शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

निसर्ग हीच जीवनातील संस्काराची पहीली पाठशाळा -  यादव तरटे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:03 IST

अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

 - अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कनिसर्गाची शाळा ही मुक्त शाळा आहे. जो पाहील तो शिकेलच.  जगायच कसे आणि वागायचे कसे? हे जंगलच माणसाला शिकविते. जंगल हेच जिविका देते. त्यामुळेच निसर्गच मनुष्याचा गुरू आहे, असे आपले प्रामाणिक मत आहे. अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

मानव-वन्यजीव संघर्ष याबाबत आपले मत काय?मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे मानवाने स्वत:च्या अस्तित्वाला नामशेष करण्यासाठी स्वत:हून दिलेले आमंत्रण होय. निसर्गाशी असलेली सहजीवनाची मैत्री तोडून आपण त्यापासून दुरावलो. या निर्माण झालेल्या दरीने सहजीवन संपवलं आणि येथून मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू झाला. वनतस्करी, वन्यप्राणी शिकार, अतिक्रमण आणि विकास यातून नवा संघर्ष निर्माण झालाय. गत दहा वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात संघर्षाच्या लाखो घटना घडल्या आहेत. एकीकडे लाखोंच्या संख्येत वन्यप्राणी मरत आहेत तर हजारोंच्या संख्येत मानवाला प्राण गमवावा लागत आहे. 

व्याघ्र केंद्रीत पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय का?निश्चितच, व्याघ्रकेंद्रित पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय. केवळ पर्यटनाच्या नावाखाली चाललेला हा गोरखधंदा अन त्याच अर्थकारण हे अनेक अंगानी वाघाच्याच मुळावर उठलंय हे वास्तव नाकारून चालणार नाही.  अतिपर्यटनामुळे वाघाच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतोय यावर आपल्या देशात अजून तरी फारसा विचार झालेला नाही.

वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान काय?  जंगलात केवळ वन्यजीवांमध्ये वाघ, सिंह आणि इतर वन्यप्राणीच नव्हे तर, इतरही भरपूर जैवविविधता आहे. प्राणी, पक्षी, फुलपाखरे व वृक्षसंपदा यांचही एक सुंदर विश्व दडलेलं आहे. ‘दिशा वाईल्ड’लाईफ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून युवक आणि पर्यावरण रक्षणासाठी झटणाºयांना गत १७ वर्षांपासून अविरत मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. तसेच स्थानिक आदिवासी युवकांसाठी स्पर्धा परीक्षाबाबत मोफत मार्गदर्शन केल्या जाते. व्याघ आणि इतर शिकार विरोधी मोहिमेत असलेला सहभाग संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण वाटतो. 

 पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात कधीपासून आलात?बालपणापासूनच पर्यावरण रक्षणासाठी आपला पुढाकार राहीला आहे. वन्यजीवांची आणि त्यांच्या जीवनाची आवड होतीच. मात्र, पदवीनंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरल्याने निसर्गाशी मैत्री अधिक घट्ट झाली. यवतमाळ जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या शिंदी या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने जंगल आणि वन्यप्राणी यांचा जवळून संबध आला. गेल्या १७ वर्षांपासून निसर्ग सेवेत कार्यरत आहे. वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात म्हणजेच स्वसंवर्धनात आपला मुंगीचा वाटा देत असल्याचे मनस्वी समाधान  आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत