच्या लाखो घटना घडल्या आहेत. एकीकडे लाखोंच्या संख्येत वन्यप्राणी मरत आहेत तर हजारोंच्या संख्येत मानवाला प्राण गमवावा लागत आहे. 

व्याघ्र केंद्रीत पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय का?निश्चितच, व्याघ्रकेंद्रित पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय. केवळ पर्यटनाच्या नावाखाली चाललेला हा गोरखधंदा अन त्याच अर्थकारण हे अनेक अंगानी वाघाच्याच मुळावर उठलंय हे वास्तव नाकारून चालणार नाही.  अतिपर्यटनामुळे वाघाच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतोय यावर आपल्या देशात अजून तरी फारसा विचार झालेला नाही.

वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान काय?  जंगलात केवळ वन्यजीवांमध्ये वाघ, सिंह आणि इतर वन्यप्राणीच नव्हे तर, इतरही भरपूर जैवविविधता आहे. प्राणी, पक्षी, फुलपाखरे व वृक्षसंपदा यांचही एक सुंदर विश्व दडलेलं आहे. ‘दिशा वाईल्ड’लाईफ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून युवक आणि पर्यावरण रक्षणासाठी झटणाºयांना गत १७ वर्षांपासून अविरत मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. तसेच स्थानिक आदिवासी युवकांसाठी स्पर्धा परीक्षाबाबत मोफत मार्गदर्शन केल्या जाते. व्याघ आणि इतर शिकार विरोधी मोहिमेत असलेला सहभाग संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण वाटतो. 

 पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात कधीपासून आलात?बालपणापासूनच पर्यावरण रक्षणासाठी आपला पुढाकार राहीला आहे. वन्यजीवांची आणि त्यांच्या जीवनाची आवड होतीच. मात्र, पदवीनंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरल्याने निसर्गाशी मैत्री अधिक घट्ट झाली. यवतमाळ जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या शिंदी या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने जंगल आणि वन्यप्राणी यांचा जवळून संबध आला. गेल्या १७ वर्षांपासून निसर्ग सेवेत कार्यरत आहे. वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात म्हणजेच स्वसंवर्धनात आपला मुंगीचा वाटा देत असल्याचे मनस्वी समाधान  आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत